शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

रुपांशू गणवीरचा यशाचा चौकार

By admin | Updated: June 20, 2014 01:09 IST

स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची देखील तितकीच आवश्यकता असते. मार्गदर्शनाला योग्य प्रेरणा आणि प्रयत्नांची जोड मिळाली

बहिणीच्या मार्गदर्शनातून सापडली ‘आयआयटी’ची ‘किल्ली’नागपूर : स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची देखील तितकीच आवश्यकता असते. मार्गदर्शनाला योग्य प्रेरणा आणि प्रयत्नांची जोड मिळाली तर शिखराला गवसणी सहज घालता येते. हीच बाब ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये मागासवर्गीयांमधून प्रथम येऊन देशात नागपूरचे नाव उंचावणाऱ्या व शिवाजी सायन्सचा विद्यार्थी असलेल्या रुपांशू गणवीरच्या संदर्भात सत्यात उतरली आहे. अगदी शालेय जीवनापासून ते आता ‘आयआयटी’च्या प्रवेश वाटेपर्यंत त्याला थोरली बहीण सुरभी हिने सातत्याने प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे सुरभी हिने नुकतेच ‘आयआयटी-हैदराबाद’ येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.रुपांशू गणवीर याने ‘जेईई-मेन्स’या परीक्षेत उपराजधानीतून प्रथम स्थान पटकाविले होते अन् आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये देशपातळीवर २४ वा क्रमांक मिळवून त्याने ‘डबल’ यश मिळविले आहे. त्याच्या यशात सर्वात जास्त वाटा आहे तो त्याचा थोरल्या बहिणीचा. ‘आयआयटी’त प्रवेश मिळविण्यासाठी कशाप्रकारे अन् किती खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो याची जाणीव तिने रुपांशूला आठव्या वर्गातच करून दिली होती. ती स्वत: हैदराबादमध्ये शिक्षणाला असली तरी सातत्याने ती फोन व इंटरनेटच्या माध्यमातून रुपांशूला मार्गदर्शन करीत होती. अभ्यास करणे तर रुपांशूच्या हातातच होते, परंतु त्याला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम सुरभीने केले. ‘जेईई-मेन्स’चा निकाल लागल्यानंतर सुरभी रुपांशूसोबत सातत्याने होती. गुरुवारी निकाल लागल्यानंतर रुपांशूला सर्वात पहिला पेढा सुरभीनेच भरविला. माझ्या वेळेस मला मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. परंतु रुपांशूच्या बौद्धिक क्षमतेवर आम्हाला विश्वास होता. मी केवळ त्याला प्रोत्साहन दिले, असे मत सुरभी गणवीर हिने व्यक्त केले. रुपांशूचे वडील सूरज गणवीर हे अमरावती येथे ‘एमएसईडीसीएल’मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत तर त्याची आई गृहिणी आहे.रुपांशूने ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये यश मिळविले असले तरी ‘आयआयटी’च्या अगोदरच देशातील नामवंत संस्थांमध्ये त्याचा प्रवेश निश्चित झाला होता. अकरावीत असतानाच ‘आयआयएससी-बेंगळुरू’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स) येथे प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘केव्हीपीआय’च्या (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) परीक्षेत त्याने देशपातळीवर ३२ वा क्रमांक पटकाविला होता. ‘बिट्स-पिलानी’ येथे प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षेतदेखील त्याने ४५० पैकी ४२७ गुण मिळविले. बारावीच्या परीक्षेत त्याला ९५.२ टक्के गुण मिळाले. आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या रूपात त्याने यशाचा चौकार मारला आहे.‘आयआयटी-पवई’ हेच लक्ष्य सुरुवातीपासून माझे लक्ष्य ‘आयआयटी-पवई’ हेच होते. दहावीनंतर लगेच तयारीला लागलो होतो. नियमित सराव व मुद्देसूद अभ्यास यातून पेपर सोडविणे सोपे गेले. माझ्या ताईने मला सातत्याने प्रोत्साहन दिले. याशिवाय माझ्या आई-वडिलांनीदेखील माझ्यावर विश्वास टाकला. दोन वर्षे सातत्याने ‘अभ्यास एके अभ्यास’च सुरू होते व आता मेहनत फळाला आल्याचे समाधान आहे असे मत रुपांशूने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ‘आयआयटीत’ संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पदवी मिळाल्यानंतर गणित विषयात संशोधन करण्याचा रुपांशूचा मानस आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे त्याचे आदर्श असून त्यांच्याशी भेट घेण्याची संधीदेखील त्याला शालेय जीवनात मिळाली होती. विशेष म्हणजे रुपांशू मागासवर्गीयांमधून देशात प्रथम आला असला तरी ‘आयआयटी-पवई’ येथे तो खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश घेणार आहे. रुपांशू याने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र आॅलिम्पियाडमध्ये भारतातून पाचवे स्थान पटकाविले होते. त्याची थोरली बहीण ‘आयआयटी’तूनच अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत आहे. (प्रतिनिधी)