शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा वाढता कहर; मोदी सरकारनं महाराष्ट्रासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:01 IST

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ; महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. यामध्ये राज्यातील कोरोरा रुग्णांचा आकडा मोठा आहे. महाराष्ट्रासोबतच आणखी काही राज्यांमध्येही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यांना कोरोना संकट रोखण्यास मदत होणार आहे. (CoronaVirus in India)सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण खुले होणार? सरकार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांमध्ये केंद्रानं उच्च स्तरीय पथकं पाठवली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रदेखील लिहिलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेशदेखील  केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले आहेत. ...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेयदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार ७४२ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी साडे ६ हजार २१८  रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. काल देशात कोरोनामुळे १०४ जणांचा मृत्यू झाला. त्यातले ५१ जण महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळेच केंद्रानं महाराष्ट्रात उच्च स्तरीय पथक पाठवलं आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्येही पथकं रवाना करण्यात आली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या