शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

छत्रपती संभाजीराजे रायगडावर

By admin | Updated: June 14, 2016 01:03 IST

राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत आपली नवी कारकीर्द सुरू करण्यापूर्वी युवराज छत्रपती संभाजी राजे रविवारी रात्री पाचाड आणि किल्ले रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवराय

महाड : राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत आपली नवी कारकीर्द सुरू करण्यापूर्वी युवराज छत्रपती संभाजी राजे रविवारी रात्री पाचाड आणि किल्ले रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवराय आणि जगदीश्वरासमोर नतमस्तक झाले. ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, त्यांचे आशीर्वाद घेवूनच संसदेतील नवीन कारकीर्द सुरू करायची याच भावनेतून आपण आज पाचाड आणि रायगड येथे आलो असल्याचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी जिजामाता समाधीस्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे पाचाड येथे आगमन झाले. तेथून छत्रपती संभाजी राजे थेट पाचाड येथील जिजामाता समाधीस्थळी रवाना झाले. येथे रघुवीर देशमुख, अनंत देशमुख यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्याचप्रमाणे पाचाड येथील महिलावर्गाने त्यांचे औक्षण केले. समाधीस्थळी राजमातेचे दर्शन घेवून त्यांना अभिवादन के ल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. दिल्ली दरबारी राज्यसभा सदस्य म्हणून कारकीर्द सुरू करण्यापूर्वी पाचाड आणि रायगड येथे येवून राजमाता आणि छ. शिवरायांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यासाठीच आपण येथे आल्याचे ते म्हणाले. राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर आले होते. त्यांनी रायगडच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांमध्ये या निधीचा विनियोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ले रायगडावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना या परिसरातील स्थानिक जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. यासाठी या परिसरातील गावांमध्ये आपण बैठका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत श्री शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंग सावंत, सुधीर देशमुख, अनंत देशमुख, प्रशांत दरेकर आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)सुविधा देणारछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर आले होते. त्यांनी रायगडच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांमध्ये या निधीचा विनियोग करण्यात येणार आहे. रायगड संवर्धन आराखड्याच्या माध्यमातून केवळ रायगड किल्लाच नव्हे तर परिसरातील गावे आणि वाड्यांमध्येही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.