शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अधिकाऱ्यांवर १० वर्षांनी घोटाळ्याचे आरोपपत्र

By admin | Updated: September 13, 2016 06:22 IST

रस्ते घोटाळ्याच्या प्रकरणात दोषींविरोधात वेगाने पावले उचलण्यात आली तरी अशा बऱ्याच घोटाळयांचे अहवाल येण्यास वर्षानुवर्षे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंबई : रस्ते घोटाळ्याच्या प्रकरणात दोषींविरोधात वेगाने पावले उचलण्यात आली तरी अशा बऱ्याच घोटाळ््यांचे अहवाल येण्यास वर्षानुवर्षे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विभागस्तरावर करण्यात येणाऱ्या नागरी कामांमध्ये २००५ मध्ये झालेल्या घोटाळ्यांचा अहवाल तब्बल १० वर्षांनंतर उघड झाला आहे. या प्रकरणात १२ अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यापैकी निम्मे अधिकारी सेवेतून निवृत्त झाले असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमोटो दाखल करून चौकशी सुरू केली आहे.विभागस्तरावर केल्या जाणाऱ्या छोट्या-छोट्या नागरी कामांमध्ये हा गैरव्यवहार २००५ ते २००९ या काळात झाला होता. ठेकेदारांची बिले अदा न केल्याप्रकरणी पालिकेच्या प्रचलन विभागातील १२ अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती. २०१२ मध्ये या अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, उपायुक्त (दक्षता) एम. एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतून ए. आय. कोठारी, एस. पी. शहा आणि पी. एस. तिकोणे या तीन अभियत्यांना दोषमुक्त करण्यात आले. मात्र अन्य ९ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या दोषी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेवर अमंलबजावणीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे. मात्र कारवाईची शिफारस करण्यात आलेले नऊपैकी सहा अधिकारी हे यापूर्वीच सेवेतून निवृत्त झाले आहेत. वेतनवाढ रोखलीनरेश हमंद या अधिकाऱ्याची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर ए. हवाळ यांचे वेतन एक टप्प्याने कमी करण्यात आले आहे. भरत पाटील यांच्याकडून ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)के. एस. उत्तेकर, ए. पाठक, ए. ए. कुंटे, के. पी. देवरे हे चार अधिकारी पाच वर्षांपूर्वीच सेवेतून निवृत्त झाले असल्याने नियमांनुसार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आले आहे. तर वी. देसाई आणि एस. संभारे हे अधिकारी दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले असल्याने त्यांच्या निवृत्ती वेतनातून दरमहा दोन हजार रुपये कापून घेतले जाणार आहेत.