शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

मुंबईला चकवा; सोसाट्याचा वारा, पाऊस, पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:56 IST

२५ हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी केले स्थलांतर

सचिन लुंगसे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतही ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा दुष्परिणाम फारसा पाहायला मिळाला नाही. सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून विविध भागांतून सुमारे २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

वाऱ्याच्या वेगाने बुधवारी अलिबागला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईलाही बसला. मुंबईच्या समुद्रकिनाºयावरील कुलाबा येथील गीतानगर, वरळी कोळीवाडा, दादर, माहीम, जुहू आणि वर्सोवा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यातच वारेही वेगाने वाहत होते. सकाळपासून सुरू असलेला पाऊस सायंकाळपर्यंत कोसळत असतानाच वादळ धडकण्याच्या म्हणजे दुपारच्या वेळी पावसाचा वेग ठिकठिकाणी वाढला आणि मुंबईकरांना धडकी भरली. सखल भागात विशेषत: जे नागरिक समुद्रकिनारी राहतात त्यांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पावले उचलली होती. यात प्रामुख्याने वर्सोवा आणि वरळी येथील रहिवाशांचा समावेश होता. कुर्ला पश्चिमेकडील मिठी नदीच्या किनारी असलेल्या क्रांतिनगर येथील रहिवाशांनाही लगतच्या पालिकेच्या शाळेत हलविण्यात आले.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांतून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

दुपारी पावसाचा आणि वाºयाचा वेग वाढल्याने ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दल सज्ज होते. ६ चौपाट्यांवर ९३ जीवरक्षक, रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात होते. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एडीआरएफ) एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईतील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवून होत्या. यामध्ये कुलाबा, वरळी, वांद्रे, अंधेरी, मालाड आणि बोरीवलीचा समावेश होता. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारांहून अधिक कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते.धोकादायक इमारतींची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कोसळलेल्या झाडांना तातडीने हटविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यासाठी ९६ पथके तैनात होती. अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते.ओडिशा सरकारसोबत सल्लामसलतओडिशा सरकारला वादळाशी संबंधित विविध आपत्तींचा सामना करण्याचा असलेला अनुभव लक्षात घेता, त्यांच्याशी प्रशासनाने सल्लामसलत केली. अशा आपत्तींमध्ये रस्त्यांवर कोसळलेली झाडे तातडीने हटविणे आवश्यक आहेत अन्यथा मदतकार्यावर परिणाम होऊ शकतो, हा सल्ला लक्षात घेऊन पालिकेसह इतर यंत्रणांनाही या कामामध्ये गरज पडल्यास सहकार्य करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची विनंती केली होती.३० हजार नागरिकांनी स्वत:हूनकेले स्थलांतरखबरदारीचा उपाय म्हणून पालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा नागरिकांच्या तात्पुरत्या निवाºयासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत सुमारे ३० हजार नागरिकांनी स्थलांतर केले. याशिवाय दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांवरूनही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ