शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून मुलं कमी वयातच सोडताहेत घर; पळून जाणाऱ्यांचा आकडा पाहून चक्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 13:33 IST

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत.

विजयकुमार सैतवाल

जळगाव : नोकरी अथवा अन्य व्यवसायामुळे आई-वडील दिवसभर घराबाहेर राहतात, त्यामुळे शाळेनंतर मुलांचा बहुतांश वेळ सोशल मीडियावर जातो व त्यातून कोणत्यातरी अपरिचितांशी ओळख होते. काही दिवसांच्या ओळखीनंतर मुले-मुली घर सोडतात व ते रफू चक्कर होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात अल्पवयीन मुलींसह मुलांचाही समावेश आहे. मात्र मुलींची संख्या तर कितीतरी पटीने अधिक आहे. गेल्या अडीच वर्षात एक दोन नाही तर तब्बल ५०१ मुला-मुलींनी घर सोडले. यात ८० टक्के मुली आहेत. २०२३ च्या जूनपर्यंतच १४३ मुला- मुलींनी घर सोडले. त्यात १२६ मुली असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे. 

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. यात सर्वाधिक प्रमाण मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे आहे. 

शोधणे आव्हान

पोलिस ठाण्यात चार महिन्यांत शोध लागला नाही तर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे (एएचटीयू) दिला जातो. २०२१ मध्ये पळविलेल्या एकूण २०९ मुला-मुलींपैकी एएचटीयू विभागाने १९४ मुला-मुलींचा शोध लावला. तर २०२२ मध्ये २३४ पैकी १८८ मुला-मुलींचा शोध या कक्षाने लावला आहे. अशा मुला-मुलींना शोधण्याचे असते. 

तीन वर्षांत २०२३ च्या सहा महिन्यांत सर्वाधिक

गेल्या तीन वर्षामध्ये २०२३ च्या जानेवारी ते जूनमध्ये मुले पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये ३०, २०२२मध्ये ३८ मुले पळाली होती. या सहा महिन्यात १७ मुले पळाली आहे. दुसरीकडे २०२१मध्ये एकूण १७९, २०२२मध्ये १९६ मुले पळून गेले तर २०२३च्या सहाच महिन्यात १२६ मुली पळून गेल्या आहे. अल्पवयीन असल्याने यात भादंवि ३६३ नुसार त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिला जातो.

५८ मुला-मुलींचा शोध सुरु २०२३ मध्ये जानेवारी ते जून या काळात पळून गेलेल्या १४३ मुला- मुलींपैकी अद्यापही ५८ मुला, मुलींचा शोध सुरू आहे. यात ५६ मुली तर दोन मुलांचा समावेश आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील मुला- मुलींचाही समावेश मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण शहरी भागात सर्वाधिक आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील मुला- प्रमाणात वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

अल्पवयीन मुले-मुली घर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यात मुलींची संख्या तर अधिकच असते. त्यांना पालकांपेक्षा प्रियकर महत्त्वाचा वाटतो. आई-वडिलांनी घरात संवाद वाढविला पाहिजे, मुला- मुलींना वेळ दिला पाहिजे. संवेदनशील विषयांवर खुलेपणाने बोलले, तर असे प्रकार टळतील. मुलांना त्यांच्या चुकीची वेळीच जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. - सुनंदा पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, एएचटीयू विभाग