शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीला सक्तमजुरी,रत्नागिरीतील ऐतिहासिक निर्णय

By admin | Updated: July 11, 2017 22:25 IST

सात-आठ वर्षापासून पतीकडून २५ लाख रूपये मिळविण्यासाठी सतत वाद निर्माण करून, प्रसंगी मारहाण करून त्याला आत्महत्या

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 11 -  सात-आठ वर्षापासून पतीकडून २५ लाख रूपये मिळविण्यासाठी सतत वाद निर्माण करून, प्रसंगी मारहाण करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीला आज मंगळवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. रत्नागिरी जिल्ह्यातील हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय असून, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
 
जयगड येथील मुखत्यार महमद महामूद नाईक (५०) यांचा १९९० साली परवीन (४२) हिच्याशी विवाह झाला. २०१० सालापासून मुखत्यार आपली पत्नी आाणि दोन मुलांसह रत्नागिरीनजीकच्या खेडशी नाईकनगर येथे रहायला आला. या ठिकाणी आल्यानंतर परवीन आपल्या चैनीसाठी पतीकडे वारंवार घर व जमीन विकून २५ लाख रूपयांची मागणी करू लागली. मात्र, त्यासाठी मुखत्यार तयार नव्हता. मात्र, या गोष्टीवरून परवीन वारंवार भांडण करत असे, प्रसंगी त्याला मारझोड करून उपाशी ठेवत असे. त्यामुळे दरदिवशीच पत्नीकडून होणारा हा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य होऊन अखेर मुखत्यार याने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गळफास घेतला.
 
याप्रकरणी मुखत्यार याचा भाऊ अजीज महामूद नाईक याने कुवारबाव येथील ग्रामीण पोलीस स्थानकात परवीन हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अनिल विभुते, उपनिरीक्षक पूनम पवार, सहायक पोलीस फौजदार डी. एस. सावंत आणि पैरवी अधिकारी म्हणून हेडकॉन्स्टेबल अनंत जाधव, महिला हेडकॉन्स्टेबल सुजाता रेवाळे, महिला पोलीस नाईक स्नेहा मयेकर यांनी तपासकाम पूर्ण केले. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी परवीन हिच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
 
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. याकामी ११ साक्षीदार तपासण्यात आले. अतिशय जलद गतीने झालेल्या सुनावणीअंती आज मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या परवीन हिला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विनय गांधी यांनी बाजू लढविली.
 
पहिलीच घटना-
पत्नीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला शिक्षा झाल्याचे अनेक प्रकार समोर येतात. मात्र पतीला आत्महत्येला प्रवृत्तकेल्याप्रकरणी पत्नीला शिक्षा होण्याची ही रत्नागिरीतील पहिलीच घटना आहे.