शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नोटांवरील बंदीला हायकोर्टात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 06:27 IST

पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देत, दोन ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

मुंबई : पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देत, दोन ज्येष्ठ वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्र सरकारने अत्यंत घाईने निर्णय घेऊन सामान्यांची प्रचंड गैरसोय केली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.अ‍ॅड. जमशेद मिस्त्री व अ‍ॅड. जब्बार सिंग यांनी दिवाळी सुटीकालीन खंडपीठापुढे याचिका दाखल केली. त्यात अनेक प्रश्न उपस्थित होणार असल्याने, ही याचिका नियमित खंडपीठापुढे सादर करण्यात यावी, असे निर्देश न्या. एम. एस. कर्णिक यांनी याचिकाकर्त्यांना दिले.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) २ नोव्हेंबरला अधिसूचना काढून सर्व राष्ट्रीयकृत बँकांना त्यांच्या एटीएममध्ये भरण्यात येणाऱ्या एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम १०० रुपयांच्या नोटांनी भरण्यात यावी, असा आदेश पारित केला. हे केवळ प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असल्याचेही आरबीआयने अधिसूचनेत नमूद केले आहे. मात्र, त्यानंतरही ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याची सरकारने घाई केली. कायद्यानुसार, सरकारला यासाठी वटहुकूम जारी करणे आवश्यक आहे. त्यानंतर, त्याची अंमलबजावणी करायला हवी होती, असा युक्तिवाद अ‍ॅड. मिस्त्री यांनी केला. १९७८ मध्ये आणीबाणीच्या काळात ‘द हाय डिनॉमिनेशन बँक नोट्स अ‍ॅक्ट, १९७८’ कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यांतर्गत नोटा व्यवहारातून रद्द करण्यापूर्वी सरकारने वटहुकूम काढणे बंधनकारक आहे. सरकारला वटहुकूम काढायचा नव्हता, तर त्यांनी आधी कायद्यात सुधारणा करायला हवी होती, असेही मिस्त्री यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)