शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे

By admin | Updated: September 16, 2014 02:42 IST

मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत,

कोल्हापूर : तत्कालीन संयुक्त पुरोगामी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी कधी घातली नाही, घातली तर चोवीस तासांत उठविण्याचे काम केले; पण मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावाच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवारी कोल्हापुरात होणा:या प्रचार प्रारंभ मेळाव्यासाठी पवार आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
साखर दर घसरल्याने आगामी हंगामात साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढणार आहेत, अशा परिस्थितीत संसदेत निर्णय बदलण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले पाहिजे; पण काही मंडळी संसदेऐवजी बारामती व कोल्हापुरातच निर्णय बदलतात, असे वाटते असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला. दोन्ही काँग्रेसचे जागावाटप संपले की, समविचारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. 
ठीक राहायचे असेल तर कोल्हापुरातच यावे लागते
कोल्हापुरातून प्रचार प्रारंभाचे रहस्य विचारले असता, पवार म्हणाले, गेल्या 35 वर्षात माङया प्रत्येक निवडणुकीची सुरुवात कोल्हापुरातून करतो. हे माङो आजोळ असल्याने आवडते असेल हा भाग वेगळा आहे; पण रस्ता ठीक असेल तर येथील जनता पाठीशी राहते, जर ठीक नसेल तर जागाही दाखविते. त्यामुळे ठीक राहण्यासाठी कोल्हापुरात यावेच लागते. 
आर.आर यांच्या विजयाबद्दल शंका नाही
गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या विजयाबद्दल माङया मनात कोणतीही शंका नाही. जे लोक आज त्यांच्याविरोधात उतरले आहेत, त्यांच्याशी टक्कर देऊनच ते राजकारणात मोठे झाले असल्याने तासगाव मतदारसंघातील जनता या निवडणुकीतही त्यांनाच बळ देईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) 
 
बारामतीचा टोल रद्द झाला कारण त्यांनी संबंधित रस्ते विकास कंपनीला नगरपालिकेच्या मालकीची वीस एकर जागा दिली. जे रस्ते नगरपालिका अथवा महापालिकेने स्वत: ठराव करून केले आहेत, रस्त्यांच्या खर्चाचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच येते. त्यामुळे तसा काय तोडगा कोल्हापूरच्या टोलप्रश्नात काढता येईल का, याचा विचार जरूर करता येईल. या प्रश्नात लक्ष द्यायला मला आनंदच वाटेल; परंतु त्यासाठी आमचे सरकार येऊन तसा अधिकार आम्हाला मिळाला तर अत्यानंद वाटेल, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
 
हसन मुश्रीफ यांनी टोल पंचगंगा नदीत बुडविण्याची घोषणा केली; परंतु तो रद्द झाला नाही. यामुळे लोकांत नाराजी असून, त्यांनी आंदोलन सुरू केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले,‘टोल विरोधी कृती समितीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी फॅक्सवर मिळाले. परंतु याबाबत कृती समितीच्या प्रतिनिधींनी माङयाशी चर्चा केलेली नाही, असे ते म्हणाल़े