शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

सेना-भाजपा कार्टूनगिरीने रक्तबंबाळ

By admin | Updated: February 14, 2017 21:39 IST

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत

आॅनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खरे तर परस्परांच्या उरावर बसले आहेत. त्यासाठी विखारी शब्दांच्या बाणांबरोबरच कार्टूनच्या व्हिडीओंचा यथेच्छ वापर सुरू आहे. हे युद्ध अभूतपूर्व अशा व्यक्तिगत पातळीवर उतरल्याने दोन्ही पक्षांतील अनेक महारथी रक्तबंबाळ झाले आहेत.

जागावाटपाचे गणित जुळत नाही, हे लक्षात येताच सुईच्या अग्रावर राहील एव्हढीही जागा सोडणार नाही, असा टोकाचा पवित्रा घेत हे मित्र पक्ष एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे ठाकले. ही लढत मैत्रीपूर्ण असेल, ही अटकळ प्रचाराला सुरुवात होताच धूसर होत गेली. आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यावर दोन्ही बाजूंची भाषा हाडवैऱ्यांनाही लाजवेल इतकी तिखट आणि विखारी झाली आहे. विशेष म्हणजे या तडाख्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यापासून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत कोणीही सुटलेले नाही. विरोधक म्हणजे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही करणार नाहीत, अशी चिखलफेक सेना-भाजपाचे नेते एकमेकांवर करीत आहेत.

शिवसेनेकडून ‘सामना’ या पक्षाच्या मुखपत्रातून मोदी आणि फडणवीसांसह भाजपाच्या नेत्यांवर सडकून शरसंधान सुरू आहे. हा एव्हाना राष्ट्रीय पातळीवर कार्टूनचा विषय बनला आहे. सोबतचे सतीश आचार्य यांचे कार्टून हा त्याचाच बोलका पुरावा आहे. उद्धव यांनी नोटाबंदीपासून लावलेला मोदीविरोधी सूर आता टिपेला गेला आहे. त्यामुळे रामदास कदम, एकनाथ शिंदे हेही त्यांचीच री ओढत फडणवीसांवर बरसले आहेत. देवेंद्रभाई हे गुंडाचे कॅप्टन असल्याची टीका कदम यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते बिनधास्त करू लागले आहेत.

एरव्ही अनेक वर्षे महाराष्ट्रात शिवसेनेच्या धाकट्या भावाची भूमिका घेणारी भाजपा अमित शहांच्या नेतृत्वात बडे भैयाचा रूबाब दाखवू लागली आहे. शिवसेनेच्या अरे ला कारे म्हणताना लहान कार्यकर्ताही आता भीड बाळगेनासा झाला आहे. उद्धव, आदित्य आणि एकूणच शिवसेनेवर व्यंगातून प्रहार करणाऱ्या कार्टूनफिती भाजपाने खुले आम प्रसारित केल्या आहेत. सोबतच्या लिंकमधून त्या थेट पाहा. त्यातील विखार अनुभवण्याजोगा आहे. स्व. शिवसेनाप्रमुख हे ख्यातकीर्त व्यंगचित्रकार होते. त्यांनी वापरलेले हे मार्मिक शस्त्र भाजपा शिवसेनेविरुद्ध अधिक जहाल स्वरुपात वापरत आहे. वास्तविक रक्त न सांडता केलेली बोचरी टीका, दाखवून दिलेली विसंगती हा कार्टूनचा आत्मा. पण सध्याचे कार्टून वॉर टोकाला गेले आहे आणि रक्तबंबाळही करीत आहे. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या जवळ जातील की कायमची पाठ फिरवतील, हा त्यांच्यासाठी पॉइंट आॅफ नो रिटर्नला पोहोचले आहेत का, या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. पण हा मतदारांना संभ्रमात टाकण्याचाच डाव असल्याचे मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

तरीही हे दोन्ही पक्ष आता एकमेकांचे तोंड पाहणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगण्याचे धैर्य राजकीय निरीक्षक दाखवू शकलेले नाहीत. काँग्रेस तर याला सेना-भाजपातील लुटूपुटूची लढाईच म्हणत आहे. शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकित केले असल्याने, सरकार स्थिर असल्याचा अन्वयार्थ राजकीय गोटांत काढला जात आहे.

निवडणुकांच्या काळात एकमेकांच्या उरावर बसणारे निकालानंतर गरजेपोटी एकमेकांच्या गळ्यात कसे प्रेमाने हात टाकतात, हे महाराष्ट्रातील मतदारांनी अनेकदा पाहिले आहे. १९९० च्या दशकात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता अधोरेखित झाली. त्यातून सगळेच पक्ष कोणा ना कोणाच्या मैत्रीच्या वळचणीला गेलेच. त्यात राजकीय स्वार्थ आणि सोय हा केंद्रबिंदू राहिला. जसे शिवसेना-भाजपा एकत्र आले, तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही अभिमान-स्वाभिमानाला मुरड घालत सत्तेसाठी जुळवून घ्यावे लागले. गेल्या दशकभरात या दोन्ही जोड्यांमध्ये एक समान धागा दिसत राहिला. प्रत्येकानी जोडीदारावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना मित्राला नेस्तनाबूद करण्याच्याच खेळी झाल्या. त्याचाच भाग म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या चारित्र्याची लक्तरे वेशीवर टांगली. पण तरीही या टीकायुद्धाला व्यक्तिगत शत्रुत्वाचे वळण लागले नाही.

परंतु भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह लहानसहान कार्यकर्तेही आजमितीस उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याचा विचार भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही केला नव्हता. हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत १९८० च्या दशकाच्या अखेरीस एक त्र आलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने ही युती जवळपास २५ वर्षे टिकवून ठेवली. अंतर्गत संघर्ष, रुसवे-फुगवे, जागावाटपावरून मतभेद, टोकाची नाराजी अशा अनेक अप्रिय हिंदोळ््यांवर झोके घेऊनही ही युती कायम राहिली. विधानसभेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे म्हणजेच एकमेकांविरुद्ध लढली.