शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर; उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:22 IST

राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे. राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २५ ते २९ सप्टेंबरपर्यंत परदेश दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या परदेश दौऱ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडाकडू टीका केली आहे. राज्यातील माता भगिनींची झोप उडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. हजारो अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधीत करत आहेत. तिथे बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

सरकारमध्ये असतानाही रस्त्यावर उतरलो आहे. सत्तेचे कौतुक नाही. हा आक्रोश कुपोषित बालकांचा असून पेटलेले आंदोलन भडकवायला आलेलो नाही तर आंदोलनाला ताकद द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. तुमचा संप चिरडू देणार नाही. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हंटलं.  ४ रुपये ९२ पैशांत पोषण आहार कसा देता? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. बाहेरील राज्यांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी बालकांचा मृत्यू होतो. इथे देशाच्या आधारस्तंभाने दम तोडला. हा शाप सरकारने लावून घेतला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रदेशाता ऑक्सिजनच्या अभावामुळे बालकांच्या झालेल्या मृत्यूवरून सरकारवर टीका केली आहे. 

अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर या दोन्ही बहिणींमध्ये भांडण लावण्याचे काम सरकार करत आहे . तसे होऊ देऊ नका. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका, अशी सरकारला विनंती करतो. लाडू द्यायचा की चिक्की हे मी सांगता. नाही. मात्र माता भगिनींच्या चुलीकडेही लक्ष द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सौभाग्य योजनेवरही टीका केली आहे. वीज जोडून सौभाग्य जपता येणार नाही, त्यासाठी माणसं जपा, असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.