शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

राज्यात पुन्हा संधी आघाडीलाच : मुख्यमंत्री

By admin | Updated: June 5, 2014 22:34 IST

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला.

- राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर- विरोधकांचा सभात्यागमुंबई : राज्यात पाच वर्षे युतीची सत्ता होती. मात्र त्यांचा कारभार अनुभवल्यानंतर त्यांना जनतेने एकदा नव्हे तर लागोपाठ तीन वेळा नाकारले, असा चिमटा विरोधकांना काढतानाच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य पिछाडीवर जात असल्याची विरोधकांची टीका खोडून काढली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी मात्र घोषणाबाजी करीत सभात्याग केला. तत्पूर्वी, राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्याचे दाखले चव्हाण देत होते त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. मात्र सरकार खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले. या कालावधीत जवळपास ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचे वाटप सरकारने केले. राज्य सरकारची असलेली ताकत आणि दानत यामुळेच हे शक्य झाले. शेतकर्‍यांना यापूर्वी इतकी मदत कुठल्याही सरकारने दिलेली नव्हती. गिरणी कामगारांना घरे, मोनो, मेट्रो, इस्टर्न फ्री वेसारखे मुंबईतील प्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी, गुटखाबंदी, मनोधैर्य, सुकन्या योजना, शालेय शिक्षणासाठीचे अनेक निर्णय, ई प्रशासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ६० हजार नवीन रिक्षा परवाने, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, सावकारी प्रतिबंधक कायदा अशा अनेक उपलब्धींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. तत्पूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणावर सदाशिवराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळा नांदगावकर, रवींद्र वायकर यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)