शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

राज्यात पुन्हा संधी आघाडीलाच : मुख्यमंत्री

By admin | Updated: June 5, 2014 22:34 IST

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला.

- राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर- विरोधकांचा सभात्यागमुंबई : राज्यात पाच वर्षे युतीची सत्ता होती. मात्र त्यांचा कारभार अनुभवल्यानंतर त्यांना जनतेने एकदा नव्हे तर लागोपाठ तीन वेळा नाकारले, असा चिमटा विरोधकांना काढतानाच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य पिछाडीवर जात असल्याची विरोधकांची टीका खोडून काढली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी मात्र घोषणाबाजी करीत सभात्याग केला. तत्पूर्वी, राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्याचे दाखले चव्हाण देत होते त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. मात्र सरकार खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले. या कालावधीत जवळपास ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचे वाटप सरकारने केले. राज्य सरकारची असलेली ताकत आणि दानत यामुळेच हे शक्य झाले. शेतकर्‍यांना यापूर्वी इतकी मदत कुठल्याही सरकारने दिलेली नव्हती. गिरणी कामगारांना घरे, मोनो, मेट्रो, इस्टर्न फ्री वेसारखे मुंबईतील प्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी, गुटखाबंदी, मनोधैर्य, सुकन्या योजना, शालेय शिक्षणासाठीचे अनेक निर्णय, ई प्रशासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ६० हजार नवीन रिक्षा परवाने, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, सावकारी प्रतिबंधक कायदा अशा अनेक उपलब्धींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. तत्पूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणावर सदाशिवराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळा नांदगावकर, रवींद्र वायकर यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)