शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

आजपासून नियमांत बदल : किराणा माल मिळेल प्लॅस्टिकच्या पिशव्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 07:18 IST

प्लॅस्टिक बंदीनंतर विविध अडचणींमुळे छोट्या व्यावसायिकांमधून संताप होत असल्याने बुधवारी अवघ्या चार दिवसांत राज्य सरकारने माघार घेतली.

मुंबई : प्लॅस्टिक बंदीनंतर विविध अडचणींमुळे छोट्या व्यावसायिकांमधून संताप होत असल्याने बुधवारी अवघ्या चार दिवसांत राज्य सरकारने माघार घेतली. काही अटी आणि शर्तींसह किराणा दुकानांवरच्या पॅकेजिंगवरची बंदी गुरूवारपासून उठविण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केले. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.किराणा व भुसार मालाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात आलेले प्लॅस्टिक परत घेणे तसेच त्याची विल्हेवाट लावण्याचे दुकानदारांनी मान्य केले आहे. त्यानुसार ही मुभा देण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. मात्र, ही मुभा फक्त किराणा दुकानदारांना- त्यातही फक्त पॅकिंगसाठी देण्यात आली आहे. किरकोळ दुकानदार आणि उत्पादकांनी उत्पादित प्लॅस्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी, पॅकिंगवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्लॅस्टिकचा दर्जा छापावा, अशी अट घातल्याचे कदम म्हणाले. प्लॅस्टिकबंदीतून अनेक बड्या कंपन्यांना सूट देत केवळ छोट्या विक्रेत्यांवर राज्यभर दंडाची कारवाई सुरू झाली. सरकारच्या भेदभाव नीतीमुळे छोटे व्यापारी बंदीविरोधात एकवटले.बंदी उठविली; छोट्या व्यापाऱ्यांना दिलासामसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावरील बंदी मात्र तशीच लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे किरकोळ दुकानदारांनाही दिलासा देण्याची मागणी छोट्या व्यापाºयांनी केली होती. मात्र, त्याकडे सुरवातीला कानाडोळा करण्यात आला होता. व्यापाºयांच्या वाढत्या दबावानंतर किराणा दुकानदारांना पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिक वापराची मुभा देण्यात आली आहे.प्लॅस्टिकबंदीवरून सुरू राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात रामदास कदम आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. बंदीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच भावी पिढ्यांसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे आदित्य यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. देशातील १७ राज्यांत प्लॅस्टिकबंदी आहे. सहा महिने या सर्वांचा अभ्यास करूनच बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.बड्या उद्योजकांना एक न्याय आणि छोट्या व्यापाºयांबाबत एक न्याय सरकारने केला होता, ही बाब ‘लोकमत’ने सगळ््यात आधी समोर आणली होती. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे हा निर्णय झाल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी