शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

एक्स्प्रेस वे वर बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: June 8, 2014 00:12 IST

एक्स्प्रेस वे वर बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे

आर. आर. पाटील : पोलिसांची रिक्त पदे भरणार अपघात रोखण्यासाठी ३ महिन्यांत कृती आराखडा ेमुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील अपघात रोखण्यासाठी स्पीड गन, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्या असून, अपघात रोखण्याच्यादृष्टीने तीन महिन्यांत कृती आराखडा सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली.याबाबतचा तारांकीत प्रश्न काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, ७७ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महामार्गावर ताशी ११० किमी वेगमर्यादा शक्य असूनही तो केवळ ८० किमी ठेवण्यात आला आहे. अपघातप्रवण क्षेत्राची माहिती एमएसआरडीसीला देण्यात आली आहे, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात येणार्‍या दंडाची रक्कम अगदीच किरकोळ असल्याने त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्याची विनंती केंद्र सरकारकडे यापूर्वीच करण्यात आली आहे. महामार्गावर वाहने थांबवून दंड वसुली करणे अशक्य असल्याने यापुढे थेट बँक खात्यातील दंडाची रक्कम वसूल करणे तसेच वाहन परवाना रद्द करण्याचा पर्याय विचाराधीन आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच महामार्गावरील व्यवस्था वाढविण्यासाठी पोलिसांची रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)