शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

२९ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा करा - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 05:15 IST

राज्यात अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या आणि अवयव दानाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी अवयव दानासंदर्भात जनजागृती व्हावी

मुंबई : राज्यात अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या आणि अवयव दानाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी अवयव दानासंदर्भात जनजागृती व्हावी आणि अवयव दान मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी दरवर्षी २९ आॅगस्ट हा दिवस ‘अवयव दान दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषित केले.अवयव दान जागृती संदर्भात मंगळवारी मरीन ड्राइव्ह येथे सुमारे १२ हजार लोकांची दोन किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. अवयवदान संदर्भात जनजागृतीसाठी राज्यपातळीवर अभियान हाती घेण्यात आले आहे. शहरांबरोबरीनेच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज जे. जे. महाविद्यालय, ग्रॅण्ट रुग्णालय, खासगी तसेच शासकीय वैद्यकीय व्यवसायिक, इंडियन मेडिकल असोसिएशनसारख्या संस्था आणि अन्य मान्यवर नागरिकांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अवयवदान जागृती विषयावरील राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा व पथनाट्य स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.अवयवदानात महाराष्ट्र राज्य हे देशात दुसºया क्रमांकावर आले आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. या विषयी जाणीव जागृती केल्यामुळे अवयवदात्यांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान अभियानास महोत्सव स्वरूपात साजरे करण्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सूचित केले होते. लोकजागृती मधून या अभियानास लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्यास राज्य पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही, असे महाजन यांनी नमूद केले. डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून द्यावे, असेही ते म्हणाले.अवयवदान जनजागृतीसाठी मोबाइल अ‍ॅपअवयवदानाचे महत्त्व चित्ररूपात कळावे यासाठी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात अवयवदान याविषयावरील चित्रांचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. तसेच अवयवदानाची माहिती असलेल्या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात एकूण चौदा चित्रे लावण्यात आली आहेत. यात रुग्णाला अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारे चित्र, नेत्रदानासंदभार्तील चित्र, तसेच जीवंतपणी करता येण्यासारखे अवयवदान समजवून सांगणारे चित्र यासारखी चित्रे लावण्यात आली आहेत. या चित्रांची संकल्पना आणि रेखाटन जे. जे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सूरज कटारे यांनी केले आहे. हे चित्र प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे. त्यासोबत अवयवदान नोंदणी कक्षदेखील मंत्रालयात उभारण्यात आला.

टॅग्स :Governmentसरकार