शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार कामगारविरोधी

By admin | Updated: September 14, 2015 02:03 IST

केंद्र सरकार मूठभर उद्योगपतींच्या बाजूचे असून, ते देश घडविणाऱ्या कामगारांच्या मात्र विरोधात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री

औरंगाबाद : केंद्र सरकार मूठभर उद्योगपतींच्या बाजूचे असून, ते देश घडविणाऱ्या कामगारांच्या मात्र विरोधात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली.भाजपा सरकार कामगारविरोधी ५४ कायदे बदलण्याच्या मनस्थितीत असून, आम्ही मात्र कामगारांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात दिला. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, इंटकचे राष्ट्रीय सरचिटणीस एम. राघवय्या यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस नेते गोविंदराव आदिक, बाळकृष्ण वासनिक, काशिनाथ राऊत व अशोक पेंडारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.चव्हाण म्हणाले, देशातील अन्य कामगार संघटना त्यांच्या राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणानुसार चालतात; पण इंटकचा पाया धर्मनिरपेक्षतेचा आहे. काँग्रेस आणि इंटक देश मजबूत करण्याचे काम करीत आहेत. रेड्डी म्हणाले, आम्हाला देशात काँगे्रसचे सरकार हवे आहे, पण इंटक म्हणून आम्हाला आमच्या ताकदीवर उभे राहू द्या. कामगारांना किमान १५ हजार रुपये वेतन मिळायला हवे, मात्र सरकार ते देण्यास तयार नाही. केंद्रातील लुटारूंकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?, असा सवाल मोहन प्रकाश यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील, के. के. नायर, दादा माहूरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने भांडत आहेत, ते पाहता राज्याची वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने चालू असल्याचे जाणवते. आपापसातील मतभेदांत ही मंडळी सरकार कसे चालवणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.राज्यस्तरीय इंटक अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला दिली त्याप्रमाणे महाराष्ट्राला मदत दिली पाहिजे. राज्यपालांनीसुद्धा दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे. राज्य सरकार प्रत्यक्षात उपाययोजना करण्याऐवजी केवळ घोषणाबाजी करीत आहे. त्यामुळे यातून भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. संपूर्ण कर्जमाफी मिळायलाच पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. दुष्काळी उपाययोजनांसंबंधी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे. विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. अध्यक्षपदी पुन्हा छाजेड : महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी जयप्रकाश छाजेड यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. ‘अच्छे दिन’चे वादे करणाऱ्या सरकारमुळे आता अंधारी येण्याची वेळ आली आहे, असे छाजेड म्हणाले.