शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:29 IST

मुंबईसह पुणे, नागपूर, गोंदिया, सोलापूरसाठी विशेष सेवा

मुंबई /पुणे : मध्य रेल्वेने ९ ऑक्टोबरपासून मुंबई, पुणे, नागपूर, गोंदिया व सोलापूर या ठिकाणी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण क्षमतेने पण फक्त आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येईल.मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई, मुंबई-पुणे) सिद्धेश्वर एक्स्प्रेस (मुंबई-सोलापूर), मुंबई-गोंदिया अशा गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सर्व गाड्यांच्या वेळा व क्रमांक पूर्वीप्रमाणेच आहेत. फक्त लक्षात येण्यासाठी म्हणून प्रत्येक क्रमाकांच्या आधी शून्य लिहिला आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. ‘मुंबई-नागपूर दुरांतो विशेष’ १० आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. तर दुरांतो विशेष ट्रेन ९ आॅक्टोबरपासून नागपूर येथून सुटणार आहे. दोन्ही गाड्या इगतपुरी वगळता 

नियमित थांब्यावर थांबतील. मुंबई-पुणे सुपरफास्ट विशेष ९ आॅक्टोबरपासून तर पुण्यावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल मुंबई-गोंदिया सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. गोंदियावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. इगतपुरी वगळता नियमित गाडीच्या थांब्यात आणि वेळेत बदल नसेल.मुंबई-सोलापूर सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसºया दिवशी सोलापूरला पोहोचेल. सोलापूरवरून सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसºया दिवशी पोहोचेल. तर, कर्जत, खंडाळा, लोणावळा, माढा, मोहोळ आणि भिगवन हे थांबा वगळता इतर थांब्यांवर थांबले.

थर्मल तपासणी करणारगाड्यांमध्ये प्रवासी बसण्याआधी त्याची थर्मल तपासणी केली जाईल. आॅक्सिजन लेवलही पाहिली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक आहे. दरम्यान, सरकार पुणे लोणावळा ही लोकल सेवाही १२ आॅक्टोबरपासून सुरू करत आहे. मात्र, यातून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल. यासाठी क्यूआर कोडचा वापर करणार आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

रेस्टॉरंट, बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरूमुंबई : राज्यातील रेस्टॉरंट, बार रोज सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असेल, असे परिपत्रक राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाने काढले आहे. हा नियम कॅफे, कॅन्टिन, डायनिंग हॉल, हॉटेल, रिसॉर्ट, क्लबनाही लागू राहील. राज्यातील रेस्टॉरंट, बार५ आॅक्टोबरपासून उपस्थितीचे बंधन घालून सुरू करण्यात आले होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे