शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कसब्यातून चंद्रकांत पाटलांची चाचपणी ? टिळक, रासने, घाटेंचा पत्ता कट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 11:43 IST

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहे. परंतु, विरोधकांकडून कायमच त्यांच्यावर जनतेतून निवडून येत नसल्याचे सांगत टीका होते. त्यामुळे पाटील विधानसभा मतदार संघाच्या शोधात होतेच.

मुंबई - माजी कॅबिनेटमंत्री आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार गिरीश बापट यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर कसबा मतदार संघाची जागा रिक्त आहे. कसब्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी पुण्यातील भाजपनेत्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाला होती. परंतु, या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या महापौर मुक्ता टिळक, हेमंत रासने, धीरज घाटे आणि गणेश बीडकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी कसबा मतदार संघातून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी व्यासपिठावर गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांना विशेष स्थान देण्यात आले होते. त्यामुळे कसाबा मतदार संघातून स्वरदा यांचे नावही चर्चेत आले होते. परंतु, या मतदार संघातून प्रदेशाध्यक्षांचेच नाव समोर आल्याने इच्छूकांना आपली इच्छा मारावी लागणार आहे.

२०१४ पासून चंद्रकांत पाटील यांची राजकीय कारकिर्द बहरली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पाटील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांचे नेते मानले जाऊ लागले. त्यातच आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहे. परंतु, विरोधकांकडून कायमच त्यांच्यावर जनतेतून निवडून येत नसल्याचे सांगत टीका होते. त्यामुळे पाटील विधानसभा मतदार संघाच्या शोधात होतेच.

कसबा मतदार संघ अत्यंत सुरक्षित मतदार संघ मानला जातो. गिरीश बापट यांनी या मतदार संघावर २५ वर्षे एकछत्री अमंल राखले. सलग पाचवेळा गिरीश बापट या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती.

दरम्यान चंद्रकांत पाटील सध्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. विधानसभेला त्यांनी पुण्यातून प्रतिनिधीत्व केल्यास भाजपच्या विजयानंतर ते पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. कसबा मतदार संघ जरी बापट यांनी अभेद्य ठेवला असला तरी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा गड मानला जायचा. त्यामुळे पुण्यातील वर्चस्वासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चुरस लागणार हे निश्चित.