शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कार्यालये, शाळांच्या वेळा बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 03:04 IST

मुंबईत लोकल प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला. पाच वाजताच महाविद्यालये सुटली पाहिजेत किंवा सरकारी कार्यालयाचे कामकाज

मुंबई : मुंबईत लोकल प्रवास करताना गर्दीमुळे लोकांचा जीव जात असेल तर कामकाजाच्या वेळा बदला. पाच वाजताच महाविद्यालये सुटली पाहिजेत किंवा सरकारी कार्यालयाचे कामकाज संपले पाहिजे, ही पद्धत आता बदला. लोकांच्या जिवापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही. राज्य सरकारने आता जागे व्हावे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलचा एक डबा आरक्षित ठेवण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र ज्येष्ठ नागरिक ए.बी. ठक्कर यांनी उच्च न्यायालयाला पाठवले होते. या पत्राची गंभीर दखल घेत न्यायालयाने सुओमोटो दाखल करून घेतले. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठापुढे होती.या सुनावणीवेळीच खंडपीठाने गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असलेचा मुद्द्यावरून सरकारला अनेक सुचना केल्या. लोकलची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यालये, महाविद्यालये-शाळेच्या वेळा आणि आठवड्याची सुटी बदलण्याबाबत गांभीर्याने विचार करा, अशी सूचनाही खंडपीठाने केली. तसेच लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीवर रेल्वेचे नियंत्रण का नाही, अशी विचारणा करत खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला लोकलच्या काही मार्गांवर लोकल चालवण्याचे अधिकार राज्य सरकार आणि महापालिकेला देण्याची सूचना केली. राज्य सरकार लोकल चालवणार का, असा सवाल करत खंडपीठाने एका आठवड्यात सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे.ज्येष्ठांसाठी काय केले?लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण डबा न देता केवळ एक दरवाजा आणि फक्त १४ आसने का उपलब्ध करून दिली जातात, असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे बोर्डाला याविषयी काही उपाय सुचवण्यास सांगितले होते.यासंदर्भात रेल्वेच्या वतीने बुधवारी प्रतिज्ञापत्र पत्र सादर करत माहिती दिली की, सध्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आकडेवारी १ टक्का आहे. त्यामुळे इतरांची प्रचंड गर्दी लक्षात घेता एक दरवाजा आणि १४ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करणे शक्य आहे. याशिवाय प्रत्येक स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्प डेस्क उभारलेले आहेत. या ठिकाणी पोलीस उपस्थित असतात, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र यावर समाधान न झाल्यामुळे खंडपीठाने रेल्वेला या संदर्भात काही ठोस उपाय सुचवण्यास सांगितले. (प्रतिनिधी) जखमींसाठी पुढाकार घ्यावा...रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करा. अपघात झालेल्या पीडिताला झालेली जखम गंभीर स्वरूपाची असते. त्यामुळे स्टेशन मास्तर येईपर्यंत वाट न पाहता लोकांनी पीडिताला रुग्णालयात दाखल करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही खंडपीठाने नागरिकांना केले.रबरी खांब असावालोकलच्या डब्यात चढण्यासाठी आधार असलेला स्टीलचा खांब रबरी करण्याची सूचनाही खंडपीठाने रेल्वे प्रशासनला केली. स्टीलच्या खांबामुळे लोकांच्या हाताची पकड सुटत असेल तर रबरी खांब उभे करा. त्यावर रेल्वेने प्रवासी याच स्टीलच्या खांबाचा आधार घेऊन लोकलमध्ये चढत असल्याने रबरी खांब बांधणे शक्य नसल्याचे खंडपीठाला सांगितले.छोट्या बस चालवारेल्वेला बसचा पर्याय असल्याने खंडपीठाने रस्त्यावरून मोठ्या आकाराच्या बस चालवू नका, अशी सूचनाही केली. गर्दीच्या वेळेत रस्त्यावरही अत्यंत ट्रॅफिक असल्याने ते टाळण्यासाठी सरकारने मोठ्या बस चालवू नयेत. छोट्या बस चालवा. जेणेकरून अन्य वाहनांना पुढे सरकण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी सूचना खंडपीठाने सरकारला केली.