शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

चंद्रपूर हवामान बदलाचे ‘हॉटस्पॉट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:22 IST

जागतिक बँकेने गुरुवारी जगातील ‘टॉप टेन’ क्लॉयमेट चेंज हॉटस्पॉटची यादी जाहीर केली. या यादीत चार देशांतील प्रत्येकी १० जिल्ह्यांचा समावेश आहे.

राजेश भोजेकरचंद्रपूर : जागतिक बँकेने गुरुवारी जगातील ‘टॉप टेन’ क्लॉयमेट चेंज हॉटस्पॉटची यादी जाहीर केली. या यादीत चार देशांतील प्रत्येकी १० जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील दहामध्ये एकट्या विदर्भातील सात जिल्ह्यांचा सामवेश असून चंद्रपूर भारतातले हवामान बदलाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे.वाढत्या प्रदूषणामुळे चंद्रपूर जगातले प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रदूषणाचा येथील जनजीवनावरही विपरित परिणाम होत आहे. येथे पाऊसही अनियमित येतो. यावर्षी विदर्भ सर्वाधिक तापला होता. त्यातही चंद्रपूर जगातले सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. आता जागतिक बँकेच्या क्लॉयमेट चेंजच्या टॉपटेन यादीत चंद्रपूरचे नाव भारतातील दहा जिल्ह्यांमध्ये अग्रक्रमावर आहे.चंद्रपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांचाही यादीत समावेश आहे. सोबतच विदर्भाच्या सीमेवरील छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव व दुर्गसह मध्य प्रदेशातील होशंगाबाद या जिल्ह्याचा यात समावेश आहे. पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका या देशातील प्रत्येकी दहा जिल्हे क्लॉयमेट चेंजचे हॉटस्पॉट ठरले. या जिल्ह्यातील राहणीमान चंद्रपूर उणे १२.४ टक्के, गोंदिया व भंडारा उणे ११.८ टक्के, नागपूर उणे ११.७ टक्के, राजनांदगाव व दुर्ग उणे ११.४ टक्के, होशंगाबाद उणे ११.३ टक्के, यवतमाळ व गडचिरोली ११.१ टक्के असे असल्याचे अहवालात म्हटले आहे.वातावरण बदल भविष्यातही असाच कायम राहिल्यास भारतातील ६० टक्के जनजीवन प्रभावित होईल. नागरिकांच्या राहणीमानावार विपरित परिणाम दिसून येईल. याचा सर्वाधिक फटका मध्य, उत्तर आणि व उत्तर-पश्चिम भारताला बसेल. या भागातील शेती व्यवसाय डबघाईस येण्याची भीतीही या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. वाळवंटसदृश स्थिती निर्माण होण्याची भीतीही वर्तविली आहे. वाढत्या गरजांमुळे मानवाच्या राहणीमानात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. हे बदल वातावरण प्रभावित करणारे ठरले आहेत.