शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपा कार्टूनगिरीने रक्तबंबाळ

By admin | Updated: February 14, 2017 21:39 IST

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत

आॅनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खरे तर परस्परांच्या उरावर बसले आहेत. त्यासाठी विखारी शब्दांच्या बाणांबरोबरच कार्टूनच्या व्हिडीओंचा यथेच्छ वापर सुरू आहे. हे युद्ध अभूतपूर्व अशा व्यक्तिगत पातळीवर उतरल्याने दोन्ही पक्षांतील अनेक महारथी रक्तबंबाळ झाले आहेत.

जागावाटपाचे गणित जुळत नाही, हे लक्षात येताच सुईच्या अग्रावर राहील एव्हढीही जागा सोडणार नाही, असा टोकाचा पवित्रा घेत हे मित्र पक्ष एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे ठाकले. ही लढत मैत्रीपूर्ण असेल, ही अटकळ प्रचाराला सुरुवात होताच धूसर होत गेली. आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यावर दोन्ही बाजूंची भाषा हाडवैऱ्यांनाही लाजवेल इतकी तिखट आणि विखारी झाली आहे. विशेष म्हणजे या तडाख्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यापासून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत कोणीही सुटलेले नाही. विरोधक म्हणजे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही करणार नाहीत, अशी चिखलफेक सेना-भाजपाचे नेते एकमेकांवर करीत आहेत.

शिवसेनेकडून ‘सामना’ या पक्षाच्या मुखपत्रातून मोदी आणि फडणवीसांसह भाजपाच्या नेत्यांवर सडकून शरसंधान सुरू आहे. हा एव्हाना राष्ट्रीय पातळीवर कार्टूनचा विषय बनला आहे. सोबतचे सतीश आचार्य यांचे कार्टून हा त्याचाच बोलका पुरावा आहे. उद्धव यांनी नोटाबंदीपासून लावलेला मोदीविरोधी सूर आता टिपेला गेला आहे. त्यामुळे रामदास कदम, एकनाथ शिंदे हेही त्यांचीच री ओढत फडणवीसांवर बरसले आहेत. देवेंद्रभाई हे गुंडाचे कॅप्टन असल्याची टीका कदम यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते बिनधास्त करू लागले आहेत.

एरव्ही अनेक वर्षे महाराष्ट्रात शिवसेनेच्या धाकट्या भावाची भूमिका घेणारी भाजपा अमित शहांच्या नेतृत्वात बडे भैयाचा रूबाब दाखवू लागली आहे. शिवसेनेच्या अरे ला कारे म्हणताना लहान कार्यकर्ताही आता भीड बाळगेनासा झाला आहे. उद्धव, आदित्य आणि एकूणच शिवसेनेवर व्यंगातून प्रहार करणाऱ्या कार्टूनफिती भाजपाने खुले आम प्रसारित केल्या आहेत. सोबतच्या लिंकमधून त्या थेट पाहा. त्यातील विखार अनुभवण्याजोगा आहे. स्व. शिवसेनाप्रमुख हे ख्यातकीर्त व्यंगचित्रकार होते. त्यांनी वापरलेले हे मार्मिक शस्त्र भाजपा शिवसेनेविरुद्ध अधिक जहाल स्वरुपात वापरत आहे. वास्तविक रक्त न सांडता केलेली बोचरी टीका, दाखवून दिलेली विसंगती हा कार्टूनचा आत्मा. पण सध्याचे कार्टून वॉर टोकाला गेले आहे आणि रक्तबंबाळही करीत आहे. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या जवळ जातील की कायमची पाठ फिरवतील, हा त्यांच्यासाठी पॉइंट आॅफ नो रिटर्नला पोहोचले आहेत का, या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. पण हा मतदारांना संभ्रमात टाकण्याचाच डाव असल्याचे मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

तरीही हे दोन्ही पक्ष आता एकमेकांचे तोंड पाहणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगण्याचे धैर्य राजकीय निरीक्षक दाखवू शकलेले नाहीत. काँग्रेस तर याला सेना-भाजपातील लुटूपुटूची लढाईच म्हणत आहे. शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकित केले असल्याने, सरकार स्थिर असल्याचा अन्वयार्थ राजकीय गोटांत काढला जात आहे.

निवडणुकांच्या काळात एकमेकांच्या उरावर बसणारे निकालानंतर गरजेपोटी एकमेकांच्या गळ्यात कसे प्रेमाने हात टाकतात, हे महाराष्ट्रातील मतदारांनी अनेकदा पाहिले आहे. १९९० च्या दशकात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता अधोरेखित झाली. त्यातून सगळेच पक्ष कोणा ना कोणाच्या मैत्रीच्या वळचणीला गेलेच. त्यात राजकीय स्वार्थ आणि सोय हा केंद्रबिंदू राहिला. जसे शिवसेना-भाजपा एकत्र आले, तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही अभिमान-स्वाभिमानाला मुरड घालत सत्तेसाठी जुळवून घ्यावे लागले. गेल्या दशकभरात या दोन्ही जोड्यांमध्ये एक समान धागा दिसत राहिला. प्रत्येकानी जोडीदारावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना मित्राला नेस्तनाबूद करण्याच्याच खेळी झाल्या. त्याचाच भाग म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या चारित्र्याची लक्तरे वेशीवर टांगली. पण तरीही या टीकायुद्धाला व्यक्तिगत शत्रुत्वाचे वळण लागले नाही.

परंतु भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह लहानसहान कार्यकर्तेही आजमितीस उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याचा विचार भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही केला नव्हता. हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत १९८० च्या दशकाच्या अखेरीस एक त्र आलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने ही युती जवळपास २५ वर्षे टिकवून ठेवली. अंतर्गत संघर्ष, रुसवे-फुगवे, जागावाटपावरून मतभेद, टोकाची नाराजी अशा अनेक अप्रिय हिंदोळ््यांवर झोके घेऊनही ही युती कायम राहिली. विधानसभेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे म्हणजेच एकमेकांविरुद्ध लढली.