शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

महिना एक हजारात मुख्यमंत्र्यांनी जगून दाखवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:16 IST

शासनाकडूनच वेठबिगारीची वागणूक मिळत असल्याचा आरोप आंदोलक कर्मचा-यांनी केला आहे

चेतन ननावरे मुंबई : राज्यातील शालेय पोषण आहाराची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांवरच मानधनवाढीअभावी उपासमारीची वेळ आली आहे. केवळ एक हजार रुपये मासिक मानधनावर कर्मचारी काम करत आहेत. हिंमत असेल तर सरकारचे प्रमुख मंत्री अर्थात, मुख्यमंत्र्यांनी महिना एक हजार रुपयांत जगून दाखवावे, असे खुले आव्हानच कर्मचाºयांच्या आयटक संघटनेने गुरुवारी आझाद मैदानातील व्यासपीठावरून दिले आहे.आयटकच्या महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनांनी गुरुवारी आझाद मैदानात सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. या वेळी शालेय पोषण आहार कर्मचाºयांनी आपली व्यथा मांडली. राज्यातील १ लाख ७४ हजार कर्मचाºयांनी मानधनवाढीसाठी वारंवार मोर्चे काढत शासनासमोर आपली बाजू मांडली. त्याची दखल घेत, पुणे येथील प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकांनी कर्मचाºयांना मासिक ५ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यानंतर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निर्देश दिले. त्यानुसार, शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांच्या मागण्यांसाठी ३० मार्च २०१७ रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक घेतली. मात्र, त्या बैठकीनंतर मानधनवाढीसाठी अद्याप सरकारला मुहूर्त मिळाला नसल्याची प्रतिक्रिया कर्मचाºयांचे नेते दिलीप उटाणे यांनी दिली.मुळात संबंधित कर्मचारी शालेय पोषण आहार योजनेत प्रमुख भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागातील नगर परिषदांच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याच्या कामासोबतच शाळा उघडणे, शाळेची देखरेख करणे, स्वच्छता करण्याची कामेही निमूटपणे हे कर्मचारी करत आहेत. मात्र, तरीही महिन्याला केवळ १ हजार रुपये मानधन देऊन, शासनाकडूनच वेठबिगारीची वागणूक मिळत असल्याचा आरोप आंदोलक कर्मचा-यांनी केला आहे. एकीकडे महागाई वाढत असताना, शालेय पोषण आहाराच्या खर्चाचे पैसे वाढविण्यात आले. त्यामुळे इतक्या कमी मानधनात जगायचे तरी कसे, असा सवाल आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला आहे़महाराष्ट्रात वेगळा न्याय का?शालेय पोषण आहार कर्मचाºयांना पाँडिचेरी राज्यात महिन्याला १४ हजार रुपये, केरळमध्ये १० हजार रुपये आणि तामिळनाडूमध्ये मासिक ७ हजार ७०० रुपये मानधन दिले जाते. ही गोष्ट संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणूनही दिली. त्याची चौकशी करून प्रस्ताव सादर करत, मानधनवाढीचा निर्णय घोषित करू, असे आश्वासन खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, २ आॅगस्ट २०१७ व २१ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहे. मात्र, अद्याप कर्मचारी या आश्वासनाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत आहेत. महाराष्टÑाला वेगळा न्याय कशासाठी, असा सवाल संघटनेने केला आहे.