शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:29 IST

मुंबईसह पुणे, नागपूर, गोंदिया, सोलापूरसाठी विशेष सेवा

मुंबई /पुणे : मध्य रेल्वेने ९ ऑक्टोबरपासून मुंबई, पुणे, नागपूर, गोंदिया व सोलापूर या ठिकाणी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण क्षमतेने पण फक्त आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येईल.मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई, मुंबई-पुणे) सिद्धेश्वर एक्स्प्रेस (मुंबई-सोलापूर), मुंबई-गोंदिया अशा गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सर्व गाड्यांच्या वेळा व क्रमांक पूर्वीप्रमाणेच आहेत. फक्त लक्षात येण्यासाठी म्हणून प्रत्येक क्रमाकांच्या आधी शून्य लिहिला आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. ‘मुंबई-नागपूर दुरांतो विशेष’ १० आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. तर दुरांतो विशेष ट्रेन ९ आॅक्टोबरपासून नागपूर येथून सुटणार आहे. दोन्ही गाड्या इगतपुरी वगळता 

नियमित थांब्यावर थांबतील. मुंबई-पुणे सुपरफास्ट विशेष ९ आॅक्टोबरपासून तर पुण्यावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल मुंबई-गोंदिया सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल. गोंदियावरून सुपरफास्ट विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. इगतपुरी वगळता नियमित गाडीच्या थांब्यात आणि वेळेत बदल नसेल.मुंबई-सोलापूर सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसºया दिवशी सोलापूरला पोहोचेल. सोलापूरवरून सुपरफास्ट विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसºया दिवशी पोहोचेल. तर, कर्जत, खंडाळा, लोणावळा, माढा, मोहोळ आणि भिगवन हे थांबा वगळता इतर थांब्यांवर थांबले.

थर्मल तपासणी करणारगाड्यांमध्ये प्रवासी बसण्याआधी त्याची थर्मल तपासणी केली जाईल. आॅक्सिजन लेवलही पाहिली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक आहे. दरम्यान, सरकार पुणे लोणावळा ही लोकल सेवाही १२ आॅक्टोबरपासून सुरू करत आहे. मात्र, यातून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल. यासाठी क्यूआर कोडचा वापर करणार आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

रेस्टॉरंट, बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरूमुंबई : राज्यातील रेस्टॉरंट, बार रोज सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असेल, असे परिपत्रक राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाने काढले आहे. हा नियम कॅफे, कॅन्टिन, डायनिंग हॉल, हॉटेल, रिसॉर्ट, क्लबनाही लागू राहील. राज्यातील रेस्टॉरंट, बार५ आॅक्टोबरपासून उपस्थितीचे बंधन घालून सुरू करण्यात आले होते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे