शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश

By admin | Updated: June 17, 2014 00:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभरातील पोलीस ठाण्यांत चार महिन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर

हायकोर्ट : गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांनो सावधान!नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यभरातील पोलीस ठाण्यांत चार महिन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर अवमाननेची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शासनाला देण्यात आला आहे. आष्टी (शहीद) येथील पोलिसांच्या असभ्य, बेकायदेशीर व भेदभावपूर्ण वागणुकीविरुद्ध नागपूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे महासचिव मनोज साबळे यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी आज, सोमवारी उपरोक्त आदेश देऊन ही याचिका निकाली काढली. तसेच, भविष्यातही तक्रारीचे निराकरण झाले नाही तर नवीन याचिका दाखल करण्याचे याचिकाकर्त्याला स्वातंत्र्य दिले. दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवावा, प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे सोपविण्यात यावा, आरोपींची विभागीय चौकशी करण्यात यावी, पीडित वकील व तक्रारकर्तीला ५० लाख रुपये भरपाई देण्यात यावी अशा विविध विनंत्या याचिकेत होत्या. गृह विभागाचे सचिव, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, वर्धा पोलीस अधीक्षक व आष्टीचे पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले होते. आष्टी (शहीद) येथील पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे व इतर सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर अ‍ॅड. प्रशांत धरमारे, त्यांचे दोन सहकारी वकील व तक्रारकर्ती रसिका इंगळे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. गेल्या २ आॅक्टोबर रोजी नायब तहसीलदार धनंजय देशमुख यांनी रसिकासोबत गैरवर्तन केले. यामुळे ती तक्रार नोंदविण्यासाठी गेली असता पाचकवडे यांनी तिला धमकावून परत पाठविले. पोलीस अधीक्षकाकडे तक्रार करूनही काहीच कारवाई झाली नाही. यानंतर तिने जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली. २२ नोव्हेंबर रोजी जेएमएफसी न्यायालय परिसरात वकिलांना मारहाणीची घटना घडली होती. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा असूनही एफआयआर नोंदविला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना झाली आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. याचिका प्रलंबित असताना याप्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्यात आला आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून प्रमोद पाचकवडे व इतर सहा पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, ३४१, ३५४ (अ), २९४, ५०६, ५०४, ३२३, ४२६, ३८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तत्पूर्वी वर्धा पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून याचिकेतील सर्व आरोप फेटाळून लावले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)