शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

केंद्र सरकार कामगारविरोधी

By admin | Updated: September 14, 2015 02:03 IST

केंद्र सरकार मूठभर उद्योगपतींच्या बाजूचे असून, ते देश घडविणाऱ्या कामगारांच्या मात्र विरोधात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री

औरंगाबाद : केंद्र सरकार मूठभर उद्योगपतींच्या बाजूचे असून, ते देश घडविणाऱ्या कामगारांच्या मात्र विरोधात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली.भाजपा सरकार कामगारविरोधी ५४ कायदे बदलण्याच्या मनस्थितीत असून, आम्ही मात्र कामगारांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात दिला. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, इंटकचे राष्ट्रीय सरचिटणीस एम. राघवय्या यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस नेते गोविंदराव आदिक, बाळकृष्ण वासनिक, काशिनाथ राऊत व अशोक पेंडारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.चव्हाण म्हणाले, देशातील अन्य कामगार संघटना त्यांच्या राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणानुसार चालतात; पण इंटकचा पाया धर्मनिरपेक्षतेचा आहे. काँग्रेस आणि इंटक देश मजबूत करण्याचे काम करीत आहेत. रेड्डी म्हणाले, आम्हाला देशात काँगे्रसचे सरकार हवे आहे, पण इंटक म्हणून आम्हाला आमच्या ताकदीवर उभे राहू द्या. कामगारांना किमान १५ हजार रुपये वेतन मिळायला हवे, मात्र सरकार ते देण्यास तयार नाही. केंद्रातील लुटारूंकडून न्यायाची काय अपेक्षा करणार?, असा सवाल मोहन प्रकाश यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील, के. के. नायर, दादा माहूरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने भांडत आहेत, ते पाहता राज्याची वाटचाल मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने चालू असल्याचे जाणवते. आपापसातील मतभेदांत ही मंडळी सरकार कसे चालवणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.राज्यस्तरीय इंटक अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला दिली त्याप्रमाणे महाराष्ट्राला मदत दिली पाहिजे. राज्यपालांनीसुद्धा दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे. राज्य सरकार प्रत्यक्षात उपाययोजना करण्याऐवजी केवळ घोषणाबाजी करीत आहे. त्यामुळे यातून भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. संपूर्ण कर्जमाफी मिळायलाच पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. दुष्काळी उपाययोजनांसंबंधी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे. विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. अध्यक्षपदी पुन्हा छाजेड : महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदी जयप्रकाश छाजेड यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. ‘अच्छे दिन’चे वादे करणाऱ्या सरकारमुळे आता अंधारी येण्याची वेळ आली आहे, असे छाजेड म्हणाले.