शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

सेना-भाजपा कार्टूनगिरीने रक्तबंबाळ

By admin | Updated: February 14, 2017 21:39 IST

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत

आॅनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतील भागीदार महापालिका निवडणुकांच्या प्रचारात तलवारी उपसून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. खरे तर परस्परांच्या उरावर बसले आहेत. त्यासाठी विखारी शब्दांच्या बाणांबरोबरच कार्टूनच्या व्हिडीओंचा यथेच्छ वापर सुरू आहे. हे युद्ध अभूतपूर्व अशा व्यक्तिगत पातळीवर उतरल्याने दोन्ही पक्षांतील अनेक महारथी रक्तबंबाळ झाले आहेत.

जागावाटपाचे गणित जुळत नाही, हे लक्षात येताच सुईच्या अग्रावर राहील एव्हढीही जागा सोडणार नाही, असा टोकाचा पवित्रा घेत हे मित्र पक्ष एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे ठाकले. ही लढत मैत्रीपूर्ण असेल, ही अटकळ प्रचाराला सुरुवात होताच धूसर होत गेली. आता प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यावर दोन्ही बाजूंची भाषा हाडवैऱ्यांनाही लाजवेल इतकी तिखट आणि विखारी झाली आहे. विशेष म्हणजे या तडाख्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्यापासून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत कोणीही सुटलेले नाही. विरोधक म्हणजे काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही करणार नाहीत, अशी चिखलफेक सेना-भाजपाचे नेते एकमेकांवर करीत आहेत.

शिवसेनेकडून ‘सामना’ या पक्षाच्या मुखपत्रातून मोदी आणि फडणवीसांसह भाजपाच्या नेत्यांवर सडकून शरसंधान सुरू आहे. हा एव्हाना राष्ट्रीय पातळीवर कार्टूनचा विषय बनला आहे. सोबतचे सतीश आचार्य यांचे कार्टून हा त्याचाच बोलका पुरावा आहे. उद्धव यांनी नोटाबंदीपासून लावलेला मोदीविरोधी सूर आता टिपेला गेला आहे. त्यामुळे रामदास कदम, एकनाथ शिंदे हेही त्यांचीच री ओढत फडणवीसांवर बरसले आहेत. देवेंद्रभाई हे गुंडाचे कॅप्टन असल्याची टीका कदम यांच्यासारखे दुसऱ्या फळीतील नेते बिनधास्त करू लागले आहेत.

एरव्ही अनेक वर्षे महाराष्ट्रात शिवसेनेच्या धाकट्या भावाची भूमिका घेणारी भाजपा अमित शहांच्या नेतृत्वात बडे भैयाचा रूबाब दाखवू लागली आहे. शिवसेनेच्या अरे ला कारे म्हणताना लहान कार्यकर्ताही आता भीड बाळगेनासा झाला आहे. उद्धव, आदित्य आणि एकूणच शिवसेनेवर व्यंगातून प्रहार करणाऱ्या कार्टूनफिती भाजपाने खुले आम प्रसारित केल्या आहेत. सोबतच्या लिंकमधून त्या थेट पाहा. त्यातील विखार अनुभवण्याजोगा आहे. स्व. शिवसेनाप्रमुख हे ख्यातकीर्त व्यंगचित्रकार होते. त्यांनी वापरलेले हे मार्मिक शस्त्र भाजपा शिवसेनेविरुद्ध अधिक जहाल स्वरुपात वापरत आहे. वास्तविक रक्त न सांडता केलेली बोचरी टीका, दाखवून दिलेली विसंगती हा कार्टूनचा आत्मा. पण सध्याचे कार्टून वॉर टोकाला गेले आहे आणि रक्तबंबाळही करीत आहे. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या जवळ जातील की कायमची पाठ फिरवतील, हा त्यांच्यासाठी पॉइंट आॅफ नो रिटर्नला पोहोचले आहेत का, या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. पण हा मतदारांना संभ्रमात टाकण्याचाच डाव असल्याचे मानणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

तरीही हे दोन्ही पक्ष आता एकमेकांचे तोंड पाहणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगण्याचे धैर्य राजकीय निरीक्षक दाखवू शकलेले नाहीत. काँग्रेस तर याला सेना-भाजपातील लुटूपुटूची लढाईच म्हणत आहे. शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकित केले असल्याने, सरकार स्थिर असल्याचा अन्वयार्थ राजकीय गोटांत काढला जात आहे.

निवडणुकांच्या काळात एकमेकांच्या उरावर बसणारे निकालानंतर गरजेपोटी एकमेकांच्या गळ्यात कसे प्रेमाने हात टाकतात, हे महाराष्ट्रातील मतदारांनी अनेकदा पाहिले आहे. १९९० च्या दशकात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता अधोरेखित झाली. त्यातून सगळेच पक्ष कोणा ना कोणाच्या मैत्रीच्या वळचणीला गेलेच. त्यात राजकीय स्वार्थ आणि सोय हा केंद्रबिंदू राहिला. जसे शिवसेना-भाजपा एकत्र आले, तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही अभिमान-स्वाभिमानाला मुरड घालत सत्तेसाठी जुळवून घ्यावे लागले. गेल्या दशकभरात या दोन्ही जोड्यांमध्ये एक समान धागा दिसत राहिला. प्रत्येकानी जोडीदारावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना मित्राला नेस्तनाबूद करण्याच्याच खेळी झाल्या. त्याचाच भाग म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या चारित्र्याची लक्तरे वेशीवर टांगली. पण तरीही या टीकायुद्धाला व्यक्तिगत शत्रुत्वाचे वळण लागले नाही.

परंतु भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह लहानसहान कार्यकर्तेही आजमितीस उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याचा विचार भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही केला नव्हता. हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत १९८० च्या दशकाच्या अखेरीस एक त्र आलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने ही युती जवळपास २५ वर्षे टिकवून ठेवली. अंतर्गत संघर्ष, रुसवे-फुगवे, जागावाटपावरून मतभेद, टोकाची नाराजी अशा अनेक अप्रिय हिंदोळ््यांवर झोके घेऊनही ही युती कायम राहिली. विधानसभेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे म्हणजेच एकमेकांविरुद्ध लढली.