शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मुलांनी किमान वृद्ध आई-वडिलांचे जीवन नरक बनवू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 05:49 IST

मुंबई उच्च न्यायालय : तक्रार आली तर मात्र, कुठलीही तमा बाळगणार नाही

खुशालचंद बाहेती ।

मुंबई : आईला त्रास दिल्याची तक्रार आली तर मुलीला व तिच्या मुलाला आईच्या घरात पाय ठेवू देणार नाही, या शब्दात वृद्ध आईला त्रास देणाऱ्या एका महिलेस उच्च न्यायालयाने सुनावले. कोविडमुळे तिला सध्या आईच्या घरात राहण्याची परवानगी दिली; पण तक्रार आली तर कुठलीही तमा बाळगणार नाही, असे स्पष्ट केले. रोहिणी सोमकूरवार या निवृत्त सरकारी नोकर असून ७० वर्षांच्या आहेत. त्यांना ५ विवाहित मुली आहेत. यापैकी २ अमेरिका व सिंगापूरमध्ये राहतात, तर एक शिवाजीनगर दादरमध्ये. एक सरिता नावाची घटस्फोटित मुलगी आहे.

सरिता किशोर वयातच वाईटांच्या संगतीत गेली. आई-वडिलांच्या अनेक प्रयत्नानंतरही ती सुधारली नाही. २०१८ मध्ये पळून जाऊन तिने रोहित नावाच्या अपराधिक पार्श्वभूमी असलेल्या सोबत लग्न केले. २०२० मध्ये त्यांच्यात बेबनाव होऊन रोहित तिला व एका लहान मुलाला सोडून निघून गेला. यानंतर सरिता पुन्हा माहेरी आली. तिच्या स्वभावाची माहिती असणाºया पालकांनी तिची पर्यायी व्यवस्था होईपर्यंतच राहण्याची परवानगी दिली. पुढे तिला एचडीएफसी बँकेत नोकरी लागली व आर्थिक परिस्थिती सुधारली. तरीही तिने घर मात्र सोडले नाही. उलट घर सोडण्याचा तगादा लावला तर वडिलांविरुद्ध विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊ लागली. घाबरून आई-वडिलांनी गप्प राहणे पसंत केले. पुढे २०११ मध्ये वडील वारले. यानंतर आईचा त्रास वाढला. तिला बाहेर जाण्यावर, कोणाला भेटण्यावर बंधने घालण्यात आली. तिचा मोबाईल फोडला.३ आॅगस्ट २०१८ रोजी संधी मिळताच ती बाहेर निघाली; पण रस्ता ओलांडताना रिक्षाची धडक बसल्याने दवाखान्यात अ‍ॅडमिट व्हावे लागले. यानंतर ती अंथरुणाला खिळूनच होती. तिला फक्त एकदा थोडेसे जेवण मिळत असे. एप्रिल २०१९ मध्ये कविता नावाची मुलगी अमेरिकेतून आल्यानंतर तिने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार केले. ती परत अमेरिकेत गेल्यानंतर त्रास आणखी वाढला. मारहाणही होऊ लागली व बाहेर जाता येऊ नये म्हणून पूर्ण कपडे घालण्यासही मनाई होऊ लागली. फेब्रुवारी २०२० मध्ये वैशाली नावाची मुलगी सिंगापूरहून आली. तिच्या मदतीने पोलिसांत तक्रार केली. ज्येष्ठ नागरिक कायद्याखाली सरिताला घरातून काढून टाकण्यासाठी ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाकडे अर्ज दिला; पण कोविडमुळे निर्णय होऊ शकला नाही. वैशालीला परत जायचे होते व गेल्यानंतर आईचे जगणे कठीण होईल म्हणून उच्च न्यायालयात अर्ज केला. सरिताने सर्व आरोप फेटाळत वैशालीच्या सांगण्यावरून आई तक्रार करते, असा दावा केला.न्या. एस. जे. काथावाला व सुरेंद्र तावडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सवरून वैशाली, सरिता व आई रोहिणीशी बोलले. आईला प्रचंड त्रास आहे हे लक्षात येताच त्यांनी सरिताला सक्त ताकीद दिली. एकही तक्रार यापुढे आली तर तिला व तिच्या मुलाला घरी प्रवेश करण्यास मनाई करू, असे सांगितले.रोहिणीला तिच्या नातेवाईक, मित्रांना घरी बोलावता येईल; पण सरिताला मात्र रोहिणीची परवानगी असेल तरच अन्य व्यक्तींना घरात बोलावता येईल, असे आदेश देत पोलिसांनाही रोहिणीला जेव्हा हवे तेव्हा संरक्षण देण्याचे आदेश दिले. १६ जून रोजी या प्रकरणी न्यायालय पुढील सुनावणी घेणार आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय