शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

छत्रपती संभाजीराजे रायगडावर

By admin | Updated: June 14, 2016 01:03 IST

राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत आपली नवी कारकीर्द सुरू करण्यापूर्वी युवराज छत्रपती संभाजी राजे रविवारी रात्री पाचाड आणि किल्ले रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवराय

महाड : राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत आपली नवी कारकीर्द सुरू करण्यापूर्वी युवराज छत्रपती संभाजी राजे रविवारी रात्री पाचाड आणि किल्ले रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवराय आणि जगदीश्वरासमोर नतमस्तक झाले. ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, त्यांचे आशीर्वाद घेवूनच संसदेतील नवीन कारकीर्द सुरू करायची याच भावनेतून आपण आज पाचाड आणि रायगड येथे आलो असल्याचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी जिजामाता समाधीस्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे पाचाड येथे आगमन झाले. तेथून छत्रपती संभाजी राजे थेट पाचाड येथील जिजामाता समाधीस्थळी रवाना झाले. येथे रघुवीर देशमुख, अनंत देशमुख यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्याचप्रमाणे पाचाड येथील महिलावर्गाने त्यांचे औक्षण केले. समाधीस्थळी राजमातेचे दर्शन घेवून त्यांना अभिवादन के ल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. दिल्ली दरबारी राज्यसभा सदस्य म्हणून कारकीर्द सुरू करण्यापूर्वी पाचाड आणि रायगड येथे येवून राजमाता आणि छ. शिवरायांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यासाठीच आपण येथे आल्याचे ते म्हणाले. राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर आले होते. त्यांनी रायगडच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांमध्ये या निधीचा विनियोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ले रायगडावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना या परिसरातील स्थानिक जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. यासाठी या परिसरातील गावांमध्ये आपण बैठका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत श्री शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंग सावंत, सुधीर देशमुख, अनंत देशमुख, प्रशांत दरेकर आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)सुविधा देणारछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर आले होते. त्यांनी रायगडच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांमध्ये या निधीचा विनियोग करण्यात येणार आहे. रायगड संवर्धन आराखड्याच्या माध्यमातून केवळ रायगड किल्लाच नव्हे तर परिसरातील गावे आणि वाड्यांमध्येही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.