शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आजपासून नियमांत बदल : किराणा माल मिळेल प्लॅस्टिकच्या पिशव्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 07:18 IST

प्लॅस्टिक बंदीनंतर विविध अडचणींमुळे छोट्या व्यावसायिकांमधून संताप होत असल्याने बुधवारी अवघ्या चार दिवसांत राज्य सरकारने माघार घेतली.

मुंबई : प्लॅस्टिक बंदीनंतर विविध अडचणींमुळे छोट्या व्यावसायिकांमधून संताप होत असल्याने बुधवारी अवघ्या चार दिवसांत राज्य सरकारने माघार घेतली. काही अटी आणि शर्तींसह किराणा दुकानांवरच्या पॅकेजिंगवरची बंदी गुरूवारपासून उठविण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केले. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.किराणा व भुसार मालाच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात आलेले प्लॅस्टिक परत घेणे तसेच त्याची विल्हेवाट लावण्याचे दुकानदारांनी मान्य केले आहे. त्यानुसार ही मुभा देण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. मात्र, ही मुभा फक्त किराणा दुकानदारांना- त्यातही फक्त पॅकिंगसाठी देण्यात आली आहे. किरकोळ दुकानदार आणि उत्पादकांनी उत्पादित प्लॅस्टिक पॅकेजिंगची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारावी, पॅकिंगवर उत्पादकाचे नाव, पत्ता, प्लॅस्टिकचा दर्जा छापावा, अशी अट घातल्याचे कदम म्हणाले. प्लॅस्टिकबंदीतून अनेक बड्या कंपन्यांना सूट देत केवळ छोट्या विक्रेत्यांवर राज्यभर दंडाची कारवाई सुरू झाली. सरकारच्या भेदभाव नीतीमुळे छोटे व्यापारी बंदीविरोधात एकवटले.बंदी उठविली; छोट्या व्यापाऱ्यांना दिलासामसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी रिटेल पॅकिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावरील बंदी मात्र तशीच लागू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रँडेड आणि मोठ्या पॅकेजिंग उत्पादकांप्रमाणे किरकोळ दुकानदारांनाही दिलासा देण्याची मागणी छोट्या व्यापाºयांनी केली होती. मात्र, त्याकडे सुरवातीला कानाडोळा करण्यात आला होता. व्यापाºयांच्या वाढत्या दबावानंतर किराणा दुकानदारांना पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिक वापराची मुभा देण्यात आली आहे.प्लॅस्टिकबंदीवरून सुरू राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात रामदास कदम आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. बंदीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच भावी पिढ्यांसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे आदित्य यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. देशातील १७ राज्यांत प्लॅस्टिकबंदी आहे. सहा महिने या सर्वांचा अभ्यास करूनच बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.बड्या उद्योजकांना एक न्याय आणि छोट्या व्यापाºयांबाबत एक न्याय सरकारने केला होता, ही बाब ‘लोकमत’ने सगळ््यात आधी समोर आणली होती. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे हा निर्णय झाल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी