शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘समाजाचा दृष्टिकोन स्वत:च बदला’

By admin | Updated: July 4, 2016 03:39 IST

चांगल्या विचारांशी संगत करा. केवळ स्वत:चाच विचार न करता समाजासाठीदेखील चांगले करण्याची तयारी ठेवा.

ठाणे : चांगल्या विचारांशी संगत करा. केवळ स्वत:चाच विचार न करता समाजासाठीदेखील चांगले करण्याची तयारी ठेवा. समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही स्वत:च बदला, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश शिंदे यांनी केले. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींना ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शनिवारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदींकरिता व्यसनमुक्ती सप्ताह सांगता कार्यक्रम झाला. या वेळी आरोपमुक्त झाल्यावर भविष्यात कसे जगायचे, यावर प्रा. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आरोपमुक्त झाल्यावर कारागृहातून बाहेर पडल्यावर माणूस म्हणून कसे जगायचे, हा विचार प्रथम केला पाहिजे. नकळत आपल्या हातून वाईट गोष्टी घडल्या असतील. परंतु, येथून बाहेर पडल्यावर चांगल्या लोकांशी संगत करून स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे. पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता चांगला मार्ग पत्करावा, असे सांगताना देशासाठी लढलेल्या अनेक क्रांतिकारकांची उदाहरणे त्यांनी या वेळी उपस्थित बंदींना दिली. ।कारागृहातून सुटून बाहेर पडल्यानंतरही अनेकांना दोषी असल्यासारखे वाटत असते. मात्र, ही भावना मनात न ठेवता सतत चांगल्या गोष्टींचा विचार मनाशी असावा. वाल्याचा वाल्मीकी कसा झाला, याचे उदाहरण दिले. त्यानंतर, नशाबंदी मंडळाचे महाराष्ट्र राज्य प्रचारक रामकृष्ण दिगरसकर यांनी शायरी आणि गाण्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती या विषयावर उपस्थित बंदींचे प्रबोधन केले. कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव, उपअधीक्षक अंकुश सदाफुले, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आर.बी. जुटाळ उपस्थित होते.