शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

महिना एक हजारात मुख्यमंत्र्यांनी जगून दाखवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:16 IST

शासनाकडूनच वेठबिगारीची वागणूक मिळत असल्याचा आरोप आंदोलक कर्मचा-यांनी केला आहे

चेतन ननावरे मुंबई : राज्यातील शालेय पोषण आहाराची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांवरच मानधनवाढीअभावी उपासमारीची वेळ आली आहे. केवळ एक हजार रुपये मासिक मानधनावर कर्मचारी काम करत आहेत. हिंमत असेल तर सरकारचे प्रमुख मंत्री अर्थात, मुख्यमंत्र्यांनी महिना एक हजार रुपयांत जगून दाखवावे, असे खुले आव्हानच कर्मचाºयांच्या आयटक संघटनेने गुरुवारी आझाद मैदानातील व्यासपीठावरून दिले आहे.आयटकच्या महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनांनी गुरुवारी आझाद मैदानात सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. या वेळी शालेय पोषण आहार कर्मचाºयांनी आपली व्यथा मांडली. राज्यातील १ लाख ७४ हजार कर्मचाºयांनी मानधनवाढीसाठी वारंवार मोर्चे काढत शासनासमोर आपली बाजू मांडली. त्याची दखल घेत, पुणे येथील प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी कर्मचाºयांना मासिक ५ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानंतर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निर्देश दिले. त्यानुसार, शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या मागण्यांसाठी ३० मार्च २०१७ रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीनंतर मानधनवाढीसाठी अद्याप सरकारला मुहूर्त मिळाला नसल्याची प्रतिक्रिया कर्मचाºयांचे नेते दिलीप उटाणे यांनी दिली.मुळात संबंधित कर्मचारी शालेय पोषण आहार योजनेत प्रमुख भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागातील नगर परिषदांच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याच्या कामासोबतच शाळा उघडणे, शाळेची देखरेख करणे, स्वच्छता करण्याची कामेही निमूटपणे हे कर्मचारी करत आहेत. मात्र, तरीही महिन्याला केवळ १ हजार रुपये मानधन देऊन, शासनाकडूनच वेठबिगारीची वागणूक मिळत असल्याचा आरोप आंदोलक कर्मचा-यांनी केला आहे. एकीकडे महागाई वाढत असताना, शालेय पोषण आहाराच्या खर्चाचे पैसे वाढविण्यात आले. त्यामुळे इतक्या कमी मानधनात जगायचे तरी कसे, असा सवाल आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला आहे़महाराष्ट्रात वेगळा न्याय का?शालेय पोषण आहार कर्मचाºयांना पाँडिचेरी राज्यात महिन्याला १४ हजार रुपये, केरळमध्ये १० हजार रुपये आणि तामिळनाडूमध्ये मासिक ७ हजार ७०० रुपये मानधन दिले जाते. ही गोष्ट संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणूनही दिली. त्याची चौकशी करून प्रस्ताव सादर करत, मानधनवाढीचा निर्णय घोषित करू, असे आश्वासन खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, २ आॅगस्ट २०१७ व २१ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहे. मात्र, अद्याप कर्मचारी या आश्वासनाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत आहेत. महाराष्टÑाला वेगळा न्याय कशासाठी, असा सवाल संघटनेने केला आहे.