शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

CoronaVirus News: कोरोनाचा वाढता कहर; मोदी सरकारनं महाराष्ट्रासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:01 IST

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ; महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. यामध्ये राज्यातील कोरोरा रुग्णांचा आकडा मोठा आहे. महाराष्ट्रासोबतच आणखी काही राज्यांमध्येही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यांना कोरोना संकट रोखण्यास मदत होणार आहे. (CoronaVirus in India)सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण खुले होणार? सरकार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांमध्ये केंद्रानं उच्च स्तरीय पथकं पाठवली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रदेखील लिहिलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेशदेखील  केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले आहेत. ...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेयदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार ७४२ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी साडे ६ हजार २१८  रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. काल देशात कोरोनामुळे १०४ जणांचा मृत्यू झाला. त्यातले ५१ जण महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळेच केंद्रानं महाराष्ट्रात उच्च स्तरीय पथक पाठवलं आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्येही पथकं रवाना करण्यात आली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या