शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांमुळे अडला निधी?

By admin | Updated: October 20, 2016 03:44 IST

अर्थसंकल्पातील तरतुदींना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालिकेने साहित्य संमेलनासाठी तरतूद केलेला ५० लाखांचा निधीही अडकून पडला आहे,

कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या अर्थसंकल्पातील तरतुदींना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालिकेने साहित्य संमेलनासाठी तरतूद केलेला ५० लाखांचा निधीही अडकून पडला आहे, अशी माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. ही स्थगिती लवकरच उठेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, निधी अडकण्यास भाजपा जबाबदार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सुचवले. त्याचवेळी २७ गावांच्या राजकारणात शिवसेनेला विरोध करणाऱ्यांचाही वचपा काढल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी तर पुढे पाऊल टाकत महापौरांना स्वागताध्यक्षपद दिले नसेल, तर पालिकेने संमेलनाला निधीच देऊ नये, अशी भूमिका घेत वादात तेल टाकले आहे.साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी बुधवारी महापौर देवळेकर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यात त्यांनी संमेलनासाठी पालिकेचा निधी लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष झाल्यानंतर वझे यांनी प्रथमच या भेटी घेतल्या. संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे, त्या डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाची लवकरच पाहणी करावी. आढावा घ्यावा आणि तेथील गैरसोयी दूर कराव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या चर्चेनंतर वझे यांनी महापौर देवळेकरांची भेट घेतली. तेव्हा मनसेचे गटनेते मंदार हळबे, काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे आणि शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)>राजकारण आले आड२७ गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघर्ष समितीत गुलाब वझे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्या समितीचे शिवसेनेशी पटलेले नाही. निवडणुकीच्या काळात ती समिती भाजपासोबत होती. आताही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण त्यांना मदत करत असल्याची चर्चा आहे. स्वागताध्यक्षपदाचा मान प्रथम नागरिक या नात्याने महापौरांना मिळावा, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होते.मात्र, संमेलनाला राजकीय स्वरूप येऊ नये, यासाठी आगरी युथ फोरमने ते पद आपल्याकडे ठेवले. त्यामुळे महापौर नाराज आहेत. त्यातही संमेलनाचे स्थळ ठरवताना महापौर कल्याणच्या बैठकीला हजर होते, पण त्यांनी डोंबिवलीचे प्रतिनिधित्व न केल्याने त्यांच्यावर तेव्हा साहित्यवर्तुळातून टीका झाली होती. या राजकारणाचा फटका संमेलनाला बसतो आहे. त्यातही भाजपाच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रस्तावांना स्थगिती दिली आहे. साहित्य संमेलनाच्या निधीसह सर्व प्रस्ताव उद्याच्या महासभेत येणार आहेत. ते महापौर मंजूर करून घेऊ शकतात. उरलेले प्रस्ताव त्यांनी अडवून ठेवू नयेत आणि मुख्यमंत्र्यांवर खापर फोडू नये, अशी भाजपाची भूमिका आहे.