शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

अकरावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल

By admin | Updated: July 17, 2017 21:52 IST

देशपातळीवरील नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून...

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 17 : देशपातळीवरील नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावी व बारावीच्या विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. त्यानुसार आता पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला महत्व प्राप्त झाले आहे. प्रश्नांचे बहुपर्याय बंद करण्यात आले असून एका प्रश्नाला त्याच घटकातील प्रश्नाचा पर्याय राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक शिकवावा लागणार असून घोकंपट्टीलाही मर्यादा येणार आहे.राज्यातील विद्यार्थ्यांना नीट व जेईई या परीक्षांना सामोरे जाताना खुप अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून सतत केल्या जात होत्या. मंडळाचा अभ्यासक्रम तसेच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप योग्य नसल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार मंडळाकडून अभ्यासक्रमात बदल करण्यापासून प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याबाबत सातत्याने चाचपणी करण्यात आली. त्यातच कौन्सिल आॅफ बोर्ड्स आॅफ स्कुल एज्युकेशन इन इंडियाने (कॉब्से) देशातील इयत्ता अकरावी व बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र या चार विषयांच्या परीक्षांचे देशपातळीवर एकाच पध्दतीचे आराखडे तयार केले होते. त्याप्रमाणे राज्य मंडळाने नीट व जेईई परीक्षा तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे नवीन आराखडे तयार केले आहेत. राज्य शासनाकडूनही या आराखड्यांना मान्यता मिळाली असून चालु शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीसाठी त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. तर इयत्ता बारावीची फेब्रुवारी २०१९ मधील परीक्षा सुधारीत आराखड्यानुसार असेल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.चारही विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदलताना प्रचलित अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयाच्या १०० गुणांपैकी लेखी परीक्षा ७०, तर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतील. गणित आणि संख्याशास्त्र विषयासाठी ८० गुणांची लेखी, तर २० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतील. लेखी परीक्षेसाठी प्रत्येकी एकच प्रश्नपत्रिका व एकच उत्तरपत्रिका राहील. या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर राहतील. प्रात्यक्षिक परीक्षांच्या आराखड्यातही बदल करण्यात आलेला नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करताना प्रामुख्याने नीट, जेईई तसेच देशपातळीवरील इतर प्रवेश परीक्षांचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी येत होत्या. सुधारीत प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यामुळे या परीक्षांना सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत. पुर्वी प्रश्नपत्रिकांमध्ये चार-पाच प्रश्न देवून त्यातील दोन-तीन प्रश्न सोडविण्यास सांगितले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पर्याय मिळत होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. सुधारीत आराखड्यामध्ये एका प्रश्नाला एकच पर्यायी प्रश्न असेल. हे प्रश्नही पाठ्यपुस्तकातील एकाच घटकाशी संंबंधित असणार आहे. तसेच काठिण्यपातळीही नीट व जेईई प्रमाणे ठरविण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना आता अभ्यासक्रमातील कोणताही घटक बाजुला ठेवता येणार नाही. प्रत्येक घटक शिकवावाच लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही केवळ पाठांतर करून भागणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.