शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

शिवसेनेच्या मंत्र्यावर ५०० कोटीच्या घोटाळयाचा आरोप

By admin | Updated: August 17, 2016 16:31 IST

भाजपा नंतर आम आदमी पक्षाने आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर आपला मोर्चा वळवला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - भाजपा नंतर आम आदमी पक्षाने आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर आपला मोर्चा वळवला आहे. जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे वजनदार नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणा-या अर्जुन खोतकरांवर आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 
 
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खोतकरांनी ५०० कोटींचा घोटाळा केला असा मेनन यांनी आरोप केला. अर्जुन खोतकर जालना एपीएमसी मार्केटमधील घोटाळयाचे सूत्रधार आहेत. जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांविरोधात बोलणा-यांचे खून होतात असा आरोप मेनन यांनी केला. 
 
खोतकरांनी बजाज, नाथानी कुटुंबाला फायदा मिळवून दिला तसेच खोतकरांशी संबंधित ४० लोकांनाच गाळे मिळाल्याचा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केला. अर्जुन खोतकर महाराष्ट्र सरकारमध्ये कपडा, दुग्धविकास आणि मत्स्य खात्याचे राज्यमंत्री आहेत. चौथ्यांदा ते जालन्यातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. राज्यात १९९९ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना ते राज्यमंत्री होते.