शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भारतासमोर २२९ धावांचे आव्हान ; इंग्लंड ५० षटकात ७ बाद २२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 18:42 IST

लॉर्डसवर सुरु असलेल्या अत्यंत उत्कंठा वर्धक अशा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २२८ अशी धावा संख्या उभारली आहे .

ऑनलाईन लोकमत

लंडन - लॉर्डसवर सुरु असलेल्या अत्यंत उत्कंठा वर्धक अशा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २२८ अशी धावा संख्या उभारली आहे . आत्मविश्वासपूर्ण भारतीय संघ आता २२९ धावाचे आव्हान कसे पेलतो हे पाहणे आता नक्कीच क्रिकेटच्या चाहत्यांना पर्वणी ठरणारे असेल.

या निर्णायक अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या सुरवातीलाच भारतीय गोलंदाजाने टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजाला नामोहरम केले. झुलन गोस्वामी आणि शिखा पांडेनी यांनी अचूक गोलंदाजी करत सलामीच्या फलंदाजांना जम बसू दिला नाही. मात्र, भारतीय कर्णधार मिताली राज विकेटच्या प्रतीक्षेत होती. गोलंदाजी बदल म्हणून  राजने चेंडु फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडच्या हाती सोपवला.  राजेश्वरीची  गोलंदाजी दोन्ही फलंदाजांनी सहज खेळून काढत धावगती वाढवली. शेवटी राजेश्वरी गायकवाडनेच लॉरेन विनफील्डला (२४ धावा ) बोल्ड करत सलामीची जोडी फोडली. यावेळी धावसंख्या होती ११.१ षटकात ४७ वर १ बाद.
 
यानंतर पुनम यादवच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या महिला फलंदाज अडकल्या. पुनमने टॅमी बेमाँट (२३ धावा ) आणि कर्णधार हेदर नाईटला (१ धाव ) माघारी  धाडत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. ठराविक अंतराने पडलेल्या ३ विकेटमुळे गडगडलेला इंग्लंडचा डाव अखेर टेलर (४५ धावा ) व नतालीची या जोडीने सावरला. दोघींनी  जबरदस्त फलंदाजी करत ८६ धावांची भागीदारी केली. हि जोडी फुटल्यास इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरली.
 
ठराविक अंतराने फलंदाज बाद  होत राहिल्याने इंग्लंड २०० धावा हि करेल कि नाही हि  शंका होती. परंतु ; नताली शिवर ने एका बाजूने किल्ला लढवत ५१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या काही षटकात ,कॅथरीन ब्रन्ट ३४ धावा व जेनी गुन्न २५ धावा यांच्यामुळे इंग्लंडला २२८  अशी समाधान समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले. भारतातर्फे झुलन गोस्वामीने २३ धावदेत ३ तर पूनम यादवने ३६ धावादेत २ फलंदाजांना बाद केले.