शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

अवकाळी संकटात केंद्र सरकारचे हात वर!

By admin | Updated: March 4, 2015 02:49 IST

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. गारपिटीच्या संकटावेळी राज्य सरकारने मागितलेली मदत केंद्र सरकारने अजून दिलेली नाही. आता नव्या संकटाकरिता केंद्रापुढे झोळी पसरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.विशिष्ट कालावधीत ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर केंद्र सरकारकडे मदत मागता येते. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले असले तरी पावसाचे प्रमाण केंद्र सरकारच्या निकषानुसार नव्हते. त्यामुळे या संकटाकरिता केंद्राची मदत मिळणे कठीण आहे. मागील  मदत अजून मिळालेली नसताना पुन्हा नैसर्गिक संकट आले आहे. राज्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसात ७ लाख ४९ हजार हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या आपत्तीत तीनजण मरण पावले असून १२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. १०५ जनावरे मरण पावली तर १९४ घरांची पडझड झाली, अशी माहिती खडसे यांनी दिली. राज्यात यापूर्वी दुष्काळामुळे खरीपाचे पिक गेलेली आणि त्यानंतर गारपिट झाल्याने पिकांचे नुकसान झालेली गावे वगळता अन्य गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचे खडसे म्हणाले. ज्या गावांमधील पिके दुष्काळामुळे गेली तेथे आणि गारपिटीमुळे ज्यांची खरीपाची पिके गेली तेथे रब्बीची पिके घेतली जाण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)