शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, पुलांसाठी केंद्राचे ३४४ कोटी

By admin | Updated: December 5, 2014 00:44 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) ३४४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र त्यात विदर्भावर अन्याय

विदर्भाला केवळ ९२ कोटी : बहुतांश निधी मराठवाडा-खान्देशात यवतमाळ : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) ३४४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र त्यात विदर्भावर अन्याय झाल्याचा सूर ऐकू येतो आहे. वैदर्भीय भाजपा नेते नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी महाराष्ट्राला झुकते माप देत गेल्या काही वर्षांपासूनचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्याअंतर्गत रस्ते, पूल व रेल्वे ओव्हर ब्रिजचा समावेश असलेल्या २७ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते निधी अर्थात सीआरएफमधून ३४४ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले. गडकरी विदर्भाचे असल्याने अधिकाधिक निधी विदर्भाला मिळावा ही रास्त अपेक्षा वैदर्भीय बांधकाम अभियंते व कंत्राटदारांची होती. मात्र प्रत्यक्षात विदर्भाच्या वाट्याला केवळ ९२ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले असून बहुतांश निधी हा मराठवाडा, खान्देशात देण्यात आला आहे. त्यातही जालना, धुळे, नंदूरबार या तीनच जिल्ह्यात सर्वाधिक निधी दिला गेला आहे. विदर्भात गडचिरोलीला १३ कोटी १५ लाख रुपये मिळाले आहे. त्यातून सात किलोमीटरचा रस्ता आणि राज्य मार्ग क्र. ३७० वर मोठा पूल बांधला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. २५७ वरील धावंडा नदीवर दिग्रस-पुसद मार्गावर सात कोटी ७५ लाख रुपये खर्च करून मोठा पूल बांधला जाणार आहे. अकोला जिल्ह्याला १५ कोटी ६० लाख रुपये मिळाले आहेत. त्यात बाळापूर शहरात मोठा पूल तर अकोला-म्हैसांग-लाखपुरी हा १३ किलोमीटरचा रस्ता व मोठा पूल बांधला जाणार आहे. वर्धा जिल्ह्याला रेल्वे उड्डाण पुलासाठी ४५ कोटी रुपये मिळाले आहेत. आर्वी-वर्धा-वायगाव-राळेगाव मार्गाला जोडणारा रेल्वे पूल निर्माण केला जाईल. राज्य मार्ग क्र. २६७ वर हा ४५ कोटींचा निधी खर्च होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे सुमठाणा-तेलवासा-जुनाडा रोडवर आठ कोटी नऊ लाख रुपये खर्च करून पूल बांधला जाणार आहे. त्याच प्रमाणे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील राज्य मार्ग क्र. ३३५ वर मनसर-रामटेक-तुमसर रोडवर हा पूल निर्माण केला जाणार आहे. याशिवाय जालना जिल्ह्यातील भोकरदनला ९० कोटी, जळगावला २१ कोटी, धुळ्याला ७७ कोटी रुपये सीआरएफमधून दिले जाणार आहे. अन्य काही भागांनाही काही प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र निधी वाटपात वैदर्भीय मंत्री असूनही काँग्रेस सरकारप्रमाणेच भाजपा सरकारनेही विदर्भावर अन्याय केल्याची भावना व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)