शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

प्रेम प्रकरणातून मुलं कमी वयातच सोडताहेत घर; पळून जाणाऱ्यांचा आकडा पाहून चक्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 13:33 IST

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत.

विजयकुमार सैतवाल

जळगाव : नोकरी अथवा अन्य व्यवसायामुळे आई-वडील दिवसभर घराबाहेर राहतात, त्यामुळे शाळेनंतर मुलांचा बहुतांश वेळ सोशल मीडियावर जातो व त्यातून कोणत्यातरी अपरिचितांशी ओळख होते. काही दिवसांच्या ओळखीनंतर मुले-मुली घर सोडतात व ते रफू चक्कर होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुलींसह मुलांचाही समावेश आहे. मात्र मुलींची संख्या तर कितीतरी पटीने अधिक आहे. गेल्या अडीच वर्षात एक दोन नाही तर तब्बल ५०१ मुला-मुलींनी घर सोडले. यात ८० टक्के मुली आहेत. २०२३ च्या जूनपर्यंतच १४३ मुला- मुलींनी घर सोडले. त्यात १२६ मुली असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे. 

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. यात सर्वाधिक प्रमाण मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे आहे. 

शोधणे आव्हान

पोलिस ठाण्यात चार महिन्यांत शोध लागला नाही तर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे (एएचटीयू) दिला जातो. २०२१ मध्ये पळविलेल्या एकूण २०९ मुला-मुलींपैकी एएचटीयू विभागाने १९४ मुला-मुलींचा शोध लावला. तर २०२२ मध्ये २३४ पैकी १८८ मुला-मुलींचा शोध या कक्षाने लावला आहे. अशा मुला-मुलींना शोधण्याचे असते. 

तीन वर्षांत २०२३ च्या सहा महिन्यांत सर्वाधिक

गेल्या तीन वर्षामध्ये २०२३ च्या जानेवारी ते जूनमध्ये मुले पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये ३०, २०२२मध्ये ३८ मुले पळाली होती. या सहा महिन्यात १७ मुले पळाली आहे. दुसरीकडे २०२१मध्ये एकूण १७९, २०२२मध्ये १९६ मुले पळून गेले तर २०२३च्या सहाच महिन्यात १२६ मुली पळून गेल्या आहे. अल्पवयीन असल्याने यात भादंवि ३६३ नुसार त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिला जातो.

५८ मुला-मुलींचा शोध सुरु २०२३ मध्ये जानेवारी ते जून या काळात पळून गेलेल्या १४३ मुला- मुलींपैकी अद्यापही ५८ मुला, मुलींचा शोध सुरू आहे. यात ५६ मुली तर दोन मुलांचा समावेश आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील मुला- मुलींचाही समावेश मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण शहरी भागात सर्वाधिक आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील मुला- प्रमाणात वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

अल्पवयीन मुले-मुली घर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यात मुलींची संख्या तर अधिकच असते. त्यांना पालकांपेक्षा प्रियकर महत्त्वाचा वाटतो. आई-वडिलांनी घरात संवाद वाढविला पाहिजे, मुला- मुलींना वेळ दिला पाहिजे. संवेदनशील विषयांवर खुलेपणाने बोलले, तर असे प्रकार टळतील. मुलांना त्यांच्या चुकीची वेळीच जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. - सुनंदा पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, एएचटीयू विभाग