शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

अवकाळी संकटात केंद्र सरकारचे हात वर!

By admin | Updated: March 4, 2015 02:49 IST

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. गारपिटीच्या संकटावेळी राज्य सरकारने मागितलेली मदत केंद्र सरकारने अजून दिलेली नाही. आता नव्या संकटाकरिता केंद्रापुढे झोळी पसरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.विशिष्ट कालावधीत ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर केंद्र सरकारकडे मदत मागता येते. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले असले तरी पावसाचे प्रमाण केंद्र सरकारच्या निकषानुसार नव्हते. त्यामुळे या संकटाकरिता केंद्राची मदत मिळणे कठीण आहे. मागील  मदत अजून मिळालेली नसताना पुन्हा नैसर्गिक संकट आले आहे. राज्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसात ७ लाख ४९ हजार हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या आपत्तीत तीनजण मरण पावले असून १२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. १०५ जनावरे मरण पावली तर १९४ घरांची पडझड झाली, अशी माहिती खडसे यांनी दिली. राज्यात यापूर्वी दुष्काळामुळे खरीपाचे पिक गेलेली आणि त्यानंतर गारपिट झाल्याने पिकांचे नुकसान झालेली गावे वगळता अन्य गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचे खडसे म्हणाले. ज्या गावांमधील पिके दुष्काळामुळे गेली तेथे आणि गारपिटीमुळे ज्यांची खरीपाची पिके गेली तेथे रब्बीची पिके घेतली जाण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)