शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पैशाचे बळ, समाज माध्यमांचा वाढता दुरुपयोग थांबविण्याचं आव्हान- सहारिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:58 IST

सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

ठाणे : सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. ते आज नवी मुंबई महापालिका येथील ज्ञान केंद्र सभागृहात आयोजित कोकण विभागीय कार्यशाळेस संबोधित करीत होते. कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुदृढ लोकशाहीसाठी सुदृढ निवडणुका या विषयावर या कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.निवडणूक आयुक्त सहारिया याप्रसंगी म्हणाले की, ७४ व्या घटना दुरुस्तीत संस्थानिक स्वराज्य संस्थाना संवैधानिक दर्जा देण्यात आला असून, दर ५ वर्षांनी निवडणुका घेतल्याच पाहिजेत, असे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला असून, त्याला भारत निवडणूक आयोगासारखेच अधिकार आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. प्रसंगी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूक विषयक बाबींचे उल्लंघन केले तर आयोग कारवाई करू शकतो.मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्चमतदानाचे प्रमाण सर्वत्र कमी होत आहे, मात्र महाराष्ट्रात ते साधारणपणे स्थिर आढळते. महापालिका निवडणुकीत ५० ते ६० टक्के, जिल्हा परिषद निवडणुकीत ६० ते ७० टक्के, ग्रामपंचायत निवडणुकात ७० टक्के असे चित्र दिसते. विशेषत: उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अधिक शिकलेल्या मंडळींचा मतदानासाठी अनुत्साह ही चिंतेची बाब आहे, त्यांचे मतदान वाढले पाहिजे, असे सांगून निवडणूक आयुक्तांनी पैशाच्या बळाचा आणि समाज माध्यमांच्या वाढत्या दुरुपयोगावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मध्यंतरी गोखले इन्स्टिट्यूटकरवी आम्ही यावर अभ्यास करवून घेतला तेव्हा निदर्शनास आले की, पक्ष आणि उमेदवार नेमून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्च करतात.उमेदवारी अर्ज बिनचूक झालेराज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाचे अधिकृत चिन्ह हवे असेल तर नोंदणीची पद्धत सुरू केली, खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे, आश्वासनाचा जाहीरनामा तसेच केलेली कामे जनतेसमोर ठेवणे बंधनकारक केले आहे. नामनिर्देशन आणि शपथपत्र संगणकीकृत करणे आवश्यक केले आहे, यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण १ टक्क्यावर आले, अशी माहिती सहारिया यांनी दिली.विद्यापीठाच्या पातळीवर जागरूकताविद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याने प्रवेश अर्जाच्या वेळी मी मतदार नोंदणी केली नसल्यास ती करेन असे लिहून देणे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थाना भेटी देणे, याविषयीही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून तरुण पिढीत निवडणुका आणि मतदान याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अशीही माहिती त्यांनी दिली.प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ही कार्यशाळा घेण्यामागची भूमिका सांगितली. निवडणूक यंत्रणेचे बळकटीकरण करणे आणि लोकसहभाग वाढविणे यासाठी आयोग गांभीर्याने प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले. मतदार जागृतीसाठी पंधरवडाही पाळण्यात आल्याचे ते म्हणाले. एखाद्या चांगल्या गोष्टी घडत असतील तर श्रेयवाद उपस्थित करून अडथळे आणण्याचे कामही काही मंडळी करतात याचेही उदाहरण देऊन त्यांनी याकडे दुर्लक्ष करून निवडणूक विषयक यंत्रणा बळकट करावी असे आवाहन केले.यावेळी निवृत्त अपर मुख्य सचिव शहजाद हुसैन, सर्व जिल्हाधिकारी,  महापौर जयवंत सुतार, महानगरपालिका आयुक्त रामस्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Electionनिवडणूक