शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

चिकुनगुनियाचा उद्रेक

By admin | Updated: September 24, 2016 01:11 IST

सर्वाधिक प्रमाण चिकुनगुनिया या तापाचे असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे.

पुणे : सध्या जिल्ह्यात विषाणुजन्य आजारांनी डोके वर काढले असून त्यात सर्वाधिक प्रमाण चिकुनगुनिया या तापाचे असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. जानेवारीपासून १४ स्पटेंबरपर्यंत १८१ इतके आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दक्षता म्हणून सर्व प्रथामिक व उपकेंद्रांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या विषाणुजन्य आजाराचे रुग्ण वाढत असून, सर्वाधिक प्रमाण हवेली तालुक्यात आहे. उत्तमगनर, फुरसुंगी, वाघोली या भागातील नागरिक तापाने फणफणले आहेत. डेंगीचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत आहेत. बारामतीतील एका वकिलाचा दोन दिवसांपूर्वी डेंगीने मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्याचा अहवाल अजून आला नसून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेही आरोग्य विभागाने ‘लोकमत’शी बालताना सांगितले. अधिक माहिती घेतली असता, या वर्षी जिल्ह्यात चिकुगुनियाची मोठी साथ असल्याचे समोर आले आहे. चिकुनगुनियाची साथ ठराविक वर्षांनंतर येते. विशिष्ट प्रकारचा डास दिवसा चावल्यामुळे हा ताप येतो. ‘टायगर मॉस्किटो’ असे त्या डासाचे नाव असून, तो दिवसा चावल्यामुळे हा ताप येतो. यात रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते. २०१३मध्ये १२, २०१४मध्ये ७ तर २०१५मध्ये फक्त ११ रुग्ण चिकुनगुनियाचे सापडले होते. मात्र, वर्षभरात जानेवारीनंतर १४ सप्टेंबरपर्यंत १८१ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. गेल्याही वर्षी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चिकुनगुनिया तापाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे रुग्णांच्या शरीरात विषाणू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे डेंगी व चिकुनगुनिया तापाचा या वर्षी जास्त प्रसार झाल्याची शक्यता आहे.>डेंगीने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू?जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत डेंगीने ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्याचे अद्याप ठोस कारण समजले नाही. आतापर्यंत डेंगीचे ४५५ संशयित रुग्ण असून, त्यांपैकी १०८ जणांना डेंगीची लागण झाली होती. मलेरियाची साथही काही प्रमाणात असून, ४८ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. >काय काळजी घ्यावी?डासअळी आढळल्यास : पाणीसाठे मोकळे करावेत; परंतु ते पाणी गटारात न ओतता जमिनीत ओतावे. अळीनाशकाचा वापर करावा, डासोत्पत्तीची स्थाने शोधून तपासणीविषाणुजन्य आजारामुळे आरोग्य विभागाने गावोगावी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या असून, डोसोत्पत्तीची स्थाने क्लीन करण्यात येत आहेत. ज्या भागात असे संशयित रुग्ण आढळून येतील, तेथे आरोग्यपथक ताबोडतोब जाऊन तपासणी करीत आहे. ताप आटोक्यात येईपर्यंत आरोग्य कर्मचारी येथे लक्ष ठेवून असतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी सांगितले.>ताप आल्यास : कोणताही ताप अंगावर काढू नये. रक्ताची तपासणी करून घ्यावी. हिवतापाची तपासणी प्रत्येक सरकारी रुग्णालयात मोफत केली जाते. तापामध्ये कोणत्याही गोळ्या स्वत:च्या मनाने अथवा औैषध दुकानदाराकडून घेऊ नयेत. अ‍ॅस्पिरिन, ब्रुफेन अशा गोळ्यांमुळे डेंगी तापात रक्तस्रावाची भीती असते.