शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

चंद्रपूर हवामान बदलाचे ‘हॉटस्पॉट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:22 IST

जागतिक बँकेने गुरुवारी जगातील ‘टॉप टेन’ क्लॉयमेट चेंज हॉटस्पॉटची यादी जाहीर केली. या यादीत चार देशांतील प्रत्येकी १० जिल्ह्यांचा समावेश आहे.

राजेश भोजेकरचंद्रपूर : जागतिक बँकेने गुरुवारी जगातील ‘टॉप टेन’ क्लॉयमेट चेंज हॉटस्पॉटची यादी जाहीर केली. या यादीत चार देशांतील प्रत्येकी १० जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील दहामध्ये एकट्या विदर्भातील सात जिल्ह्यांचा सामवेश असून चंद्रपूर भारतातले हवामान बदलाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे.वाढत्या प्रदूषणामुळे चंद्रपूर जगातले प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रदूषणाचा येथील जनजीवनावरही विपरित परिणाम होत आहे. येथे पाऊसही अनियमित येतो. यावर्षी विदर्भ सर्वाधिक तापला होता. त्यातही चंद्रपूर जगातले सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. आता जागतिक बँकेच्या क्लॉयमेट चेंजच्या टॉपटेन यादीत चंद्रपूरचे नाव भारतातील दहा जिल्ह्यांमध्ये अग्रक्रमावर आहे.चंद्रपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांचाही यादीत समावेश आहे. सोबतच विदर्भाच्या सीमेवरील छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव व दुर्गसह मध्य प्रदेशातील होशंगाबाद या जिल्ह्याचा यात समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका या देशातील प्रत्येकी दहा जिल्हे क्लॉयमेट चेंजचे हॉटस्पॉट ठरले. या जिल्ह्यातील राहणीमान चंद्रपूर उणे १२.४ टक्के, गोंदिया व भंडारा उणे ११.८ टक्के, नागपूर उणे ११.७ टक्के, राजनांदगाव व दुर्ग उणे ११.४ टक्के, होशंगाबाद उणे ११.३ टक्के, यवतमाळ व गडचिरोली ११.१ टक्के असे असल्याचे अहवालात म्हटले आहे.वातावरण बदल भविष्यातही असाच कायम राहिल्यास भारतातील ६० टक्के जनजीवन प्रभावित होईल. नागरिकांच्या राहणीमानावार विपरित परिणाम दिसून येईल. याचा सर्वाधिक फटका मध्य, उत्तर आणि व उत्तर-पश्चिम भारताला बसेल. या भागातील शेती व्यवसाय डबघाईस येण्याची भीतीही या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. वाळवंटसदृश स्थिती निर्माण होण्याची भीतीही वर्तविली आहे. वाढत्या गरजांमुळे मानवाच्या राहणीमानात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. हे बदल वातावरण प्रभावित करणारे ठरले आहेत.