शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

मुले मागू शकतात मृत आईचा नुकसान भरपाईतील हिस्सा; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:19 IST

उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे.

मुंबई : रेल्वेने दिलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील हिस्सा मुलांना मिळाला असला, तरी ते  मृत आईचा नुकसानभरपाईच्या रकमेतील हिस्सा मागू शकतात, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिलेला निकाल रद्द करत दोन मुलांना दिलासा दिला. वडिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने रेल्वेने ठरविलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील मुलांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे.  त्यांच्या मृत आईचा व आजीचा हिस्सा त्यांना मिळू शकत नाही, असा आदेश रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने दिला. उच्च न्यायालयाने दोन्ही मुलांना न्यायाधिकरणात अर्ज करण्यास झालेला विलंब माफ करत रेल्वे अपघात न्यायाधिकरणाला या प्रकरणावर पुन्हा एकदा  निर्णय घेण्यास सांगितले. याचिकाकर्ते किरण व संतोष पायगोडे यांचे वडील दामोदर यांचा मार्च २००९मध्ये धावती ट्रेन पकडताना अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने रेल्वेने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबाला म्हणजे आई, पत्नी आणि दोन मुलांना मिळून चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे ठरविले.आई व पत्नीला नुकसानभरपाईची रक्कम मिळेपर्यंत दोघींचा मृत्यू झाला. या रकमेवर कोणीही दावा करणारे नसल्याने अडीच लाख रुपये पोस्टाद्वारे परत गेले. त्यानंतर किरण व संतोष यांनी आई व आजीची नुकसानभरपाईची रक्कम कायद्याद्वारे किंवा त्यांचे वारस म्हणून आपल्याला मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज रेल्वे अपघात न्यायाधिकरणाकडे केला. मात्र, त्यांना त्यांचा हिस्सा मिळाल्याने न्यायाधिकरणाने दोन्ही भावांना आई व आजीसाठी असलेली नुकसानभरपाईची रक्कम त्यांना मिळू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. 

मुले, नातवंडांचा कायदेशीर अधिकारनुकसानभरपाईची न दिलेली रक्कम आता या दोन महिलांची संपत्ती आहे. त्यावर त्यांच्या मुलाचा व नातवंडांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना त्यांच्या हिश्श्याची नुकसानभरपाईची रक्कम मिळाली म्हणजे ते आईच्या व आजीच्या नुकसानभरपाईच्या रकमेवर दावा करू शकत नाहीत, असे म्हणणे अयोग्य ठरेल, असे न्या. एस. के. शिंदे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय