शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपंचमी साजरी करा, पण अंधश्रद्धा नकोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 05:50 IST

नागपंचमीला नागाची पूजा करायची, त्याला दूध पाजण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु या पूजेसाठी जे नाग पकडले जातात त्यांचे किती हाल केले जातात; याची कल्पना आपल्याला नसते.

मुंबई : नागपंचमीला नागाची पूजा करायची, त्याला दूध पाजण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु या पूजेसाठी जे नाग पकडले जातात त्यांचे किती हाल केले जातात; याची कल्पना आपल्याला नसते. भीती, घृणा, मृत्यू व पूजा या सर्वांची सांगड म्हणजेच साप. याच भीतीची जागा नागपूजेने घेतली. सापाची मूर्ती करून त्याची पूजा प्रचलित झाली. परंतु तोच पूजेचा साप आपला शत्रू होतो. तो दिसतो तेव्हा आपोआप आपण काठ्या, दगड घेऊन मारायला जातो. परिणामी, नागपंचमी साजरी करा, पण अंधश्रद्धा नको, असे आवाहन निसर्गमित्रांनी केले आहे.पंचमीच्या महिनाभर अगोदर नाग पकडायला सुरुवात होते. नाग पकडला की त्याचा विषदंत तोडला जातो. तर काहीवेळासुईच्या साहाय्याने नागाच्याविषग्रंथी खेचून काढल्या जातात. अशा नागांना टोपलीत बंद केलेजाते. त्या जखमी नागाचे शहरात प्रदर्शन केले जाते. तो नाग टोपलीत उपाशी, जखमी असतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची टोपली उघडली जाते, नाग मोकळ्या हवेत श्वास घेतो. याचवेळी त्याच्यासमोर हाताची हालचाल करून पुंगी वाजविली जाते. तेव्हा नाग फणा काढत हालचालीमुळे मागेपुढे डुलत असतो (नागाला कुठलाही आवाज ऐकू येत नाही). कालांतराने येथे लोक जमा होतात. भाविक नागावर गुलाल-कुंकू उधळतात. नागासमोर दूध ठेवतात. नाग दुधाला पाणी समजून पितो. दूध हे जरी सापाचे अन्न नसले तरी भुकेलेला नाग दूध किंवा सरबत ठेवला तरी पितो. दूध पिलेला नाग दूध न पचल्यामुळे चोवीस तासांत मरतो, असे निसर्गमित्र विजय अवसरे यांनी सांगितले.