शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

रस्ते, पुलांसाठी केंद्राचे ३४४ कोटी

By admin | Updated: December 5, 2014 00:44 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) ३४४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र त्यात विदर्भावर अन्याय

विदर्भाला केवळ ९२ कोटी : बहुतांश निधी मराठवाडा-खान्देशात यवतमाळ : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) ३४४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र त्यात विदर्भावर अन्याय झाल्याचा सूर ऐकू येतो आहे. वैदर्भीय भाजपा नेते नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी महाराष्ट्राला झुकते माप देत गेल्या काही वर्षांपासूनचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्याअंतर्गत रस्ते, पूल व रेल्वे ओव्हर ब्रिजचा समावेश असलेल्या २७ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते निधी अर्थात सीआरएफमधून ३४४ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले. गडकरी विदर्भाचे असल्याने अधिकाधिक निधी विदर्भाला मिळावा ही रास्त अपेक्षा वैदर्भीय बांधकाम अभियंते व कंत्राटदारांची होती. मात्र प्रत्यक्षात विदर्भाच्या वाट्याला केवळ ९२ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले असून बहुतांश निधी हा मराठवाडा, खान्देशात देण्यात आला आहे. त्यातही जालना, धुळे, नंदूरबार या तीनच जिल्ह्यात सर्वाधिक निधी दिला गेला आहे. विदर्भात गडचिरोलीला १३ कोटी १५ लाख रुपये मिळाले आहे. त्यातून सात किलोमीटरचा रस्ता आणि राज्य मार्ग क्र. ३७० वर मोठा पूल बांधला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. २५७ वरील धावंडा नदीवर दिग्रस-पुसद मार्गावर सात कोटी ७५ लाख रुपये खर्च करून मोठा पूल बांधला जाणार आहे. अकोला जिल्ह्याला १५ कोटी ६० लाख रुपये मिळाले आहेत. त्यात बाळापूर शहरात मोठा पूल तर अकोला-म्हैसांग-लाखपुरी हा १३ किलोमीटरचा रस्ता व मोठा पूल बांधला जाणार आहे. वर्धा जिल्ह्याला रेल्वे उड्डाण पुलासाठी ४५ कोटी रुपये मिळाले आहेत. आर्वी-वर्धा-वायगाव-राळेगाव मार्गाला जोडणारा रेल्वे पूल निर्माण केला जाईल. राज्य मार्ग क्र. २६७ वर हा ४५ कोटींचा निधी खर्च होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे सुमठाणा-तेलवासा-जुनाडा रोडवर आठ कोटी नऊ लाख रुपये खर्च करून पूल बांधला जाणार आहे. त्याच प्रमाणे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील राज्य मार्ग क्र. ३३५ वर मनसर-रामटेक-तुमसर रोडवर हा पूल निर्माण केला जाणार आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील भोकरदनला ९० कोटी, जळगावला २१ कोटी, धुळ्याला ७७ कोटी रुपये सीआरएफमधून दिले जाणार आहे. अन्य काही भागांनाही काही प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र निधी वाटपात वैदर्भीय मंत्री असूनही काँग्रेस सरकारप्रमाणेच भाजपा सरकारनेही विदर्भावर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)