शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

रसायनमुक्त फळांची कीर्ती पोहोचली विदेशात

By admin | Updated: August 15, 2016 01:26 IST

शेतीमध्ये अनुभवातून आणि अभ्यासातून केलेला बदल फायदेशीर ठरतो.

बारामती : शेतीमध्ये अनुभवातून आणि अभ्यासातून केलेला बदल फायदेशीर ठरतो. आज रासायनिक शेती, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनखर्च वाढला आहे. त्यामानाने मिळणारे उत्पन्न आणि मिळणारा बाजारभाव याचा विचार करता, शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे, अशी ओरड ऐकायला मिळते. मात्र यावर काही शेतकरी उपाय शोधतात, प्रवाहाच्या विरूद्ध जातात. आधुनिक शेतीशास्त्रामध्ये ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या त्याला न जुमानता नैसर्गिक शेतीची वाट धरत त्यातून त्यांच्या ‘झीरो बजेट शेती’ आणि रसायनमुक्त फळांची कीर्ती विदेशामध्येदेखील पोहोचली आहे. या शेतकऱ्यांच्या शेतमालास जागरूक ग्राहक पसंती देताना दिसत आहे.कळस (ता. इंदापूर) येथील शेतकरी शशिकांत पवार यांनी नैसर्गिक शेतीच्या सूत्रानुसार डाळिंबाची बाग वाढवली आहे. कोणत्याही प्रकारचे रासायनिक किंवा सेंद्रिय खत न वापरता त्यांच्या बागेतील फळाचे वजन ६०० ग्रॅमपर्यंत भरल्याचे त्यांनी सांगितले. १२ टन डाळिंबाचे उत्पादन त्यांनी काढले. त्यामधून त्यांना ६ लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन मिळाले आहे. शशिकांत पवार हे आपल्या नैसर्गिक शेतीच्या तंत्राबद्दल सांगतात, की मातीमध्ये पिकाला पोषक असणारे सर्व घटक असतात. हे घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम फक्त आपल्याला करावे लागते. त्यासाठी देशी गाईचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत, शेतजमिनीवर केलेले पालापाचोळ्याचे अच्छादन महत्त्वाची भूमिका बजावतात. देशी गाईच्या १ ग्रॅम शेणामध्ये ३०० कोटी पिकासाठी उपयुक्त असे अ‍ॅझेटोबॅक्टर, पीएसबी, ट्रायकोड्रमा, केएमबी प्रकारचे जीवाणू असतात. एकदलीय वनस्पतीपासून जमिनीला कार्बन मिळते. तर द्विदलीय वनस्पती, यामध्ये डाळवर्गीय व शेंगवर्गीय पिकांपासून जमिनीला नायट्रोजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शेतामध्ये मुख्य डाळिंब पिकासोबतच तूर, मूग, उडीद आदी सापळा पिकांच्या लागवडी केल्या. तसेच पिकाचे निघणारे अवशेष, गवत यांचा आच्छादन म्हणून वापर केला. त्यामुळे जमिनीतील ह्युमस वाढतो. त्या शेतामध्ये मित्रकीटकांची पैदास होते. हेच गांडूळ जमिनीतील पिकासाठी उपयुक्त असणारे घटक विष्ठेच्या रूपात पिकांच्या मुळापर्यंत आणतात. त्यामुळे पिकांना बाहेरील खतांची गरज पडत नाही. नैसर्गिक आहार पिकाला मिळाल्याने झाडांची फळधारणा व वजनदेखील वाढले़>रोज प्रतिलिटर ५० रुपयांनी दूध विकले जात आहे. भिगवण येथे पॅकिंग करून दूध विकले जात आहे. एक गीर गाय दिवसाला १० ते १२ लिटर दूध देत आहे. पवार यांच्याकडे अशा ६ गीर, १ कांक्रेज गाय, ५ गीर कालवडी आहेत. या गार्इंच्या तुपाला पुणे, रायगड, मुंबई भागातून चांगली मागणी आहे. तुपाला चांगला भाव येत आहे. चांगल्या बाजारभावामुळे विदेशी वंशाच्या गार्इंंपेक्षा देशी गाय अधिक उत्पन्न व शेतीला उपयुक्त असे शेण व गोमूत्र देत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नसल्याने येणारा पैसा हे निव्वळ उत्पन्न आहे, असेही पवार यांनी सांगितले.