शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी, गिरणी कामगारांना २०२२ पूर्वी घरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जीएसटीमुळे बांधकाम साहित्य स्वस्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:34 IST

राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे हक्काचे मिळावे, यासाठी ‘सर्वांना घरे’ ही योजना राज्य सरकार प्राधान्याने राबवीत आहे. घरांच्या संदर्भात समाजातील सर्व घटकांचा विचार करून योजना राबविण्यात येत असून, २०२२ पूर्वी गिरणी कामगार, पोलीस आणि आदिवासींना घरे देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे हक्काचे मिळावे, यासाठी ‘सर्वांना घरे’ ही योजना राज्य सरकार प्राधान्याने राबवीत आहे. घरांच्या संदर्भात समाजातील सर्व घटकांचा विचार करून योजना राबविण्यात येत असून, २०२२ पूर्वी गिरणी कामगार, पोलीस आणि आदिवासींना घरे देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात ‘सर्वांसाठी परवडणारी घरे’ या विषयावर मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरातील नागरिकांनी घरांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागात ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ३ लाख ४ हजार घरे मंजूर असून, त्यातील २५ हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६२ हजार घरे मंजूर असून, ४ हजार घरे पूर्ण झाली आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यातून १६ हजार घरे मिळणार आहेत. मुंबई उपनगरातील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना लागू करण्यात आली आहे. घराच्या संदर्भात समाजातील सर्वच घटकांचा विचार करण्यात येत असून, पोलीस, गिरणी कामगार, उपेक्षित वंचित आदिवासी यांना २०२२ पूर्वी घरे देण्यात येणार आहेत. संक्रमण शिबिरात राहणाºया कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. शिवाय जीएसटीमुळे घरासाठी लागणाºया सिमेंट, लोखंड, प्लायवूड, फरशी आदी वस्तूंचे दर कमी झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.राज्यातील १४२ शहरात प्रधानमंत्री आवाज योजनेतून कामे होत आहेत, शिवाय २४३ शहरांचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.सध्या मंडार्ली, गोठेघर, बार्वे, शिरढोण, निळजेपाडा, वाल्हे,केळवी, शिरूर, तळेगाव, म्हाळुंगे, चिखली, दिघी, चाकण, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, चिखलठाना, नक्षत्रवाडी, पाडेगाव, लातूर, शिवनी, बडनेरा, नांदगावपेठ, बुलडाणा, आडगाव, श्रीरामपूर, पिंपळगाव आदी ३२ ठिकाणांच्या योजनांना मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.महारेरांतर्गत ७ हजार विकासकांची नोंदणीग्राहकांची फसवणूक थांबवून बांधकाम क्षेत्रात शिस्त व पारदर्शकता आणण्यासाठी अलीकडेच सरकारने कायदा केला आहे. त्यामुळे विकासकांना प्राधिकरणाकडे प्रकल्पाची नोंदणी करणे, तसेच प्रकल्पाची संपूर्ण माहिती अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराअंतर्गत ७ हजार विकासक, साडेचार हजार एजंट आणि २१०० प्रकल्पांची नोंदणी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार