शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालये, शाळांच्या वेळा बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 03:04 IST

मुंबईत लोकल प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला. पाच वाजताच महाविद्यालये सुटली पाहिजेत किंवा सरकारी कार्यालयाचे कामकाज

मुंबई : मुंबईत लोकल प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला. पाच वाजताच महाविद्यालये सुटली पाहिजेत किंवा सरकारी कार्यालयाचे कामकाज संपले पाहिजे, ही पद्धत आता बदला. लोकांच्या जिवापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही. राज्य सरकारने आता जागे व्हावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलचा एक डबा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र ज्येष्ठ नागरिक ए.बी. ठक्कर यांनी उच्च न्यायालयाला पाठवले होते. या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयाने सुओमोटो दाखल करून घेतले. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती.या सुनावणीवेळीच खंडपीठाने गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असलेचा मुद्द्यावरून सरकारला अनेक सुचना केल्या. लोकलची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यालये, महाविद्यालये-शाळेच्या वेळा आणि आठवड्याची सुटी बदलण्याबाबत गांभीर्याने विचार करा, अशी सूचनाही खंडपीठाने केली. तसेच लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीवर रेल्वेचे नियंत्रण का नाही, अशी विचारणा करत खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला लोकलच्या काही मार्गांवर लोकल चालवण्याचे अधिकार राज्य सरकार आणि महापालिकेला देण्याची सूचना केली. राज्य सरकार लोकल चालवणार का, असा सवाल करत खंडपीठाने एका आठवड्यात सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे.ज्येष्ठांसाठी काय केले?लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण डबा न देता केवळ एक दरवाजा आणि फक्त १४ आसने का उपलब्ध करून दिली जातात, असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे बोर्डाला याविषयी काही उपाय सुचवण्यास सांगितले होते.यासंदर्भात रेल्वेच्या वतीने बुधवारी प्रतिज्ञापत्र पत्र सादर करत माहिती दिली की, सध्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आकडेवारी १ टक्का आहे. त्यामुळे इतरांची प्रचंड गर्दी लक्षात घेता एक दरवाजा आणि १४ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करणे शक्य आहे. याशिवाय प्रत्येक स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्प डेस्क उभारलेले आहेत. या ठिकाणी पोलीस उपस्थित असतात, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र यावर समाधान न झाल्यामुळे खंडपीठाने रेल्वेला या संदर्भात काही ठोस उपाय सुचवण्यास सांगितले. (प्रतिनिधी) जखमींसाठी पुढाकार घ्यावा...रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करा. अपघात झालेल्या पीडिताला झालेली जखम गंभीर स्वरूपाची असते. त्यामुळे स्टेशन मास्तर येईपर्यंत वाट न पाहता लोकांनी पीडिताला रुग्णालयात दाखल करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही खंडपीठाने नागरिकांना केले.रबरी खांब असावालोकलच्या डब्यात चढण्यासाठी आधार असलेला स्टीलचा खांब रबरी करण्याची सूचनाही खंडपीठाने रेल्वे प्रशासनला केली. स्टीलच्या खांबामुळे लोकांच्या हाताची पकड सुटत असेल तर रबरी खांब उभे करा. त्यावर रेल्वेने प्रवासी याच स्टीलच्या खांबाचा आधार घेऊन लोकलमध्ये चढत असल्याने रबरी खांब बांधणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले.छोट्या बस चालवारेल्वेला बसचा पर्याय असल्याने खंडपीठाने रस्त्यावरून मोठ्या आकाराच्या बस चालवू नका, अशी सूचनाही केली. गर्दीच्या वेळेत रस्त्यावरही अत्यंत ट्रॅफिक असल्याने ते टाळण्यासाठी सरकारने मोठ्या बस चालवू नयेत. छोट्या बस चालवा. जेणेकरून अन्य वाहनांना पुढे सरकण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी सूचना खंडपीठाने सरकारला केली.