शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डाविरुद्ध लढा द्यावाच लागेल!

By admin | Updated: March 23, 2017 03:31 IST

दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला.

पुणे : दहा वर्षांत सेन्सॉर बोर्डमध्ये खूप बदल झाले; मात्र अजूनही सुधारणांना वाव आहे. आम्ही सेन्सॉरशिपबाबत अनेक वर्षे लढा दिला. प्रत्येक पिढीला स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागेल, असे परखड मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट यांनी व्यक्त केले.डिजिटल युगात चित्रपटाचा आशय विविध माध्यमांतून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सेन्सॉर बोर्डचे अस्तित्व काहीसे कमी झाले आहे. मात्र, स्वत:च्या चित्रपटांबाबत वैयक्तिक पातळीवर संवेदनशीलता जोपासण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ‘लोकमत माध्यम समूहा’तर्फे एनईसीसी, युनिसेफ आणि यूएन वुमेन यांच्या सहयोगाने आयोजित ‘लोकमत वुमेन समीट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘रोल आॅफ द लाइन्स’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, दिव्या दत्ता, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा आदी परिसंवादात सहभागी झाले होते.१९८४ मध्ये शबाना आझमी यांच्यासमवेत केलेला ‘अर्थ’ ते २०१७ चा विद्या बालनचा ‘बेगमजान’ हा खूप मोठा प्रवास आहे. ‘उडता पंजाब’च्या पार्श्वभूमीवर ‘बेगमजान’ला सेन्सॉर बोर्डकडून काय कात्री लावली जाईल, याची धाकधूक होती. मात्र, केवळ दोन साधे बदल सुचविण्यात आले, असे त्यांनी सांगितले. विद्या बालन म्हणाली, मी आजवर अनेक भूमिका केल्या; मात्र ‘बेगमजान’मधील भूमिका पेलली आणि जगलीही. महिलांनी आयुष्यात थोडीशी बंडखोरी दाखवायलाच हवी. मनात अनेकदा संताप साठलेला असतो. माझ्या बाबतीतही ‘बेगमजान’ चित्रपट करताना असेच घडले. यातील अनेक संवाद जणू मलाच म्हणायचे आहेत, असे वाटत होते. ‘बेगमजान’च्या संवादांमध्ये क्रौर्य आहे, राग आहे; परंतु तिच्या भावना खऱ्याखुऱ्या आहेत. त्यामुळे हे संवाद म्हणताना अवघडल्यासारखे झाले नाही. (प्रतिनिधी)

महिलांनी ठाम भूमिका घ्यावी - विद्या-महिला ‘नॅचरल गिव्हर्स’ आहेत. त्या नेहमी इतरांचा विचार करतात; पण मला काय वाटते, याचा विचारच त्यांच्या मनाला शिवत नाही. स्वत:च्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट करायची असेल, तर समाज काय म्हणेल? लोक काय विचार करतील, असे प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतात. मात्र, महिलांनी स्वत:चे म्हणणे ठामपणे मांडण्याची भूमिका घ्यायला हवी, असे मत अभिनेत्री विद्या बालन हिने व्यक्त केले.