शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेने पछाडलेल्यांकडून मुलाची हत्या, पिता गंभीर जखमी, ऐन दिवाळीच्या दिवशी विझला खैरे कुटुंबातील दिवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 21:12 IST

अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला.

नागपूर : अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. तर, वडील मृत्यूशी झूंज देत आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टी सिग्नल भागात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.कुणाल दयालू खैरे (वय १९) असे मृतकाचे नाव असून, रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल असलेल्या त्याच्या पित्याचे दयालू खैरे (वय ४५) आहे. पुंजाराम वाडीतील गल्ली नंबर ४ मध्ये दयालू खैरे राहतात. त्यांच्या बाजूलाच आरोपी प्रेमलाल बंडू कोटले (वय ४५) याचे घर आहे. दोघेही परिवार कळमना मार्केटमध्ये मजुरी करतात. गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कुणालने आपल्या होमथियेटरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवायला सुरूवात केली. ते ऐकून आरोपी प्रेमलाल कोटले धावतच घराबाहेर आला. त्याने दयालूला घराबाहेर बोलवून ह्यहमारे घर की नई बहू को देवी के गाणे सुनने के बाद उसके शरिरमे देवता आते हैह्ण, असे म्हणत गाणे वाजविण्यास मनाई केली. त्यावरून दयालू आणि प्रेमलालमध्ये वाद झाला. बाचाबाची सुरू असताना आरोपी प्रेमलालचा मुलगा आशिष उर्फ चेतराम (वय २०) घरात धावत गेला. त्याने घरातून भाजी कापण्याचा चाकू आणला आणि दयालूच्या पोटावर, छातीवर चाकूचे घाव घातले. ते पाहून दयालूचा मुलगा कुणाल वडिलांना वाचविण्यासाठी धावला. आरोपी प्रेमलालचा मुलगा लंगडा उर्फ मनोज आणि रोशन कोटले (वय २६) हेदेखिल आले. त्यांनी कुणालवरही चाकूचे सपासप घाव घातले. त्यामुळे वडीलांसोबतच कुणालही रक्ताच्या थारोळळ्यात पडला. पिता-पुत्राला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले.सोंगाने घेतला बळीसर्वत्र दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना घडलेल्या या घटनेमुळे पंजुराम वाडीत तीव्र शोककळा पसरली. कुणालची आई बिंदाबाई हिच्या तक्रारीवरून कळमन्याचे ठाणेदार महेश चाटे यांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २३ आॅक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपी प्रेमलालच्या मुलाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले. त्याच्या सूनेच्या अंगात कथित देव यायचा. या सोंगामुळेच कुणालचा बळी गेला.