शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पैशाचे बळ, समाज माध्यमांचा वाढता दुरुपयोग थांबविण्याचं आव्हान- सहारिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:58 IST

सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

ठाणे : सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून निवडणुकांमध्ये पैशाचा आणि समाज माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. ते आज नवी मुंबई महापालिका येथील ज्ञान केंद्र सभागृहात आयोजित कोकण विभागीय कार्यशाळेस संबोधित करीत होते. कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुदृढ लोकशाहीसाठी सुदृढ निवडणुका या विषयावर या कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.निवडणूक आयुक्त सहारिया याप्रसंगी म्हणाले की, ७४ व्या घटना दुरुस्तीत संस्थानिक स्वराज्य संस्थाना संवैधानिक दर्जा देण्यात आला असून, दर ५ वर्षांनी निवडणुका घेतल्याच पाहिजेत, असे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला असून, त्याला भारत निवडणूक आयोगासारखेच अधिकार आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. प्रसंगी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निवडणूक विषयक बाबींचे उल्लंघन केले तर आयोग कारवाई करू शकतो.मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्चमतदानाचे प्रमाण सर्वत्र कमी होत आहे, मात्र महाराष्ट्रात ते साधारणपणे स्थिर आढळते. महापालिका निवडणुकीत ५० ते ६० टक्के, जिल्हा परिषद निवडणुकीत ६० ते ७० टक्के, ग्रामपंचायत निवडणुकात ७० टक्के असे चित्र दिसते. विशेषत: उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अधिक शिकलेल्या मंडळींचा मतदानासाठी अनुत्साह ही चिंतेची बाब आहे, त्यांचे मतदान वाढले पाहिजे, असे सांगून निवडणूक आयुक्तांनी पैशाच्या बळाचा आणि समाज माध्यमांच्या वाढत्या दुरुपयोगावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मध्यंतरी गोखले इन्स्टिट्यूटकरवी आम्ही यावर अभ्यास करवून घेतला तेव्हा निदर्शनास आले की, पक्ष आणि उमेदवार नेमून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा ४ पट जादा खर्च करतात.उमेदवारी अर्ज बिनचूक झालेराज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षाचे अधिकृत चिन्ह हवे असेल तर नोंदणीची पद्धत सुरू केली, खर्चाचा दैनंदिन हिशेब देणे, आश्वासनाचा जाहीरनामा तसेच केलेली कामे जनतेसमोर ठेवणे बंधनकारक केले आहे. नामनिर्देशन आणि शपथपत्र संगणकीकृत करणे आवश्यक केले आहे, यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण १ टक्क्यावर आले, अशी माहिती सहारिया यांनी दिली.विद्यापीठाच्या पातळीवर जागरूकताविद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याने प्रवेश अर्जाच्या वेळी मी मतदार नोंदणी केली नसल्यास ती करेन असे लिहून देणे, विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थाना भेटी देणे, याविषयीही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून तरुण पिढीत निवडणुका आणि मतदान याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अशीही माहिती त्यांनी दिली.प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ही कार्यशाळा घेण्यामागची भूमिका सांगितली. निवडणूक यंत्रणेचे बळकटीकरण करणे आणि लोकसहभाग वाढविणे यासाठी आयोग गांभीर्याने प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले. मतदार जागृतीसाठी पंधरवडाही पाळण्यात आल्याचे ते म्हणाले. एखाद्या चांगल्या गोष्टी घडत असतील तर श्रेयवाद उपस्थित करून अडथळे आणण्याचे कामही काही मंडळी करतात याचेही उदाहरण देऊन त्यांनी याकडे दुर्लक्ष करून निवडणूक विषयक यंत्रणा बळकट करावी असे आवाहन केले.यावेळी निवृत्त अपर मुख्य सचिव शहजाद हुसैन, सर्व जिल्हाधिकारी,  महापौर जयवंत सुतार, महानगरपालिका आयुक्त रामस्वामी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Electionनिवडणूक