शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, उद्धव हेच भ्रष्टाचाराला जबाबदार

By admin | Updated: February 18, 2017 00:30 IST

नारायण राणेंचा घणाघात : पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप का?

कुडाळ : उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हेच भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा फेकाडा मुख्यमंत्री आपण पाहिला नाही. माझ्या लोकप्रतिनिधींना चोर म्हणणाऱ्या या चोरांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच सेना-भाजपकडे पुरेसे उमेदवार नाहीत, ते आमच्याशी काय लढणार? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सेना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करणारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराला तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारासाठी त्यांनी एकमेकांवर बोट दाखविणे थांबवावे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील नवीन एस.टी. डेपो मैदानावर शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने जाहीर प्रचार सभा झाली. या प्रचार सभेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश साळगावकर, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, युवक काँग्रेसचे लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, राकेश कांदे, सुदन बांदिवडेकर, डॉ. जयेंद्र्र परूळेकर, अस्मिता बांदेकर, भाके वारंग, संदीप कदम, विशाल परब, काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार पक्षाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी टीका करताना राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याच जिल्ह्यात येऊन माझ्यावरच बोलण्याची हिम्मत करू नये. लोक त्यांना जुमानणार नाहीत. रविंद्र चव्हाणांसारखे मंत्री आमच्याकडे यात्रेत फिरतात. नगरपालिकेसाठी जिल्'ात फिरलेल्या चव्हाणांना केवळ कुडाळात आणि सावंतवाडी एकच उमेदवार निवडून आणता. वस्त्रहरण त्यांनी बघावे की राणेंची सभा लागते तेव्हा खुर्च्या कमी पडतात. वस्त्रहरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची अवस्था पाहून त्यांच्याकडे वस्त्रच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यांचे वस्त्रहरण कसे करणार, असा टोला त्यांनी युती सरकारला लगावला.जनताच त्यांना घरी बसविणारकेंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना खासदार मी बनवले. प्रभू गरीब अजिबात नाहीत पण मुद्दामहून जिल्ह्यात फाटकी कपडे घालून फिरतात. कपटी पालकमंत्र्यांना सोडणार नाही. जनता आणि नारायण राणे असे समीकरण आहे. राणे कोकणी जनतेच्या मनात आहेत, त्यामुळे जनता सुडाचे राजकारण करणाऱ्यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या म्हणजे..नीतेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आपण खुर्च्या मोजत नव्हतो; तर भाजपत गेलेल्यांची राजकीय लायकी जनतेला दाखवित होतो. पंतप्रधानांना आणून देखील भाजपचा विधानसभेत पराभव झाला.जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी ‘पालक’ या शब्दाचा अर्थ बदलला आहे. काँग्रेस व नारायण राणेंना घाबरून जिल्हा नियोजनची बैठक लावत नाहीत. पालकमंत्री महात्मा गांधींच्या विरोधातील नाटकाला पोलिस संरक्षण देतात. पण मराठा आरक्षण मोर्चाला पोलिस संरक्षण मात्र देत नाहीत, असा सवाल नीतेश राणेंनी उपस्थित केला.राणेंच्या हॉस्पिटलची परवानगी नाकारणे पालकमंत्र्यांच्या हातात आहे का? असती तरी परवानगी नाकारण्याची हिम्मत झाली नसती. हे हॉस्पिटल गुढी पाडव्याला सुरू करणार. सत्ता कोणाचीही असली तरी मला परवानगीची गरज नाही. हॉस्पिटलची परवानगी नाकारल्याची माहिती देणारा असा कपटी पालकमंत्री मी पाहिला नाही.