शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीला सक्तमजुरी,रत्नागिरीतील ऐतिहासिक निर्णय

By admin | Updated: July 11, 2017 22:25 IST

सात-आठ वर्षापासून पतीकडून २५ लाख रूपये मिळविण्यासाठी सतत वाद निर्माण करून, प्रसंगी मारहाण करून त्याला आत्महत्या

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 11 -  सात-आठ वर्षापासून पतीकडून २५ लाख रूपये मिळविण्यासाठी सतत वाद निर्माण करून, प्रसंगी मारहाण करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीला आज मंगळवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय असून, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
 
जयगड येथील मुखत्यार महमद महामूद नाईक (५०) यांचा १९९० साली परवीन (४२) हिच्याशी विवाह झाला. २०१० सालापासून मुखत्यार आपली पत्नी आाणि दोन मुलांसह रत्नागिरीनजीकच्या खेडशी नाईकनगर येथे रहायला आला. या ठिकाणी आल्यानंतर परवीन आपल्या चैनीसाठी पतीकडे वारंवार घर व जमीन विकून २५ लाख रूपयांची मागणी करू लागली. मात्र, त्यासाठी मुखत्यार तयार नव्हता. मात्र, या गोष्टीवरून परवीन वारंवार भांडण करत असे, प्रसंगी त्याला मारझोड करून उपाशी ठेवत असे. त्यामुळे दरदिवशीच पत्नीकडून होणारा हा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य होऊन अखेर मुखत्यार याने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला.
 
याप्रकरणी मुखत्यार याचा भाऊ अजीज महामूद नाईक याने कुवारबाव येथील ग्रामीण पोलीस स्थानकात परवीन हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अनिल विभुते, उपनिरीक्षक पूनम पवार, सहायक पोलीस फौजदार डी. एस. सावंत आणि पैरवी अधिकारी म्हणून हेडकॉन्स्टेबल अनंत जाधव, महिला हेडकॉन्स्टेबल सुजाता रेवाळे, महिला पोलीस नाईक स्नेहा मयेकर यांनी तपासकाम पूर्ण केले. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी परवीन हिच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
 
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. याकामी ११ साक्षीदार तपासण्यात आले. अतिशय जलद गतीने झालेल्या सुनावणीअंती आज मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या परवीन हिला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विनय गांधी यांनी बाजू लढविली.
 
पहिलीच घटना-
पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला शिक्षा झाल्याचे अनेक प्रकार समोर येतात. मात्र पतीला आत्महत्येला प्रवृत्तकेल्याप्रकरणी पत्नीला शिक्षा होण्याची ही रत्नागिरीतील पहिलीच घटना आहे.