शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 07:51 IST

मुंबई, दि. 31- मुंबईतील पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी मुंबई लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तर आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद ...

ठळक मुद्देमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे.तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई, दि. 31- मुंबईतील पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी मुंबई लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तर आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद आहे.  सीएसटी ते कल्याण रेल्वे वाहतूक 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. तर हार्बर रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिराने सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाला. याचा परिणाम काही प्रमाणात रेल्वे सेवेवर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवाही पूर्वपदावर आली. पण आता पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान,टिटवाळा-सीएसटी लोकल सुरु झाल्याची माहिती मिळते आहे तसंच कसारा-आसनगाव मार्गावरही रेल्वे सुरु झाली आहे. पण टिटवाळा ते आसनगाव लोकल गेल्या 49 तासांपासून बंदच आहे.

मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर, सखल भागासह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा बुधवारी दुपारपर्यंत झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली आणि पाण्याचा निचरा पूर्णत: झाल्याने काही अंशी का होईना, मुंबईकरांना दिलासा मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता, बहुतांश कार्यालयांना सुटी असल्याने, मुंबईकर अत्यंत कमी संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे लोकल सेवा कोलमडलेली असली, तरी लोकांचे हाल मात्र झाले नाहीत.मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. प्रत्यक्षात तुरळक ठिकाणी पडलेल्या सरी वगळता, बुधवार कोरडा गेला. परिणामी, मंगळवार वगळता नेहमीप्रमाणेच हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकला. याच काळात शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती.

‘कोसळधारे’त २१ जणांचे बळी तर ४० हून जास्त जखमीअभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत दोन बालकांसह १२ जणांच्या अंगावर भिंत कोसळून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाले आहेत, तर ४०हून अधिक जण जखमी आहेत.ठाणे जिल्ह्यात ४ जण बुडाले तर चौघे बेपत्ता आहेत. पालघर जिल्ह्यात पाच जण बुडून मृत झाल्याने पावसाच्या बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे.या दुर्घटनेत मृत्यू व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून, अनेक जण बेपत्ता असून, त्यांची शोध मोहीम सुरू आहे.