शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

११०० आदिवासी आश्रमशाळांची १ आॅगस्टपासून तपासणी मोहीम

By admin | Updated: July 30, 2014 01:15 IST

राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नेमकी अवस्था काय याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अहवाल मागितला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील ११०० आश्रमशाळांच्या तपासणीचा कार्यक्रम

कार्यक्रम जाहीर : उच्च न्यायालयाने अहवाल मागितला राजेश निस्ताने - यवतमाळ राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नेमकी अवस्था काय याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अहवाल मागितला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील ११०० आश्रमशाळांच्या तपासणीचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला. आदिवासी विकास विभागाने २८ जुलै २०१४ रोजी या तपासणीसंबंधी आदेश जारी केला आहे. त्यात १ आॅगस्टपासून शाळा तपासणीचा कार्यक्रम सुरू होणार असून १९ आॅगस्टपर्यंत आदिवासी विकास आयुक्तांना न्यायालयात निष्कर्ष आणि कार्यवाहीसह अहवाल सादर करायचा आहे. आदिवासी आश्रमशाळांच्या दैनावस्थेवर रवींद्र तळपे व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (६९/२०१३) दाखल केली होती. त्यावर न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. डी. कोदे यांच्या न्यायालयाने १८ जून २०१४ रोजी निर्णय देताना आश्रमशाळा तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार आदिवासी विभागाने शाळा तपासणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) यांना १ आॅगस्टपर्यंत तालुकानिहाय तपासणी समित्या गठित करायच्या आहेत. या समित्यांना १२ आॅगस्टपर्यंत आपला अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. ते संपूर्ण जिल्ह्याचा संयुक्त अहवाल आदिवासी विकास अपर आयुक्तांकडे १४ आॅगस्टपर्यंत सादर करतील. आदिवासी विकास अपर आयुक्त हा अहवाल १६ आॅगस्टपूर्वी नाशिकच्या आदिवासी आयुक्तांना तर ते आपला अंतिम अहवाल १९ आॅगस्टला मुंबई उच्च न्यायालयात सादर करतील. महाराष्ट्रात ५५२ शासकीय तर ५५० अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये सन २००१ ते २०१२ या काळात सर्पदंश, आजार, विषबाधा, दूषित पाणी, निकृष्ट आहार, पुरेशा सोईसुविधांचा अभाव यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आश्रमशाळांमध्ये शाळासंहितेचे पालन केले जात नाही, सानुग्रह अनुदान मिळूनही विद्यार्थ्यांना सोईसुविधा मिळत नाही. आश्रमशाळांमध्ये पिण्याचे पाणी, पोषक आहार, स्वच्छता, मूलभूत सुविधा आदींचा अभाव आहे. कागदावर मात्र या सर्व सोईसुविधा उपलब्ध असल्याचे दाखविले जाते. त्यासाठी आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना मॅनेज केले जाते. ते भेटी न देताच ‘उत्तम’ व्यवस्थेचा अहवाल दरवर्षी देतात. परंतु यावेळी मात्र थेट उच्च न्यायालयाचे चौकशी समित्यांवर अप्रत्यक्ष नियंत्रण असल्याने मॅनेज अहवाल दाखल होण्याची शक्यता कमी आहे. आश्रमशाळांच्या तपासणीसाठी जाणाऱ्या समित्यांनाही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आश्रमशाळांची अकस्मात तपासणी करावी, शक्यतोवर दुपारी अथवा सायंकाळच्या जेवणाची वेळ निवडावी, वर्ग खोल्या, वसतिगृह, स्वयंपाकगृह, भोजनगृह, कोठीगृह, शौचालये, स्नानगृह, पिण्याचे पाणी या सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष भेट देऊन खात्री-पाहणी करावी, मुलांशी गटागटाने चर्चा करावी, या चर्चेच्यावेळी शिक्षक, आश्रमशाळा कर्मचारी अथवा संस्थेचा कुणीही सदस्य तेथे उपलब्ध असू नये, विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, लेखन सामुग्री वेळेत आणि पुरेशी मिळते की नाही आदी बाबींची तपासणी करण्याचे निर्देश या पथकांना आहे. राज्यात चार झोन तयार करून ही तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत हयगय झाल्यास आणि वास्तव दडपल्यास उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद आहे. ‘लोकमत’ने केले होते स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’ने १५ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या स्थितीचे स्टिंग आॅपरेशन केले होते. प्रकल्प अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण असलेल्या तीन आश्रमशाळा प्रातिनिधीक स्वरूपात निवडण्यात आल्या होत्या. त्या आश्रमशाळांमध्ये प्रत्यक्ष शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन आठवडे लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांचा पत्ता नव्हता. आश्रमशाळांच्या वर्ग खोल्या बंद तर तेथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात गावागावात फिरत असल्याचे चित्र पहायला मिळाले. हेच चित्र जिल्ह्यातील ९९ टक्के आदिवासी आश्रमशाळांचे असल्याची बाबही पुढे आली होती. आता स्वतंत्र पथकांद्वारे या आश्रमशाळांची व तेथील सोईसुविधांची तपासणी होणार असल्याने आणखी भयान वास्तव पुढे येण्याची शक्यता आहे. शासनाचे अनुदान घेणाऱ्या बहुतांश आदिवासी आश्रमशाळा राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी, मंत्री-आमदार व पदाधिकाऱ्यांच्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत तरी या आश्रमशाळांच्या अर्थात पुढाऱ्यांच्या विरोधात जाऊन वास्तव अहवाल देण्याची हिंमत आदिवासी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेली नाही. आता उच्च न्यायालयाचे नियंत्रण असलेली ही तपास पथके काय अहवाल देतात याकडे लक्ष लागले आहे.