शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

आदिवासी, गिरणी कामगारांना २०२२ पूर्वी घरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जीएसटीमुळे बांधकाम साहित्य स्वस्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:34 IST

राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे हक्काचे मिळावे, यासाठी ‘सर्वांना घरे’ ही योजना राज्य सरकार प्राधान्याने राबवीत आहे. घरांच्या संदर्भात समाजातील सर्व घटकांचा विचार करून योजना राबविण्यात येत असून, २०२२ पूर्वी गिरणी कामगार, पोलीस आणि आदिवासींना घरे देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे हक्काचे मिळावे, यासाठी ‘सर्वांना घरे’ ही योजना राज्य सरकार प्राधान्याने राबवीत आहे. घरांच्या संदर्भात समाजातील सर्व घटकांचा विचार करून योजना राबविण्यात येत असून, २०२२ पूर्वी गिरणी कामगार, पोलीस आणि आदिवासींना घरे देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात ‘सर्वांसाठी परवडणारी घरे’ या विषयावर मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरातील नागरिकांनी घरांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागात ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ३ लाख ४ हजार घरे मंजूर असून, त्यातील २५ हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६२ हजार घरे मंजूर असून, ४ हजार घरे पूर्ण झाली आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यातून १६ हजार घरे मिळणार आहेत. मुंबई उपनगरातील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना लागू करण्यात आली आहे. घराच्या संदर्भात समाजातील सर्वच घटकांचा विचार करण्यात येत असून, पोलीस, गिरणी कामगार, उपेक्षित वंचित आदिवासी यांना २०२२ पूर्वी घरे देण्यात येणार आहेत. संक्रमण शिबिरात राहणाºया कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. शिवाय जीएसटीमुळे घरासाठी लागणाºया सिमेंट, लोखंड, प्लायवूड, फरशी आदी वस्तूंचे दर कमी झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.राज्यातील १४२ शहरात प्रधानमंत्री आवाज योजनेतून कामे होत आहेत, शिवाय २४३ शहरांचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.सध्या मंडार्ली, गोठेघर, बार्वे, शिरढोण, निळजेपाडा, वाल्हे,केळवी, शिरूर, तळेगाव, म्हाळुंगे, चिखली, दिघी, चाकण, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, चिखलठाना, नक्षत्रवाडी, पाडेगाव, लातूर, शिवनी, बडनेरा, नांदगावपेठ, बुलडाणा, आडगाव, श्रीरामपूर, पिंपळगाव आदी ३२ ठिकाणांच्या योजनांना मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.महारेरांतर्गत ७ हजार विकासकांची नोंदणीग्राहकांची फसवणूक थांबवून बांधकाम क्षेत्रात शिस्त व पारदर्शकता आणण्यासाठी अलीकडेच सरकारने कायदा केला आहे. त्यामुळे विकासकांना प्राधिकरणाकडे प्रकल्पाची नोंदणी करणे, तसेच प्रकल्पाची संपूर्ण माहिती अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराअंतर्गत ७ हजार विकासक, साडेचार हजार एजंट आणि २१०० प्रकल्पांची नोंदणी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार