शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी संकटात केंद्र सरकारचे हात वर!

By admin | Updated: March 4, 2015 02:49 IST

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता केंद्र सरकारकडून मदत मिळणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. गारपिटीच्या संकटावेळी राज्य सरकारने मागितलेली मदत केंद्र सरकारने अजून दिलेली नाही. आता नव्या संकटाकरिता केंद्रापुढे झोळी पसरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.विशिष्ट कालावधीत ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला, तर केंद्र सरकारकडे मदत मागता येते. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले असले तरी पावसाचे प्रमाण केंद्र सरकारच्या निकषानुसार नव्हते. त्यामुळे या संकटाकरिता केंद्राची मदत मिळणे कठीण आहे. मागील  मदत अजून मिळालेली नसताना पुन्हा नैसर्गिक संकट आले आहे. राज्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसात ७ लाख ४९ हजार हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या आपत्तीत तीनजण मरण पावले असून १२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. १०५ जनावरे मरण पावली तर १९४ घरांची पडझड झाली, अशी माहिती खडसे यांनी दिली. राज्यात यापूर्वी दुष्काळामुळे खरीपाचे पिक गेलेली आणि त्यानंतर गारपिट झाल्याने पिकांचे नुकसान झालेली गावे वगळता अन्य गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचे खडसे म्हणाले. ज्या गावांमधील पिके दुष्काळामुळे गेली तेथे आणि गारपिटीमुळे ज्यांची खरीपाची पिके गेली तेथे रब्बीची पिके घेतली जाण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)