शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चिंचणी १८ तासांपासून अंधारात

By admin | Updated: August 6, 2016 02:49 IST

महावितरण ती सुरळीत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला

डहाणू : तालुक्यातील चिंचणी गावात गेल्या दोन दिवसांंपासून काळोख पसरला असून महावितरण ती सुरळीत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. वीज महावितरण कंपनीच्या वसई, पालघर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील चिंचणी गावात वीज महावितरण कंपनीचया सेवेचा बोजवारा उडाला असून येथे एक तासही वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने येथील घरोघरी चालणाऱ्या डायमेकींगचा व्यवसाय धोक्यात आला आहे. येथे वीजेच्या तारा तुटण्याबरोबरच फ्युज, डिओ उडण्याचे प्रकार दिवसातून पंधरा ते वीस वेळा होतात. शिवाय बोईसर येथील १३२ के.व्ही.मध्ये रात्रदिवस बिघाड होत असल्याने चारचार तास वीजपुरवठा खंडित होणे नित्याची बाब झाली आहे.या प्रकारामुळे हजारो डायमेकर्स कारागिरांची आर्थिक कुचंबना होत आहे. याबाबतीत चिंचाणी ग्रामपंचायतीने वसई येथील अधीक्षक अभियंता (वीज महावितरण कंपनी) यांना येथील परिस्थिती बाबतीत पत्र लिहून गेल्या पन्नास वर्षापूर्वीच्या वीजेच्या सडलेले खांब, ठिसूळ विजेच्या तारा, कमकुवत ट्रान्सफार्मर इत्यादी नव्याने बसविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)>दिवसभर विजेचा खेळखंडोबामुळे येथील नागरिकांचा संयम तुटला आहे. काल (गुरूवार) रोजी रात्री ९ वाजता चिंचणी खाडीनाका येथे विजेच्या तारा तुटून पडल्या तसेच इतर जीर्ण, जुनाट साहित्यामध्ये बिघाड झाल्याने रात्रभर नागरिकांना अंधारा काढावी लागली. आज दुपारी ३ वाजता वीजपुरवठा सुरू करण्यात आले. परंतु १८ तासानंतरही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता.