शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे

By admin | Updated: September 16, 2014 02:42 IST

मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत,

कोल्हापूर : तत्कालीन संयुक्त पुरोगामी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी कधी घातली नाही, घातली तर चोवीस तासांत उठविण्याचे काम केले; पण मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावाच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवारी कोल्हापुरात होणा:या प्रचार प्रारंभ मेळाव्यासाठी पवार आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
साखर दर घसरल्याने आगामी हंगामात साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढणार आहेत, अशा परिस्थितीत संसदेत निर्णय बदलण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले पाहिजे; पण काही मंडळी संसदेऐवजी बारामती व कोल्हापुरातच निर्णय बदलतात, असे वाटते असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला. दोन्ही काँग्रेसचे जागावाटप संपले की, समविचारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. 
ठीक राहायचे असेल तर कोल्हापुरातच यावे लागते
कोल्हापुरातून प्रचार प्रारंभाचे रहस्य विचारले असता, पवार म्हणाले, गेल्या 35 वर्षात माङया प्रत्येक निवडणुकीची सुरुवात कोल्हापुरातून करतो. हे माङो आजोळ असल्याने आवडते असेल हा भाग वेगळा आहे; पण रस्ता ठीक असेल तर येथील जनता पाठीशी राहते, जर ठीक नसेल तर जागाही दाखविते. त्यामुळे ठीक राहण्यासाठी कोल्हापुरात यावेच लागते. 
आर.आर यांच्या विजयाबद्दल शंका नाही
गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या विजयाबद्दल माङया मनात कोणतीही शंका नाही. जे लोक आज त्यांच्याविरोधात उतरले आहेत, त्यांच्याशी टक्कर देऊनच ते राजकारणात मोठे झाले असल्याने तासगाव मतदारसंघातील जनता या निवडणुकीतही त्यांनाच बळ देईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) 
 
बारामतीचा टोल रद्द झाला कारण त्यांनी संबंधित रस्ते विकास कंपनीला नगरपालिकेच्या मालकीची वीस एकर जागा दिली. जे रस्ते नगरपालिका अथवा महापालिकेने स्वत: ठराव करून केले आहेत, रस्त्यांच्या खर्चाचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच येते. त्यामुळे तसा काय तोडगा कोल्हापूरच्या टोलप्रश्नात काढता येईल का, याचा विचार जरूर करता येईल. या प्रश्नात लक्ष द्यायला मला आनंदच वाटेल; परंतु त्यासाठी आमचे सरकार येऊन तसा अधिकार आम्हाला मिळाला तर अत्यानंद वाटेल, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
 
हसन मुश्रीफ यांनी टोल पंचगंगा नदीत बुडविण्याची घोषणा केली; परंतु तो रद्द झाला नाही. यामुळे लोकांत नाराजी असून, त्यांनी आंदोलन सुरू केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले,‘टोल विरोधी कृती समितीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी फॅक्सवर मिळाले. परंतु याबाबत कृती समितीच्या प्रतिनिधींनी माङयाशी चर्चा केलेली नाही, असे ते म्हणाल़े