शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 07:51 IST

मुंबई, दि. 31- मुंबईतील पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी मुंबई लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तर आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद ...

ठळक मुद्देमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे.तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई, दि. 31- मुंबईतील पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी मुंबई लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळते आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कसारा ते टिटवाळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून कसारा-टिटवाळा वाहतूक ठप्प झाली आहे. तर आसनगाव ते सीएसटी अप मार्ग पूर्णपणे बंद आहे.  सीएसटी ते कल्याण रेल्वे वाहतूक 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे 15 मिनीटं उशिराने सुरू आहे. तर हार्बर रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिराने सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाला. याचा परिणाम काही प्रमाणात रेल्वे सेवेवर झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवाही पूर्वपदावर आली. पण आता पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान,टिटवाळा-सीएसटी लोकल सुरु झाल्याची माहिती मिळते आहे तसंच कसारा-आसनगाव मार्गावरही रेल्वे सुरु झाली आहे. पण टिटवाळा ते आसनगाव लोकल गेल्या 49 तासांपासून बंदच आहे.

मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर, सखल भागासह ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा बुधवारी दुपारपर्यंत झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, रेल्वे वगळता रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली आणि पाण्याचा निचरा पूर्णत: झाल्याने काही अंशी का होईना, मुंबईकरांना दिलासा मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता, बहुतांश कार्यालयांना सुटी असल्याने, मुंबईकर अत्यंत कमी संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे लोकल सेवा कोलमडलेली असली, तरी लोकांचे हाल मात्र झाले नाहीत.मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. प्रत्यक्षात तुरळक ठिकाणी पडलेल्या सरी वगळता, बुधवार कोरडा गेला. परिणामी, मंगळवार वगळता नेहमीप्रमाणेच हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकला. याच काळात शहरासह उपनगरातील रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली होती.

‘कोसळधारे’त २१ जणांचे बळी तर ४० हून जास्त जखमीअभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत दोन बालकांसह १२ जणांच्या अंगावर भिंत कोसळून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाले आहेत, तर ४०हून अधिक जण जखमी आहेत.ठाणे जिल्ह्यात ४ जण बुडाले तर चौघे बेपत्ता आहेत. पालघर जिल्ह्यात पाच जण बुडून मृत झाल्याने पावसाच्या बळींची संख्या २१ वर पोहोचली आहे.या दुर्घटनेत मृत्यू व जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून, अनेक जण बेपत्ता असून, त्यांची शोध मोहीम सुरू आहे.