शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच जन्मदात्याला टाकले वाळीत

By admin | Updated: January 30, 2015 04:16 IST

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत

जयंत धुळप, अलिबागश्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत टाकल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. यात या दाम्पत्याचा मुलगाच सहभागी आहे. या प्रकरणी घडशीने भरडखोल कुणबी जातपंचायतीविरोधात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर व रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे तक्रार केली आहे. नथुराम घडशी यांच्या मालकीची भरडखोल येथे जमीन आहे. त्यात पूर्ण हिस्सा पाहिजे, अशी मागणी त्यांचाच मुलगा राजेश घडशी याने केली. त्या वेळी, तुझ्या लग्नाकरिता घेतलेले कर्ज आधी फेडले तरच मी तुला जमिनीमध्ये हिस्सा देईन, असे वडिलांनी सांगितले. त्यामुळे रागावून राजेश जातपंचायतीकडे गेला. त्याचे सासरे दामू नागले व त्यांचा भाऊ शंकर नागले हे गावकीचे अध्यक्ष होते. राजेशला हिस्सा देण्याचा आदेश जातपंचायतीने २००७ साली दिला. परंतु नथुराम निर्णयावर ठाम राहिले. परिणामी, घडशी दाम्पत्याला सहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे. या प्रकरणी या वृद्ध दाम्पत्याने भरडखोल कुणबी जात गावकीचे अध्यक्ष शंकर नागले, गोविंद घडशी, कृष्णा शिगवण, महिला गावकी अध्यक्षा विजया खळे, महादेव हुमणे, सुरेश  वागजे, सीताराम वागजे, रामचंद्र ठोंबरे, दामू नागले, कमल नागले, रुपा हुमणे, निर्मल घडशी, सदानंद काजारे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घडशी यांचा मोठा मुलगा हरिश्चंद्र यालाही त्याची पत्नी अर्चना देवदेवस्की करत असल्याचा आरोप करत वाळीत टाकण्यात आले होते. त्याच्याकडे २० हजार रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र त्यांनी ती अमान्य केली. परंतु अवहेलना सहन न झाल्याने त्याने चार वर्षांनी दंड भरला आणि बंदीतून सुटका करून घेतली. त्यानंतर तो कुटुंबियासह गाव सोडून पनवेलला गेला. मुख्यमंत्री व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार पार्वती धाडवे या वयोवृध्द महिलेला देखीलगावपंचांनी १५ वर्षे वाळीत टाकले असल्याचेही या निमीत्ताने समोर आले आहे. याबाबत नथुराम घडशी यांनी आपल्या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, श्रीवर्धन उपविभागीय महसूल अधिकारी, श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन तहसीलदार व मानवी हक्क आयोग यांना पाठविल्या आहेत.