शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

मुले मागू शकतात मृत आईचा नुकसान भरपाईतील हिस्सा; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:19 IST

उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे.

मुंबई : रेल्वेने दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील हिस्सा मुलांना मिळाला असला, तरी ते  मृत आईचा नुकसानभरपाईच्या रकमेतील हिस्सा मागू शकतात, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे.  त्यांच्या मृत आईचा व आजीचा हिस्सा त्यांना मिळू शकत नाही, असा आदेश रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिला. उच्च न्यायालयाने दोन्ही मुलांना न्यायाधिकरणात अर्ज करण्यास झालेला विलंब माफ करत रेल्वे अपघात न्यायाधिकरणाला या प्रकरणावर पुन्हा एकदा  निर्णय घेण्यास सांगितले. याचिकाकर्ते किरण व संतोष पायगोडे यांचे वडील दामोदर यांचा मार्च २००९मध्ये धावती ट्रेन पकडताना अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने रेल्वेने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबाला म्हणजे आई, पत्नी आणि दोन मुलांना मिळून चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे ठरविले.आई व पत्नीला नुकसानभरपाईची रक्कम मिळेपर्यंत दोघींचा मृत्यू झाला. या रकमेवर कोणीही दावा करणारे नसल्याने अडीच लाख रुपये पोस्टाद्वारे परत गेले. त्यानंतर किरण व संतोष यांनी आई व आजीची नुकसानभरपाईची रक्कम कायद्याद्वारे किंवा त्यांचे वारस म्हणून आपल्याला मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज रेल्वे अपघात न्यायाधिकरणाकडे केला. मात्र, त्यांना त्यांचा हिस्सा मिळाल्याने न्यायाधिकरणाने दोन्ही भावांना आई व आजीसाठी असलेली नुकसानभरपाईची रक्कम त्यांना मिळू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. 

मुले, नातवंडांचा कायदेशीर अधिकारनुकसानभरपाईची न दिलेली रक्कम आता या दोन महिलांची संपत्ती आहे. त्यावर त्यांच्या मुलाचा व नातवंडांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना त्यांच्या हिश्श्याची नुकसानभरपाईची रक्कम मिळाली म्हणजे ते आईच्या व आजीच्या नुकसानभरपाईच्या रकमेवर दावा करू शकत नाहीत, असे म्हणणे अयोग्य ठरेल, असे न्या. एस. के. शिंदे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय