शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

तब्बल १२ वर्षांनंतर पोहचले पंतप्रधानांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, स्काउट पुरस्कारार्थींना वेगळाच अनुभव; सरकारी कामाची दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 05:48 IST

Certificate of Prime Minister's signature : स्काउटच्या पंतप्रधान ढाल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील विद्यालयाने सहभाग नोंदविला होता

- रमाकांत पाटील

नंदुरबार : ‘सरकारी काम अन् बारा महिने थांब’ऐवजी आता ‘१२ वर्षे थांब’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. जग एकीकडे गतिमान होत असताना खुद्द पंतप्रधान कार्यालयातील प्रमाणपत्राला नंदुरबार येथे पोहोचायला तब्बल १२ वर्षे लागल्याने सरकारी कामाचा वेगळाच अनुभव जिल्ह्यातील स्काउट पुरस्कारार्थींना मिळाला आहे.

स्काउटच्या पंतप्रधान ढाल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील विद्यालयाने सहभाग नोंदविला होता. त्यासाठी स्काउट शिक्षक नरेंद्र गुरव व २१ विद्यार्थ्यांच्या फायलीही पाठविल्या होत्या. १२ सप्टेंबर २००९ ला त्याचे परीक्षण मुंबईत झाले आणि ६ ऑक्टोबर २००९ ला त्याच्या निकालाचे पत्रही संबंधित शाळेला पाठविण्यात आले. त्यात पंतप्रधान ढाल स्पर्धेचे बक्षीस सर्वोदय विद्या मंदिरातील शिक्षकांना मिळाले होते. 

हा पुरस्कार सोहळा दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत ४ ते ८ जानेवारी २०१२ ला होणार होता. त्याबाबतचे प्रशासनाने १३ डिसेंबर २०११ ला संबंधितांना पत्रही पाठविले होते. त्यानुसार पुरस्कारार्थींनी दिल्लीला जाण्यासाठी आरक्षणही केले. मात्र, ऐनवेळी कार्यक्रम रद्द करून तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर मात्र तब्बल ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अर्थात १२ वर्षांनी ते प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्रावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची सही असून, ते दिल्लीहून ६ जानेवारी २०१२ ला पाठविल्याची तारीख आहे.

मुंबई ते नंदुरबार प्रवासासाठी लागले आठ महिनेहे प्रमाणपत्र अगोदर मुंबई येथे गेले. त्यानंतर मुंबईहून ते प्रकाशा (नंदुरबार) येथे पाठविण्यात आले. मुंबई येथून  प्रमाणपत्रासोबत जे पत्र पाठविले आहे, त्या पत्रावर १० फेब्रुवारी २०२१ अशी तारीख लिहिली आहे. म्हणजे मुंबईहूनही नंदुरबारच्या प्रवासासाठीही तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लागल्याचे दिसून येते.

पत्र करिअरसाठी महत्त्वाचे ठरले असते पण... पंतप्रधानांच्या सहीने ज्या  पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे, त्यापैकी स्काउट शिक्षक वामन इंदिस यांचा कोरोनामुळे यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक पुरस्कारार्थी शिक्षक आता निवृत्त झाले आहेत. ज्या २१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी अनेकांचे आता लग्न झाले आहे. काही जण नोकरीला लागले आहेत. हे प्रमाणपत्र जर वेळीच मिळाले असते तर आयुष्याच्या करिअरसाठी ते महत्त्वाचे ठरू शकले असते. आता हे प्रमाणपत्र काय कामाचे, असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :prime ministerपंतप्रधान