शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा संधी आघाडीलाच : मुख्यमंत्री

By admin | Updated: June 5, 2014 22:34 IST

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला.

- राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर- विरोधकांचा सभात्यागमुंबई : राज्यात पाच वर्षे युतीची सत्ता होती. मात्र त्यांचा कारभार अनुभवल्यानंतर त्यांना जनतेने एकदा नव्हे तर लागोपाठ तीन वेळा नाकारले, असा चिमटा विरोधकांना काढतानाच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य पिछाडीवर जात असल्याची विरोधकांची टीका खोडून काढली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी मात्र घोषणाबाजी करीत सभात्याग केला. तत्पूर्वी, राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्याचे दाखले चव्हाण देत होते त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. मात्र सरकार खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले. या कालावधीत जवळपास ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचे वाटप सरकारने केले. राज्य सरकारची असलेली ताकत आणि दानत यामुळेच हे शक्य झाले. शेतकर्‍यांना यापूर्वी इतकी मदत कुठल्याही सरकारने दिलेली नव्हती. गिरणी कामगारांना घरे, मोनो, मेट्रो, इस्टर्न फ्री वेसारखे मुंबईतील प्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी, गुटखाबंदी, मनोधैर्य, सुकन्या योजना, शालेय शिक्षणासाठीचे अनेक निर्णय, ई प्रशासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ६० हजार नवीन रिक्षा परवाने, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, सावकारी प्रतिबंधक कायदा अशा अनेक उपलब्धींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. तत्पूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणावर सदाशिवराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळा नांदगावकर, रवींद्र वायकर यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)