शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यातील ११०० पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:13 IST

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये होणाऱ्या कोठडीतील मृत्यूंसह इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी

नारायण जाधव ठाणे : राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये होणाऱ्या कोठडीतील मृत्यूंसह इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता मुंबईतील २५ पोलीस ठाण्यांपाठोपाठ राज्यभरातील ११०० पोलीस ठाण्यांमध्ये सरासरी सात ते पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ठाणे जिल्ह्याला होणार आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे आणि नवी मुंबई या दोन पोलीस आयुक्तालयांसह जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील सत्तरहून अधिक पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सीसीटीव्ही कॅमेºयांवर गृह खाते ७२ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे.पोलीस कोठडीतील मृत्यूंसंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर निकाल देताना न्यायालयाने पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीतील २५ पोलीस ठाण्यांमधील लॉकअप रूम, चार्ज रूम, मार्गिका, स्टेशन हाउस अशा पाच ठिकाणी ४१० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही गृहखात्याने सुरू केली आहे. मात्र, न्यायालयाने राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले असल्याने आता राज्याच्या माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अहवालानुसार आता राज्यभरातील ११०० पोलीस ठाण्यांमध्ये महिलांचा विश्रांती कक्ष आणि चेंजिंग रूम वगळून इतर ठिकाणी ७२ कोटी ६० लाख रुपये खर्चून कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.यात पहिल्या टप्प्यात स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून निवड झालेल्या ५०० पोलीस ठाण्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार असून दुसºया टप्प्यात उर्वरित ६०० पोलीस ठाण्यांत ते बसवण्यात येणार आहेत.पोलीस ठाणे आवाराचे गेट, इमारतीचे प्रवेशद्वार, आतील मार्गिका,अधिकारी कक्ष, चार्ज रूम, लॉकअप, अंमलदार कक्ष व आवश्यकता वाटल्यास इतर खोल्या अशा ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यातील लॉकअप मधील कॅमेºयाचे स्टोअरेज वर्षाचे ३६५ दिवस तर उर्वरीत कॅमेºयांचे चित्रण ९० दिवस जतन करण्याचे बंधन आहे. पोलीस निरिक्षकांच्या कार्यालयात ३२ इंच एलईडीवर सर्व कॅमेºयांचे चित्रण पाहता येणार आहे.ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक लाभठाणे जिल्ह्यात सध्या ठाणे आणि नवी मुुंबई ही दोन पोलीस आयुक्तालये कार्यरत आहेत. याशिवाय, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा पसाराही मोठा असून नजीकच्या भविष्यात मीरा-भार्इंदर हे तिसरे आयुक्तालय होऊ घातले आहे. सद्य:स्थितीला ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ५५ पोलीस ठाण्यांसह ग्रामीण अधीक्षकांच्या अखत्यारीतील १७ पोलीस ठाणी अशा एकूण ७२ पोलीस ठाण्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही