शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

२९ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा करा - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 05:15 IST

राज्यात अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या आणि अवयव दानाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी अवयव दानासंदर्भात जनजागृती व्हावी

मुंबई : राज्यात अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या आणि अवयव दानाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी अवयव दानासंदर्भात जनजागृती व्हावी आणि अवयव दान मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी दरवर्षी २९ आॅगस्ट हा दिवस ‘अवयव दान दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषित केले.अवयव दान जागृती संदर्भात मंगळवारी मरीन ड्राइव्ह येथे सुमारे १२ हजार लोकांची दोन किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. अवयवदान संदर्भात जनजागृतीसाठी राज्यपातळीवर अभियान हाती घेण्यात आले आहे. शहरांबरोबरीनेच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज जे. जे. महाविद्यालय, ग्रॅण्ट रुग्णालय, खासगी तसेच शासकीय वैद्यकीय व्यवसायिक, इंडियन मेडिकल असोसिएशनसारख्या संस्था आणि अन्य मान्यवर नागरिकांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अवयवदान जागृती विषयावरील राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा व पथनाट्य स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.अवयवदानात महाराष्ट्र राज्य हे देशात दुसºया क्रमांकावर आले आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. या विषयी जाणीव जागृती केल्यामुळे अवयवदात्यांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान अभियानास महोत्सव स्वरूपात साजरे करण्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सूचित केले होते. लोकजागृती मधून या अभियानास लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्यास राज्य पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही, असे महाजन यांनी नमूद केले. डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून द्यावे, असेही ते म्हणाले.अवयवदान जनजागृतीसाठी मोबाइल अ‍ॅपअवयवदानाचे महत्त्व चित्ररूपात कळावे यासाठी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात अवयवदान याविषयावरील चित्रांचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. तसेच अवयवदानाची माहिती असलेल्या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात एकूण चौदा चित्रे लावण्यात आली आहेत. यात रुग्णाला अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारे चित्र, नेत्रदानासंदभार्तील चित्र, तसेच जीवंतपणी करता येण्यासारखे अवयवदान समजवून सांगणारे चित्र यासारखी चित्रे लावण्यात आली आहेत. या चित्रांची संकल्पना आणि रेखाटन जे. जे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सूरज कटारे यांनी केले आहे. हे चित्र प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे. त्यासोबत अवयवदान नोंदणी कक्षदेखील मंत्रालयात उभारण्यात आला.

टॅग्स :Governmentसरकार