शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:56 IST

२५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी केले स्थलांतर

सचिन लुंगसे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतही ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा दुष्परिणाम फारसा पाहायला मिळाला नाही. सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून विविध भागांतून सुमारे २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

वाऱ्याच्या वेगाने बुधवारी अलिबागला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलाही बसला. मुंबईच्या समुद्रकिनाºयावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच वारेही वेगाने वाहत होते. सकाळपासून सुरू असलेला पाऊस सायंकाळपर्यंत कोसळत असतानाच वादळ धडकण्याच्या म्हणजे दुपारच्या वेळी पावसाचा वेग ठिकठिकाणी वाढला आणि मुंबईकरांना धडकी भरली. सखल भागात विशेषत: जे नागरिक समुद्रकिनारी राहतात त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पावले उचलली होती. यात प्रामुख्याने वर्सोवा आणि वरळी येथील रहिवाशांचा समावेश होता. कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीच्या किनारी असलेल्या क्रांतिनगर येथील रहिवाशांनाही लगतच्या पालिकेच्या शाळेत हलविण्यात आले.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांतून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

दुपारी पावसाचा आणि वाºयाचा वेग वाढल्याने ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दल सज्ज होते. ६ चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक, रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात होते. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एडीआरएफ) एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईतील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवून होत्या. यामध्ये कुलाबा, वरळी, वांद्रे, अंधेरी, मालाड आणि बोरीवलीचा समावेश होता. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारांहून अधिक कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते.धोकादायक इमारतींची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कोसळलेल्या झाडांना तातडीने हटविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यासाठी ९६ पथके तैनात होती. अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.ओडिशा सरकारसोबत सल्लामसलतओडिशा सरकारला वादळाशी संबंधित विविध आपत्तींचा सामना करण्याचा असलेला अनुभव लक्षात घेता, त्यांच्याशी प्रशासनाने सल्लामसलत केली. अशा आपत्तींमध्ये रस्त्यांवर कोसळलेली झाडे तातडीने हटविणे आवश्यक आहेत अन्यथा मदतकार्यावर परिणाम होऊ शकतो, हा सल्ला लक्षात घेऊन पालिकेसह इतर यंत्रणांनाही या कामामध्ये गरज पडल्यास सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची विनंती केली होती.३० हजार नागरिकांनी स्वत:हूनकेले स्थलांतरखबरदारीचा उपाय म्हणून पालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा नागरिकांच्या तात्पुरत्या निवाºयासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत सुमारे ३० हजार नागरिकांनी स्थलांतर केले. याशिवाय दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांवरूनही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ