शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

चिंचणी १८ तासांपासून अंधारात

By admin | Updated: August 6, 2016 02:49 IST

महावितरण ती सुरळीत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला

डहाणू : तालुक्यातील चिंचणी गावात गेल्या दोन दिवसांंपासून काळोख पसरला असून महावितरण ती सुरळीत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. वीज महावितरण कंपनीच्या वसई, पालघर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील चिंचणी गावात वीज महावितरण कंपनीचया सेवेचा बोजवारा उडाला असून येथे एक तासही वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने येथील घरोघरी चालणाऱ्या डायमेकींगचा व्यवसाय धोक्यात आला आहे. येथे वीजेच्या तारा तुटण्याबरोबरच फ्युज, डिओ उडण्याचे प्रकार दिवसातून पंधरा ते वीस वेळा होतात. शिवाय बोईसर येथील १३२ के.व्ही.मध्ये रात्रदिवस बिघाड होत असल्याने चारचार तास वीजपुरवठा खंडित होणे नित्याची बाब झाली आहे.या प्रकारामुळे हजारो डायमेकर्स कारागिरांची आर्थिक कुचंबना होत आहे. याबाबतीत चिंचाणी ग्रामपंचायतीने वसई येथील अधीक्षक अभियंता (वीज महावितरण कंपनी) यांना येथील परिस्थिती बाबतीत पत्र लिहून गेल्या पन्नास वर्षापूर्वीच्या वीजेच्या सडलेले खांब, ठिसूळ विजेच्या तारा, कमकुवत ट्रान्सफार्मर इत्यादी नव्याने बसविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)>दिवसभर विजेचा खेळखंडोबामुळे येथील नागरिकांचा संयम तुटला आहे. काल (गुरूवार) रोजी रात्री ९ वाजता चिंचणी खाडीनाका येथे विजेच्या तारा तुटून पडल्या तसेच इतर जीर्ण, जुनाट साहित्यामध्ये बिघाड झाल्याने रात्रभर नागरिकांना अंधारा काढावी लागली. आज दुपारी ३ वाजता वीजपुरवठा सुरू करण्यात आले. परंतु १८ तासानंतरही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता.