शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

रसायनमुक्त फळांची कीर्ती पोहोचली विदेशात

By admin | Updated: August 15, 2016 01:26 IST

शेतीमध्ये अनुभवातून आणि अभ्यासातून केलेला बदल फायदेशीर ठरतो.

बारामती : शेतीमध्ये अनुभवातून आणि अभ्यासातून केलेला बदल फायदेशीर ठरतो. आज रासायनिक शेती, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादनखर्च वाढला आहे. त्यामानाने मिळणारे उत्पन्न आणि मिळणारा बाजारभाव याचा विचार करता, शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे, अशी ओरड ऐकायला मिळते. मात्र यावर काही शेतकरी उपाय शोधतात, प्रवाहाच्या विरूद्ध जातात. आधुनिक शेतीशास्त्रामध्ये ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या त्याला न जुमानता नैसर्गिक शेतीची वाट धरत त्यातून त्यांच्या ‘झीरो बजेट शेती’ आणि रसायनमुक्त फळांची कीर्ती विदेशामध्येदेखील पोहोचली आहे. या शेतकऱ्यांच्या शेतमालास जागरूक ग्राहक पसंती देताना दिसत आहे.कळस (ता. इंदापूर) येथील शेतकरी शशिकांत पवार यांनी नैसर्गिक शेतीच्या सूत्रानुसार डाळिंबाची बाग वाढवली आहे. कोणत्याही प्रकारचे रासायनिक किंवा सेंद्रिय खत न वापरता त्यांच्या बागेतील फळाचे वजन ६०० ग्रॅमपर्यंत भरल्याचे त्यांनी सांगितले. १२ टन डाळिंबाचे उत्पादन त्यांनी काढले. त्यामधून त्यांना ६ लाख रुपयांचे निव्वळ उत्पादन मिळाले आहे. शशिकांत पवार हे आपल्या नैसर्गिक शेतीच्या तंत्राबद्दल सांगतात, की मातीमध्ये पिकाला पोषक असणारे सर्व घटक असतात. हे घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम फक्त आपल्याला करावे लागते. त्यासाठी देशी गाईचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत, शेतजमिनीवर केलेले पालापाचोळ्याचे अच्छादन महत्त्वाची भूमिका बजावतात. देशी गाईच्या १ ग्रॅम शेणामध्ये ३०० कोटी पिकासाठी उपयुक्त असे अ‍ॅझेटोबॅक्टर, पीएसबी, ट्रायकोड्रमा, केएमबी प्रकारचे जीवाणू असतात. एकदलीय वनस्पतीपासून जमिनीला कार्बन मिळते. तर द्विदलीय वनस्पती, यामध्ये डाळवर्गीय व शेंगवर्गीय पिकांपासून जमिनीला नायट्रोजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शेतामध्ये मुख्य डाळिंब पिकासोबतच तूर, मूग, उडीद आदी सापळा पिकांच्या लागवडी केल्या. तसेच पिकाचे निघणारे अवशेष, गवत यांचा आच्छादन म्हणून वापर केला. त्यामुळे जमिनीतील ह्युमस वाढतो. त्या शेतामध्ये मित्रकीटकांची पैदास होते. हेच गांडूळ जमिनीतील पिकासाठी उपयुक्त असणारे घटक विष्ठेच्या रूपात पिकांच्या मुळापर्यंत आणतात. त्यामुळे पिकांना बाहेरील खतांची गरज पडत नाही. नैसर्गिक आहार पिकाला मिळाल्याने झाडांची फळधारणा व वजनदेखील वाढले़>रोज प्रतिलिटर ५० रुपयांनी दूध विकले जात आहे. भिगवण येथे पॅकिंग करून दूध विकले जात आहे. एक गीर गाय दिवसाला १० ते १२ लिटर दूध देत आहे. पवार यांच्याकडे अशा ६ गीर, १ कांक्रेज गाय, ५ गीर कालवडी आहेत. या गार्इंच्या तुपाला पुणे, रायगड, मुंबई भागातून चांगली मागणी आहे. तुपाला चांगला भाव येत आहे. चांगल्या बाजारभावामुळे विदेशी वंशाच्या गार्इंंपेक्षा देशी गाय अधिक उत्पन्न व शेतीला उपयुक्त असे शेण व गोमूत्र देत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नसल्याने येणारा पैसा हे निव्वळ उत्पन्न आहे, असेही पवार यांनी सांगितले.