शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहनांचा वापर वाढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:24 IST

विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई-व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी टाटा मोटर्स

मुंबई : विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई-व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व ईईएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार केले. आगामी काळात सरकारी तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई व्हेइकलचा वापर वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. राज्य सरकारने ई व्हेइकल धोरणाच्या अनुषंगाने आज शासकीय कार्यालये, सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेइकलचा वापर, चार्जिंग केंद्रे उभारणे आदीविषयी सामंजस्य करार केले. महिंद्रा समूह व उद्योग विभागातील करारानुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही चाकण येथील प्रकल्पात विजेवर चालणाºया गाड्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणार आहे. या वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक कार पुरविण्यासाठी महिंद्रा कंपनी सरकारला सहकार्य करणार आहे. तर, टाटा मोटर्स राज्य सरकारला एक हजार इलेक्ट्रिक वाहने पुरविणार असून, ई व्हेइकलसाठी राज्यामध्ये शंभर चार्जिंग केंद्रे उभारणार आहे. एनर्जी इफिशियन्सची सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाला विजेवर चालणाºया कार तसेच या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरविणार आहे. राज्यात विजेवरील वाहनांच्या वापर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण विभाग ईईएसएलला निधी पुरविणार असून, त्याबाबतच्या सामंजस्य करारावरही सह्या झाल्या.पर्यावरणपूरक सुलभ, दळणवळण व शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी प्रदूषणमुक्त अशा विजेवर चालणाºया वाहनांच्या वापराचे धोरण तयार केले आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात होत असलेले मोठे बदल स्वीकारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांकडून इलेक्ट्रिक कारचे लोकार्पणपेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण केलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंगवरील व बॅटरीवरील कारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गेटवे आॅफ इंडिया येथे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक कारमधून परिसरात फेरफटका मारला.मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी केला विजेवर चालणाºया बसमधून मंत्रालय ते गेटवे प्रवासमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ई चार्जिंग सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महोदयांनी विजेवर चालणाºया बेस्टच्या बसमधून मंत्रालय ते गेटवे आॅफ इंडिया या मार्गावर प्रवास केला. या वेळी आमदार राज पुरोहित, संयुक्त राष्ट्र संघ - पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम, महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आदींनीही या बसमधून प्रवास केला.