शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

केंद्र सरकार २५ हजार टन कांदा खरेदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:37 IST

कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव

मुंबई : कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव स्थिरीकरण योजनेतून २५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा यांनी दिली.नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव बाजार समितीत कांद्याची खरेदी केली जाणार असल्याने भाव स्थिर राहण्यास मदत होणार आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे ३२ हजार ९२० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर क्विंटलचे सरासरी भाव ८०६ रुपये होते. शुक्रवारी जिल्ह्यात ६०२ रुपये सरासरी भाव होते. कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने आवक वाढली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर सरासरी दोन हजार रुपये असलेला भाव आता नाशिक जिल्ह्यातील घाऊक बाजारात क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. नाफेडने किमान १५ हजार टन कांदा खरेदी करावा, अशा मागणीचे पत्र शेतकºयांच्या कृषी व पणन कंपन्यांचा (फार्मर प्रोड्युसर कंपनी) महासंघ असलेल्या ‘महा-एफपीसी’ संस्थेने दिले असल्याचेही चढ्ढा यांनी सांगितले. नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला सुरुवात होईल. तो माल दिल्ली व इतर राज्यांत पाठविला जाणार आहे.

टॅग्स :onionकांदा