शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुलानेच जन्मदात्याला टाकले वाळीत

By admin | Updated: January 30, 2015 04:16 IST

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत

जयंत धुळप, अलिबागश्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल या गावातील कुणबी जातपंचायतीने नथुराम (८५) व लक्ष्मी घडशी (७५) या दाम्पत्याला गेल्या सहा वर्षांपासून वाळीत टाकल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. यात या दाम्पत्याचा मुलगाच सहभागी आहे. या प्रकरणी घडशीने भरडखोल कुणबी जातपंचायतीविरोधात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर व रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे तक्रार केली आहे. नथुराम घडशी यांच्या मालकीची भरडखोल येथे जमीन आहे. त्यात पूर्ण हिस्सा पाहिजे, अशी मागणी त्यांचाच मुलगा राजेश घडशी याने केली. त्या वेळी, तुझ्या लग्नाकरिता घेतलेले कर्ज आधी फेडले तरच मी तुला जमिनीमध्ये हिस्सा देईन, असे वडिलांनी सांगितले. त्यामुळे रागावून राजेश जातपंचायतीकडे गेला. त्याचे सासरे दामू नागले व त्यांचा भाऊ शंकर नागले हे गावकीचे अध्यक्ष होते. राजेशला हिस्सा देण्याचा आदेश जातपंचायतीने २००७ साली दिला. परंतु नथुराम निर्णयावर ठाम राहिले. परिणामी, घडशी दाम्पत्याला सहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आले आहे. या प्रकरणी या वृद्ध दाम्पत्याने भरडखोल कुणबी जात गावकीचे अध्यक्ष शंकर नागले, गोविंद घडशी, कृष्णा शिगवण, महिला गावकी अध्यक्षा विजया खळे, महादेव हुमणे, सुरेश  वागजे, सीताराम वागजे, रामचंद्र ठोंबरे, दामू नागले, कमल नागले, रुपा हुमणे, निर्मल घडशी, सदानंद काजारे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घडशी यांचा मोठा मुलगा हरिश्चंद्र यालाही त्याची पत्नी अर्चना देवदेवस्की करत असल्याचा आरोप करत वाळीत टाकण्यात आले होते. त्याच्याकडे २० हजार रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र त्यांनी ती अमान्य केली. परंतु अवहेलना सहन न झाल्याने त्याने चार वर्षांनी दंड भरला आणि बंदीतून सुटका करून घेतली. त्यानंतर तो कुटुंबियासह गाव सोडून पनवेलला गेला. मुख्यमंत्री व मानवी हक्क आयोगाकडे तक्रार पार्वती धाडवे या वयोवृध्द महिलेला देखीलगावपंचांनी १५ वर्षे वाळीत टाकले असल्याचेही या निमीत्ताने समोर आले आहे. याबाबत नथुराम घडशी यांनी आपल्या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, श्रीवर्धन उपविभागीय महसूल अधिकारी, श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन तहसीलदार व मानवी हक्क आयोग यांना पाठविल्या आहेत.