शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:59 IST

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे.

मुंबई : परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नाही तर ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा, असे प्रतिउत्तर मनसेने दिले आहे.घाटकोपर येथे बुधवारी शिक्षणमहर्षी आय.डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी उत्तर भारतीय आणि इतर राज्यांतून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढविला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केले. भाषा हे संपर्काचे साधन आहे, विवादाचे नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला होता.मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केल्याने मनसेने आता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. लांगूलचालनाच्या या राजकारणात मुंबईच्या हिताचा विचार होत नसल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. शिवाय, फडणवीस यांनी भाषेच्या अभिमानासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा, कोणत्याही भाषेचा नाही, असा टोलाही लगावला.फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आधीच मनसे आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. मनसेला जशास तसे उत्तर देत काँग्रेसने उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामुळे आता भाजपानेही परप्रांतीयांना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे. भाजपाच्या मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी अलीकडे उत्तर भारतीय हे मुंबईची शान असल्याचे वक्तव्य केले होते. आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य प्रांतातून येणाºयांमुळे मुंबई महान बनल्याचे सांगितल्याने मनसेला आयती संधी मिळाली आहे.मुंबईची नाडी महाराष्ट्रातपरप्रांतीयांमुळे मुंबई महान बनत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोडून काढण्यासाठी मनसेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानांचा आधार घेतला आहे. ‘मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती.मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यासाठी कामगारांचा पुरवठादेखील महाराष्ट्र करतो.महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदडो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही, अशा शब्दांत बाबासाहेबांनी राज्य पुनर्रचनेची मीमांसा केली होती. मनसेकडून सोशल मीडियात अशाच विचारांचे फोटो आणि वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

टॅग्स :marathiमराठीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस