शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

चव्हाण सर्वात लाचार मुख्यमंत्री - खडसे

By admin | Updated: June 1, 2014 16:03 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १ -   सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांशी जमत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.   

उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशन होत असून विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. सत्ताधारी आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहे. रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. विरोधकांनी नेहमी प्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. सरकारला दलित महिलांवर होणा-या अत्याचाराशी घेणदेणे नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला जात आहे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. राज्यात महायुतीला मतदान केल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील जनतेला धमकावत असून त्यांना वीज तोडण्याची धमकीही दिली जात आहे असा गंभीर आरोप खडसेंनी केला. यंदाच्या अधिवेशनात सिंचन घोटाळ्याचा अहवाल पटलावर यावा यासाठी पाठपुरावा करु असे खडसेंनी सांगितले. 

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विनोद तावडेंनी केली.मुख्यमंत्री स्वच्छ असल्याचा दिखावा करत असून ते भ्रष्टांची पाठराखणच करत आहेत. आदर्शमधील अधिका-यांनी त्यांनी सेवेत का घेतले असा सवालही तावडेंनी उपस्थित केला. गारपीट ग्रस्त शेतक-यांना अपुरी मदत केल्यावरही तावडेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्य सरकार कंत्राटदारांच्या बाजूला झुकली असून या सरकारने मोदींकडून काही तरी शिकायला पाहिजे असा टोलाही तावडेंनी लगावला. 

तर अजित पवार, आर.आर. पाटील व मुख्यमंत्री हे तिघे सरकारमधील खलनायक असून पराभवानंतरही आघाडी सरकारचे नेते सुधरायला तयार नाही. अजित पवार म्हणजे महाराष्ट्रावरचा कलंक आहे अशी घणाघाती टीका शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली.   या संपूर्ण पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाचे नेते राज्य सरकारवर निर्लज्ज, लाचार, कलंक अशा बोच-या शब्दात टीका करत असल्याने यंदाच्या अधिवेशनात विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरतील असे दिसते.