शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पैसे उकळण्यासाठी घेतला चिमुरडीचा जीव

By admin | Updated: July 6, 2017 03:21 IST

केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिव, दमन येथून स्वस्तात मिळणारी दारू आणून ती गावी अकोल्यात विक्री करायची, त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मजा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिव, दमन येथून स्वस्तात मिळणारी दारू आणून ती गावी अकोल्यात विक्री करायची, त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मजा करायची. उधारीवर पैसे घ्यायचे, परतफेड करता आली नाही तर भुरट्या चोऱ्या करायच्या, अशी कृत्य करणाऱ्या बेरोजगारांनी पैशासाठी तनिष्का अमोल आरुडे या चार वर्षाच्या बालिकेचा बळी घेतला. ज्यांच्या इमारतीत खोली भाड्याने घेऊन राहत होते, त्यांच्याच मुलीचे अपहरण करून खून केला. खुनानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. अशा दोन बेरोजगार आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. चऱ्होलीतील वडमुखवाडी येथून चार वर्षाची तनिष्का ही बालिका २८ जूनपासून बेपत्ता झाली होती. मात्र, तिचा खून करून मृतदेहाची अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर येथे विल्हेवाट लावणाऱ्या शुभम विनायक जामनिक (वय २१), प्रतीक साठले (वय २३ ) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. शुभमला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. तर प्रतीक साठले यास ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अमोल आरुडे यांच्याकडे शुभम जामनिक याची आई आणि बहीण भाड्याने राहाते. तो नेहमी अकोल्याहून चऱ्होलीत येत असे. दमन येथून दारू आणून अकोल्यात विक्री करण्यासाठी आरोपींनी एक मोटार भाड्याने घेतली होती. भाडे नियमितपणे देऊ न शकल्याने त्यांच्यावर कर्ज झाले होते. तनिष्काच्या वडिलांकडून पैसे मिळतील, या अपेक्षेने त्यांनी हे कृत्य केले. तनिष्काचे वडीलअमोल यांनी त्यांची पत्नी योगीता यांना किराणा दुकानात थांबवले. ते गाडी सर्व्हिसिंगसाठी चिंचवडला गेले. योगीता मोठ्या मुलीला घेण्यासाठी शाळेत गेल्या त्या वेळी तनिष्का घरात खेळत होती. खाऊचे आमिष दाखवून तनिष्काला एका खोलीत घेतले. वडमुखवाडी येथेच तिचा गळा दाबुन खून केला. मोठ्या बॅगेत भरून मोटारीतून मृतदेह अकोल्यातील मूर्तिजापूरला नेला. विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळला,अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांनी पुरला. तनिष्का १२ च्या सुमारास गायब झाली. तर शुभम दुपारी ३ वाजता चऱ्होलीतून निघून गेला होता. हे संशयास्पद वाटल्याने दिघी पोलिसांनी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधून त्याला बोलावून घेतले. चौकशी केली.पोलिसांचे पथक मूर्तिजापूरला गेले. तेथून त्यांनी मृतदेह पुरल्याचे ठिकाण शोधले. अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, सहायक पोलीस आयुक्त वसंत तांबे, दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी भुजबळ, बाळासाहेब टोके, हरीष माने, शिवाजी भुजबळ, दिनेश डोंबळे, सुनील गवारी, बबन वन्ने, रवि नाडे, शेखर शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. बॅगेत भरलेल्या मृतदेहाचा मोटारीतून प्रवासचऱ्होली ते अकोल्यातील मूर्तिजापूर हे सुमारे ६४० किलोमीटरचे अंतर आहे. आरोपींनी तोंडावर उशी ठेवून तनिष्काचा चऱ्होलीत खून केला. विल्हेवाट लावण्यासाठी तो मोटारीतून अकोला येथे नेला. पंचविशीतील या तरुणांनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या हे कृत्य केले. मुलीचे अपहरण, खून, नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. तनिष्काचा मृतदेह जाळला. परंतु अर्धवट जळाल्याने त्यांनी तो पुरला. पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.