शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:59 IST

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे.

मुंबई : परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नाही तर ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा, असे प्रतिउत्तर मनसेने दिले आहे.घाटकोपर येथे बुधवारी शिक्षणमहर्षी आय.डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी उत्तर भारतीय आणि इतर राज्यांतून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढविला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केले. भाषा हे संपर्काचे साधन आहे, विवादाचे नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला होता.मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केल्याने मनसेने आता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. लांगूलचालनाच्या या राजकारणात मुंबईच्या हिताचा विचार होत नसल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. शिवाय, फडणवीस यांनी भाषेच्या अभिमानासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा, कोणत्याही भाषेचा नाही, असा टोलाही लगावला.फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आधीच मनसे आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. मनसेला जशास तसे उत्तर देत काँग्रेसने उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामुळे आता भाजपानेही परप्रांतीयांना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे. भाजपाच्या मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी अलीकडे उत्तर भारतीय हे मुंबईची शान असल्याचे वक्तव्य केले होते. आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य प्रांतातून येणाºयांमुळे मुंबई महान बनल्याचे सांगितल्याने मनसेला आयती संधी मिळाली आहे.मुंबईची नाडी महाराष्ट्रातपरप्रांतीयांमुळे मुंबई महान बनत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोडून काढण्यासाठी मनसेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानांचा आधार घेतला आहे. ‘मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती.मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यासाठी कामगारांचा पुरवठादेखील महाराष्ट्र करतो.महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदडो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही, अशा शब्दांत बाबासाहेबांनी राज्य पुनर्रचनेची मीमांसा केली होती. मनसेकडून सोशल मीडियात अशाच विचारांचे फोटो आणि वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

टॅग्स :marathiमराठीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस