शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

भारतासमोर २२९ धावांचे आव्हान ; इंग्लंड ५० षटकात ७ बाद २२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:42 IST

लॉर्डसवर सुरु असलेल्या अत्यंत उत्कंठा वर्धक अशा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २२८ अशी धावा संख्या उभारली आहे .

ऑनलाईन लोकमत

लंडन - लॉर्डसवर सुरु असलेल्या अत्यंत उत्कंठा वर्धक अशा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २२८ अशी धावा संख्या उभारली आहे . आत्मविश्वासपूर्ण भारतीय संघ आता २२९ धावाचे आव्हान कसे पेलतो हे पाहणे आता नक्कीच क्रिकेटच्या चाहत्यांना पर्वणी ठरणारे असेल.

या निर्णायक अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या सुरवातीलाच भारतीय गोलंदाजाने टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजाला नामोहरम केले. झुलन गोस्वामी आणि शिखा पांडेनी यांनी अचूक गोलंदाजी करत सलामीच्या फलंदाजांना जम बसू दिला नाही. मात्र, भारतीय कर्णधार मिताली राज विकेटच्या प्रतीक्षेत होती. गोलंदाजी बदल म्हणून  राजने चेंडु फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडच्या हाती सोपवला.  राजेश्वरीची  गोलंदाजी दोन्ही फलंदाजांनी सहज खेळून काढत धावगती वाढवली. शेवटी राजेश्वरी गायकवाडनेच लॉरेन विनफील्डला (२४ धावा ) बोल्ड करत सलामीची जोडी फोडली. यावेळी धावसंख्या होती ११.१ षटकात ४७ वर १ बाद.
 
यानंतर पुनम यादवच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या महिला फलंदाज अडकल्या. पुनमने टॅमी बेमाँट (२३ धावा ) आणि कर्णधार हेदर नाईटला (१ धाव ) माघारी  धाडत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. ठराविक अंतराने पडलेल्या ३ विकेटमुळे गडगडलेला इंग्लंडचा डाव अखेर टेलर (४५ धावा ) व नतालीची या जोडीने सावरला. दोघींनी  जबरदस्त फलंदाजी करत ८६ धावांची भागीदारी केली. हि जोडी फुटल्यास इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरली.
 
ठराविक अंतराने फलंदाज बाद  होत राहिल्याने इंग्लंड २०० धावा हि करेल कि नाही हि  शंका होती. परंतु ; नताली शिवर ने एका बाजूने किल्ला लढवत ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या काही षटकात ,कॅथरीन ब्रन्ट ३४ धावा व जेनी गुन्न २५ धावा यांच्यामुळे इंग्लंडला २२८  अशी समाधान समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले. भारतातर्फे झुलन गोस्वामीने २३ धावदेत ३ तर पूनम यादवने ३६ धावादेत २ फलंदाजांना बाद केले.